शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

घरकूल मक्तेदाराला नोटीस आयएचएसडीपी योजना : थकीत बिल अदा करूनही काम सुरू करण्यास टाळाटाळ

By admin | Updated: April 4, 2016 00:40 IST

जळगाव : मनपातर्फे आयएचएसडीपी योजनेंतर्गत पिंप्राळा हुडको येथे दांडेकरनगर झोपडप˜ीधारकांसाठी घरकूल बांधण्यात येत आहेत. मात्र मक्तेदाराला थकीत बिल अदा करूनही, सुधारीत प्रकल्प अहवालाच्या मंजुरीचे पत्र येईपर्यंत काम पुन्हा सुरू करण्यास मक्तेदाराकडून टाळाटाळ होत असल्याने मनपातर्फे मक्तेदाराला नोटीस बजावण्यात येणार आहे.

जळगाव : मनपातर्फे आयएचएसडीपी योजनेंतर्गत पिंप्राळा हुडको येथे दांडेकरनगर झोपडप˜ीधारकांसाठी घरकूल बांधण्यात येत आहेत. मात्र मक्तेदाराला थकीत बिल अदा करूनही, सुधारीत प्रकल्प अहवालाच्या मंजुरीचे पत्र येईपर्यंत काम पुन्हा सुरू करण्यास मक्तेदाराकडून टाळाटाळ होत असल्याने मनपातर्फे मक्तेदाराला नोटीस बजावण्यात येणार आहे.
मनपातर्फे पिंप्राळा हुडको येथेच आयएचएसडीपी योजनेंतर्गत ४७२ घरकुलांची योजना राबविली जात आहे. त्यापैकी २६० घरकुलांचे कामकाज पूर्ण होत आले आहे. मात्र उर्वरित इमारतींचे काम सुरू झालेले नाही. त्यासाठी आधी तेथे स्थलांतरित करून आणलेल्या झोपडप˜ीधारकांच्या झोपड्या होत्या. त्या बाजूला सरकवून काम सुरू करण्यास या झोपडप˜ी धारकांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे काम सुरू करण्यात अडचण निर्माण झाली होती. अखेरीस आयुक्त संजय कापडणीस यांनी या ठिकाणी जाऊन झोपडप˜ीधारकांशी चर्चा केल्यावर जागा मोकळी करण्यात आली. या मोकळ्या झालेल्या जागेवर उर्वरित २१२ घरकुलांसाठी ३ इमारतींचे काम बाकी आहे. मक्तेदाराने प्रतिघरकुल २ लाख रुपये वाढवून मागितल्याने सुधारीत डीपीआर केंद्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. तो मंजूर झाल्यावर तसेच आधीची थकबाकी मिळाल्यावर काम सुरू करण्याची भूमिका घेतली होती. त्यानुसार झालेल्या कामाचे बिल अदा करण्यात आले आहे. तसेच सुधारीत डीपीआरही मंजूर झाला आहे. केवळ त्याचे लेखी आदेश येणे बाकी आहेत. मक्तेदाराने मनपाला मुदतीत काम पूर्ण करण्याची हमी दिली आहे. मार्च २०१७ पूर्वी हे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र आठवडाभरापेक्षा अधिक कालावधी उलटूनही मक्तेदार वेगवेगळी कारणे पुढे करून काम सुरू करण्यास टाळाटाळ करत असल्याने मक्ता घेतलेल्या कंपनीच्या मालकाला आयुक्तांनी चर्चेसाठी पाचारण केले आहे. तसेच मक्तेदाराला नोटीसही बजावण्यात येणार आहे.
------ इन्फो------
काय आहे नोटीस?
या नोटीसनुसार मनपाने मक्तेदाराचे मागील बिल अदा केलेले असल्याने तसेच मक्तेदाराने हे काम मुदतीत पूर्ण करून देण्याबाबतचे हमीपत्र दिलेले असतानाही प्रत्यक्ष कामास आठवड्यापेक्षा जास्त कालावधी उलटूनही सुरूवात केलेली नाही. जर काम मुदतीत पूर्ण झाले नाही, व शासनाने पुढील निधी दिला नाही तर त्याची जबाबदारी मक्तेदाराची राहील, अशी नोटीस बजावण्यात येणार आहे.