शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ निलंबन नाही न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निवाडा

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ निलंबित ठेवण्याच्या वृत्तीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जोरदार प्रहार केला़ निलंबन झेलणारी व्यक्ती समाजाचे आरोप आणि विभागाची उपेक्षेची बळी ठरते़ त्यामुळे कुठल्याही कर्मचाऱ्याला त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल झाले नसल्यास ९० दिवसांपेक्षा अधिक काळ निलंबित ठेवता येणार नाही, असा निवाडा न्यायालयाने यानिमित्ताने दिला़

नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ निलंबित ठेवण्याच्या वृत्तीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जोरदार प्रहार केला़ निलंबन झेलणारी व्यक्ती समाजाचे आरोप आणि विभागाची उपेक्षेची बळी ठरते़ त्यामुळे कुठल्याही कर्मचाऱ्याला त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल झाले नसल्यास ९० दिवसांपेक्षा अधिक काळ निलंबित ठेवता येणार नाही, असा निवाडा न्यायालयाने यानिमित्ताने दिला़
न्या़ विक्रमजित सेन आणि न्या़ सी़ नागप्पन यांच्या खंडपीठाने संरक्षण विभागातील इस्टेट ऑफिसर अजयकुमार चौधरी यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला़ दीर्घकाळ कर्मचाऱ्यांना निलंबित ठेवण्याच्या प्रवृत्तीवर न्यायालयाने यावेळी तीव्र टीका केली़ निलंबन आणि विशेषत: आरोपनिश्चितीच्या काळातील निलंबन अस्थायी असते आणि त्याचा कालावधीही कमीतकमी असायला हवा़, असे न्यायालयाने यावेळी म्हटले़ कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्याला तीन महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी निलंबित केले जाऊ शकत नाही़ या काळात आरोपी अधिकारी वा कर्मचाऱ्याविरुद्ध आरोपपत्र दाखल झाले असेल वा झाले नसल्याच्या स्थितीत निलंबनाचा कालावधी वाढविण्यासाठी सविस्तर आदेश दिला जायला हवा, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले़
संरक्षण विभागात इस्टेट ऑफिसर असलेल्या अजयकुमार चौधरी यांना सुमारे चार एकर जमिनीच्या वापरासाठी चुकीचे नाहरकत प्रमाणपत्र दिल्याच्या आरोपाखाली २०११ रोजी निलंबित करण्यात आले होते़