शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

धर्मनिरपेक्ष देशात खानपान सवयींवर बंदी अशक्य

By admin | Updated: May 27, 2015 23:45 IST

अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिले आहे.

नवी दिल्ली : ज्यांना गोमांस खायचे, त्यांनी पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देणारे केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिले आहे. भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे आणि धर्मनिरपेक्ष देशात खानपानविषयक सवयींवर बंदी लादता येणार नाही, असे रिजिजू म्हणाले.बुधवारी एका वृत्तसंस्थेला फोनवरून दिलेल्या मुलाखतीत रिजिजू बोलत होते. महाराष्ट्रात भाजपप्रणीत युतीचे सरकार आल्यानंतर गोमांस विक्री व खाण्यावर कायद्याने बंदी लादण्यात आली आहे. तेव्हापासून गोमांस बंदीच्या मुद्यावर देशभर वादविवादाला तोंड फुटले आहे. अलीकडे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी गोमांस बंदीचे समर्थन करताना, ज्यांना गोमांस खायचे त्यांनी पाकिस्तानात जावे, असे सांगून वाद ओढवून घेतला होता. त्यांच्या या वक्तव्यावर देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर किरण रिजिजू बोलत होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)कुठल्याही धर्मनिरपेक्ष देशात खानपानविषयक सवयी थांबवता येणार नाहीत, असे रिजिजू म्हणाले. तुम्ही एखाद्या हिंदूबहुल राज्यांत जात असाल तेव्हा तुम्ही तेथील हिंदूची श्रद्धा आणि भावना जपल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे एखाद्या ख्रिश्चन वा मुस्लिमबहुल राज्यांत जाता तेव्हा तेथील बहुसंख्यकांच्या भावनांचाही सन्मान केला पाहिजे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला आपल्या भाव-भावना, श्रद्धा जपण्याचा अधिकार दिला आहे आणि यावर कुठलीही बंदी असता कामा नये, असे ते म्हणाले.४मी गोमांस खातो, मला ते खाण्यापासून कोणी रोखू शकते का? असा सवाल केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी उपस्थित केल्याचे वृत्त बुधवारी माध्यमांनी दिले. खुद्द रिजिजू यांनी मात्र आपण असे म्हटलेच नसल्याचे सांगत, या वादात पडण्यास नकार दिला. ४मी गोमांस खातो, असे मी कधीही म्हणालो नाही. आपल्याला एकमेकांचा धर्म, श्रद्धा आणि खानपानविषयक सवयींचा आदर करायला हवा, केवळ एवढेच मी म्हणालो होतो, असा खुलासा त्यांनी केला. ४संतुलित विचारांचा आदर न करणे आणि हिंदूविरोधात बोलणाऱ्यास धर्मनिरपेक्ष समजण्याची नवी फॅशन भारतात आली आहे; पण धर्मनिरपेक्ष ठरण्यासाठी हिंदूंविरोधात बोलण्याची व्यक्तिश: मला कुठलीही गरज वाटत नाही. ४आपल्याला विकास आणि धार्मिक सलोख्यावर लक्ष केंद्रित करायला हवे, असेही ते म्हणाले.