शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

औरंगजेबाने बांधलेल्या अपवादात्मक मंदीराच्या जागेवर बेकायदेशीर कब्जा

By admin | Updated: June 23, 2016 13:29 IST

हिंदूंची मंदीरे तोडण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या औरंगजेबाने चित्रकूट येथे बालाजीचे मंदीर बांधले होते, मात्र आज या दांडग्यांनी अनधिकृतपणे ही जागा बळकावली आहे

ऑनलाइन लोकमत
चित्रकूट, दि. 23 - हिंदूंची मंदीरे तोडण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या औरंगजेबाने चित्रकूट येथे बालाजीचे मंदीर बांधले होते, मात्र आज दांडग्यांनी अनधिकृतपणे ही जागा बळकावली असल्याचे चित्र आहे. औरंगजेबाने बांधलेल्या या मंदीराला या महिन्यात 333 वर्षे पूर्ण झाली आहेत. औरंगजेबाने त्यावेळी राजभोगाचीही व्यवस्था लावून दिली त्यासाठी पैसे व 330 बिघा जमीन मंदीरासाठी दिली. औरंगजेबाचे फर्मान आजही मंदीर व्यवस्थापनाकडे उपलब्ध आहे. आजही सरकारी खर्चाने राजभोगाची प्रथा सुरू आहे, परंतु आसपासची जमीन दांडग्यांनी लाटल्याचे चित्र आहे.
स्थानिक परीसरात चालत आलेल्या कथेनुसार औरंगजेबाने चित्रकूट परीसराला ज्यावेळी भेट दिली, त्यावेळी येथील सगळी मंदीरे व मठ पाडण्याचे आदेश त्याने सैनिकांना दिले. परंतु शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सैनिकांना पोटदुखी सुरू झाली व ती काही केल्या बरी होईना. सैनिक बेशुद्ध पडायला  लागले आणि घाबरलेल्या औरंगजेबाच्या सैनिकांना बाबा बालक दास यांनी बरे केले. मंदीरं तोडणं बंद करावं असं बाबांनी सांगितलं. सैनिक चमत्कार झाल्यासारखे बरे झाले आणि औरंगजेबानेही बाबांना दिलेला शब्द पाळत केवळ मंदीरं तोडणं थांबवलं नाही, तर नवं मंदीर बांधण्याचा आदेश देत त्याच्या उत्पन्नाची व्यवस्था लावली.
तत्कालिन स्थानिक राजा पन्ना नरेश हिंदूपत, नंतर इंग्रज आणि स्वातंत्र्यानंतर भारतीय प्रशासन या सगळ्यांनी राजभोग सरकारी खर्चानं करण्याची प्रथा सुरू ठेवली आहे. मात्र, परीसरातली मंदीराच्या मालकीची जमीन मात्र बेकायदेशीररीत्या लाटण्यात आल्याचे चित्र आहे.