शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

धर्मनिरपेक्ष देशात खानपान सवयींवर बंदी अशक्य

By admin | Updated: May 27, 2015 23:45 IST

अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिले आहे.

नवी दिल्ली : ज्यांना गोमांस खायचे, त्यांनी पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देणारे केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिले आहे. भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे आणि धर्मनिरपेक्ष देशात खानपानविषयक सवयींवर बंदी लादता येणार नाही, असे रिजिजू म्हणाले.बुधवारी एका वृत्तसंस्थेला फोनवरून दिलेल्या मुलाखतीत रिजिजू बोलत होते. महाराष्ट्रात भाजपप्रणीत युतीचे सरकार आल्यानंतर गोमांस विक्री व खाण्यावर कायद्याने बंदी लादण्यात आली आहे. तेव्हापासून गोमांस बंदीच्या मुद्यावर देशभर वादविवादाला तोंड फुटले आहे. अलीकडे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी गोमांस बंदीचे समर्थन करताना, ज्यांना गोमांस खायचे त्यांनी पाकिस्तानात जावे, असे सांगून वाद ओढवून घेतला होता. त्यांच्या या वक्तव्यावर देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर किरण रिजिजू बोलत होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)कुठल्याही धर्मनिरपेक्ष देशात खानपानविषयक सवयी थांबवता येणार नाहीत, असे रिजिजू म्हणाले. तुम्ही एखाद्या हिंदूबहुल राज्यांत जात असाल तेव्हा तुम्ही तेथील हिंदूची श्रद्धा आणि भावना जपल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे एखाद्या ख्रिश्चन वा मुस्लिमबहुल राज्यांत जाता तेव्हा तेथील बहुसंख्यकांच्या भावनांचाही सन्मान केला पाहिजे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला आपल्या भाव-भावना, श्रद्धा जपण्याचा अधिकार दिला आहे आणि यावर कुठलीही बंदी असता कामा नये, असे ते म्हणाले.४मी गोमांस खातो, मला ते खाण्यापासून कोणी रोखू शकते का? असा सवाल केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी उपस्थित केल्याचे वृत्त बुधवारी माध्यमांनी दिले. खुद्द रिजिजू यांनी मात्र आपण असे म्हटलेच नसल्याचे सांगत, या वादात पडण्यास नकार दिला. ४मी गोमांस खातो, असे मी कधीही म्हणालो नाही. आपल्याला एकमेकांचा धर्म, श्रद्धा आणि खानपानविषयक सवयींचा आदर करायला हवा, केवळ एवढेच मी म्हणालो होतो, असा खुलासा त्यांनी केला. ४संतुलित विचारांचा आदर न करणे आणि हिंदूविरोधात बोलणाऱ्यास धर्मनिरपेक्ष समजण्याची नवी फॅशन भारतात आली आहे; पण धर्मनिरपेक्ष ठरण्यासाठी हिंदूंविरोधात बोलण्याची व्यक्तिश: मला कुठलीही गरज वाटत नाही. ४आपल्याला विकास आणि धार्मिक सलोख्यावर लक्ष केंद्रित करायला हवे, असेही ते म्हणाले.