शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईल; निर्मला सीतारामन यांचे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
3
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
4
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
5
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
6
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
7
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
8
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
9
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
10
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
11
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
12
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
13
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
14
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
15
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
16
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
17
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
18
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
19
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
20
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!

महत्वाचे....

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

मिरचीवर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

मिरचीवर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल
निहारवाणी : परिसरात मोठ्या प्रमाणात मिरचीचे पीक घेतले जाते. मिरची पिकावर चुरडा व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकांवर विविध कीटकनाशक औषधी फवारणी केल्यानंतरही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हताश आहेत. कृषी विभागाने तज्ज्ञांचे मार्गदर्शन व रोग प्रतिबंधक औषधी उपलब्ध करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
.....
पशुवैद्यकीय विभागातील रिक्त पदे भरा
नागपूर : जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात अनेक पदे मागील काही वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांवर वेळीच उपचार होत नाही. उपचार न मिळाल्याने अनेकांकडील गुरे दगावतात. अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यात कर्मचारी उपलब्ध नसल्याने शिपाईच कारभार सांभाळतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
.....
खड्ड्यांमुळे अपघातात वाढ
मौदा : तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली असून मार्गात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने खड्डे बुजविण्यासाठी कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
.....
घाणीमुळे नागरिकांत अंसतोष
सावनेर : स्थानिक शहरातील मुख्य ठिकाणी घाण पसरली आहे. याबाबत नगर परिषद प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांत असंतोष निर्माण होत आहे. अनेक वस्त्यात कचऱ्याचे ढिगारे साचले असतात. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. नगरसेवक व प्रशासनाने स्वच्छतेकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी आहे.
......
भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त
निहारवाणी : ऐन हंगामाच्या काळात वीज वितरण कंपनीने भारनियमनाचा सपाटा सुरू केल्याने शेतकरी त्रस्त आहेत. रबी हंगामातील हरभरा, गहू, मिरची पिकांना ओलिताची गरज आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात भारनियमन होत असल्याने पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. थंडीच्या दिवसांत शेतकऱ्यांना रात्रीच्या सुमारास ओलित करावे लागत आहे. दिवसा होणारे भारनियमन बंद करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आहे.