शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

अक्षय उर्जा हवी असेल तर ती ज्ञानातच आहे (भाग २)

By admin | Updated: February 8, 2015 00:19 IST

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विजय भटकर यांच्या शेजारी बसण्याचा योग माझ्यासाठी मोठा आहे. माझ्या हस्ते त्यांचा सत्कार करण्याचा हा क्षण मी विसरू शकणार नाही. कमी खर्चात परमसंगणक तयार करणाऱ्या भटकरांकडून सकारात्मक ऊर्जा मिळते. गिरीश गांधी यांच्या कल्पक नेतृत्वातून हा पुरस्कार देण्यात येतो, त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले पाहिजे. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी २०२० चे या देशाचे व्हिजन दिले त्यावर नरेंद्र मोदी काम करीत आहे आणि आम्हीही १६ तास काम करतो आहोत. भटकर यांच्या हातूनही ही देशसेवा घडत राहावी, यासाठी जगदंबेला प्रार्थना करतो, असे ते म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विजय भटकर यांच्या शेजारी बसण्याचा योग माझ्यासाठी मोठा आहे. माझ्या हस्ते त्यांचा सत्कार करण्याचा हा क्षण मी विसरू शकणार नाही. कमी खर्चात परमसंगणक तयार करणाऱ्या भटकरांकडून सकारात्मक ऊर्जा मिळते. गिरीश गांधी यांच्या कल्पक नेतृत्वातून हा पुरस्कार देण्यात येतो, त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले पाहिजे. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी २०२० चे या देशाचे व्हिजन दिले त्यावर नरेंद्र मोदी काम करीत आहे आणि आम्हीही १६ तास काम करतो आहोत. भटकर यांच्या हातूनही ही देशसेवा घडत राहावी, यासाठी जगदंबेला प्रार्थना करतो, असे ते म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, भटकर पुरस्कारांपेक्षा मोठे आहेत. विज्ञानाचा लाभ समाजातील विषमता दूर करण्यासाठी होते. पूर्वी जमीन असणारा श्रीमंत होता, नंतर उद्योग उभारणारा आणि सध्या ज्ञानी माणूस श्रीमंत होतो आहे. ही ज्ञानसाधना सर्वांनीच करीत राहणे हीच देशसेवा आहे. खा. अजय संचेती म्हणाले, भटकरांमुळे या पुरस्काराचीच उंची वाढली. त्यांचा सत्कार नीरीच्या सभागृहात होतो आहे, हे औचित्यपूर्ण आहे. विज्ञान आणि अध्यात्माच्या माध्यमातून सामान्यांचे जीवन समृद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न प्रशंसनीय आहे. त्यामुळेच त्यांचा सन्मान करताना आनंद वाटतो. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ट परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा शुभेच्छापर संदेश ऐकविण्यात आला. डॉ. सतीश वटे यांनी भटकर यांचा संक्षिप्त परिचय करून दिला. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर तर आभार ए. के. गांधी यांनी मानले.
--------
नागपुरात आयुष्यातील सोनेरी क्षण
नागपूर माझे आवडते शहर आहे. या शहरात आयुष्यातील महत्त्वाचे क्षण घालविले येथेच खूप काही शिकलो. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, याची खंत वाटते. ऋषी आणि कृषी समृद्ध असल्याशिवाय देश संपन्न होणार नाही. त्यामुळेच आपण नैसर्गिक शेती करायला हवी, असे वाटते. शाश्वत शेती हवी असेल तर गाय महत्त्वाची आहे. गाय आपल्या संस्कृतीचा, अर्थविश्वाचाही महत्त्वाचा घटक आहे. याबाबत आयआयटीचे विद्यार्थीही संशोधन करीत आहेत, असे विजय भटकर म्हणाले. (प्रतिनिधी)
(फोटो ओळींसह रॅपमध्ये आहे.)