शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

महत्त्वाच्या बातम्या... जोड...०१

By admin | Updated: October 3, 2015 00:20 IST

प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
खापरखेडा : कोळशाची भुकटी व फ्लाय ॲशची वाहतूक तसेच वीज केंद्रामुळे परिसरात हल्ली वायू प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना श्वासाचे आजार जडायला सुरुवात झाली आहे. या वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
***
प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला
कळमेश्वर : शहरात व ग्रामीण भागात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर प्रचंड वाढला आहे. त्या पिशव्यांमुळे जमीन खराब होत असून, त्या खाल्ल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे या पिशव्यांच्या विक्री तथा वापरावर बंदी घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
***
कृषिपंपाचे बिल रीडिंगप्रमाणे द्या!
नरखेड : शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या विजेचे बिल सरासरी अथवा अश्वशक्तीप्रमाणे दिले जाते. वास्तवात शेतकरी वापरत असलेल्या विजेपेक्षा बिलाची रक्कम अधिक असल्याने बिले थकीत राहतात. त्यातच वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना रीडिंगप्रमाणे बिले द्यावे, अशी मागणी मदन कामडे यांनी केली आहे.
**
अवैध उत्खननाला आळा घाला
उमरेड : तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात मुरमाचे खोदकाम केले जात आहे. कमी रॉयल्टी भरून अधिक खोदकाम केले जात असल्याने शासनाचा महसूल बुडत असून, पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. त्यामुळे या उत्खननाला आळा घालण्याची मागणी पर्यावरण अभ्यासकांनी केली आहे.
***
कृषी विभागाने जनजागृती करावी
रामटेक : कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना विविध शेतीपयोगी साहित्य अनुदानावर दिले जाते. याची जाहिरात केली जात नसल्याने शेतकऱ्यांना माहिती होत नाही. त्यामुळे सदर साहित्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
***
कमी दाबाच्या विजेमुळे नुुकसान
सावनेर : तालुक्यातील इंदापूर शिवारातील ट्रान्सफार्मरवर ४० पेक्षा अधिक मोटरपंप आहेत. या ट्रान्सफार्मरमधून क्षमतेपेक्षा अधिक विजेचा वापर होत असल्याने कमी दाबाच्या विजेचा पुरवठा होतो. त्यामुळे मोटरपंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून या शिवारात नवीन ट्रान्सफार्मर लावण्याची मागणी जोर धरत आहे.
***