शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

(महत्त्वाचे) केंद्रीय पथकावर शेतकर्‍यांचा संताप

By admin | Updated: August 12, 2015 00:35 IST

फोटोडेस्क - ११बीड/औरंगाबादने पाठविला आहे.-------------------------------------चौसाळा (जि. बीड) येथे शेतकर्‍यांनी केंद्राच्या पाहणी पथकातील अधिकार्‍यांना घेराव घालून व्यथा ऐकण्यास भाग पाडले. दहा मिनिटे शेतकरी बोलत होते आणि अधिकारी गुपचूप ऐकत होते.------------------------पाहणी काही मिनिटांची : मदतीची घोषणा करण्याची मागणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी दौर्‍यावर निघालेल्या केंद्रीय पथकाला मंगळवारी शेतकर्‍यांच्या संतापाला सामोरे जावे ...


फोटोडेस्क - ११बीड/औरंगाबादने पाठविला आहे.
-------------------------------------
चौसाळा (जि. बीड) येथे शेतकर्‍यांनी केंद्राच्या पाहणी पथकातील अधिकार्‍यांना घेराव घालून व्यथा ऐकण्यास भाग पाडले. दहा मिनिटे शेतकरी बोलत होते आणि अधिकारी गुपचूप ऐकत होते.
------------------------

पाहणी काही मिनिटांची : मदतीची घोषणा करण्याची मागणी

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी दौर्‍यावर निघालेल्या केंद्रीय पथकाला मंगळवारी शेतकर्‍यांच्या संतापाला सामोरे जावे लागले. पाहणीचा फार्स नको, काय मदत करणार ते सांगा हा सवाल प्रत्येक ठिकाणी उपस्थित करण्यात आला.
बीड जिल्ह्यातीस चौसाळा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील रहाटगाव येथे तर शेतकर्‍यांनी गाड्यांचा ताफा अडवून अधिकार्‍यांना दुष्काळाची तीव्रता समजावून सांगितली.
यंदा मराठवाड्यात पावसाने पाठ फिरविल्याने खरीप पीक हातून गेले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय दुष्काळ निवारण विभागाचे अतिरिक्त आयुक्त राघवेंद्रसिंह आणि केंद्रीय फलोत्पादन महामंडळाचे कार्यकारी संचालक ए. के. सिंह, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्यासह संबंधित ठिकाणचे जिल्हाधिकारी, इतर अधिकार्‍यांच्या पथकाने मंगळवारी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील काही गावांची पाहणी केली.
रहाटगाव येथील शेतकरी आयुक्तांच्या गाडीला आडवे आले. त्यामुळे राघवेंद्रसिंह, डॉ. दांगट यांना खाली उतरावे लागले. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांनी आणि अन्नदाता शेतकरी संघटनेचे प्रमुख जयाजी सूर्यवंशी यांनी त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
जालना जिल्ह्यात पथकाने शेततळे आणि पाण्याअभावी सुकलेल्या पिकांची पाहणी केली. दौर्‍यास विलंब झाल्याने पथकाने वाहनातूनच संत्र्यांच्या बागेचे निरीक्षण केले. बीड जिल्ह्यातील पाडळशिंगी येथे तब्बल दोन तास उशिरा दुपारी दीड वाजता हे पथक पोहचले. मादळमोही शिवाराजवळ काही मिनिटांची पाहणी करून ताफा पुढे निघाला. मादळमोहीच्या एका शेतकर्‍याने ताफा अडवत रस्त्यातील शेताची पाहणी करून साहेब तुम्हाला दुष्काळ काय समजणार ?, जरा आमच्यासोबत चला, म्हणजे आमचा जीव कसा झुरतोय, ते समजेल तुम्हाला, असे सुनावले. पुढे चौसाळ्यातही ताफा अडवून शेतकर्‍यांनी घेराव घातला. त्यांचे आठ-दहा मिनिटे गार्‍हाणे एकेल्यानंतर ताफा पुढे उस्मानाबादसाठी रवाना झाला. उस्मानाबादमध्ये इंदापूर फाट्याजवळ जळालेल्या शेवग्याच्या बागेची पथकाने पाहणी केली. संध्याकाळी सारोळामार्गे पथक लातूरला रवाना झाले. (प्रतिनिधी)
-------------
केंद्र व राज्य शासनाकडे पाहणीचा अहवाल सादर करण्यात येईल. मी बारकाईने काही घटकांचे मूल्यांकन केले आहे. परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून आले आहे. शेतकर्‍यांसाठी ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. शासनापर्यंत शेतकर्‍यांच्या भावना पोहोचविण्यात येतील. त्यानंतर शासन निर्णय घेईल.
- राघवेंद्रसिंह, अतिरिक्त आयुक्त, केंद्रीय दुष्काळ निवारण विभाग