शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

मतदान यंत्रांमध्ये फेरफार करणे अशक्यच

By admin | Updated: March 27, 2017 01:32 IST

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर एकदम वादात सापडली असली तरी

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर एकदम वादात सापडली असली तरी देशाच्या निवडणूक आयोगाने या यंत्रांमध्ये कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर फेरफार करता येत नसल्याचा निर्वाळा दिला आहे. या यंत्रांच्या अचूकतेवर आमचा पूर्ण विश्वास असून त्यात कोणताही बेकायदेशीर बदल करता येत नाही. या यंत्रांच्या कामगिरीबद्दल जे बेछूट आरोप झाले ते निराधार व म्हणूनच फेटाळून लावण्याच्या लायकीचे आहेत, असे आयोगाने म्हटले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत राज्यांमध्ये या यंत्रांद्वारे १०७ व लोकसभेच्या तीन निवडणुका व्यवस्थित पार पडल्या. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी दहा लाख ईव्हीएम वापरण्यात आली व त्या निवडणुकांचा निकाल सगळ््यांनी मान्यही केला. ईव्हीएम पर्यावरणाचे संरक्षण करणारी मतपत्रिकांचा वापर करण्यात आलेल्या शेवटच्या निवडणुकीसाठी ७-८ हजार टन कागद लागला होता व हा कागद पूर्ण वाढ झालेली एक लाख २० हजार झाडे तोडून तयार करावा लागला होता. हा विचार केला तर ईव्हीएम पर्यावरणाचे संरक्षण करणारी व फेरवापर करता येणारी असल्याचे माजी निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी म्हटले  इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांत नियमबाह्य व बेकायदा बदल करता येतो, असे प्रात्यक्षिक अजून कोणी दाखवून देऊ शकलेले नाही, असे झैदी यांनी सांगितले.