शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

या बेटावर जाण्याचा प्रयत्न कराल तर...जीव गमावून बसाल!

By admin | Updated: April 24, 2016 02:47 IST

अंदमान-निकोबारच्या कुशीतलं एक बेट... जिथं हजारो वर्षांपासून कोणतीच बाहेरची व्यक्ती जाऊ शकली नाही... प्रयत्न करणाऱ्यांवर झाला बाणांचा वर्षाव... त्या... ‘नॉर्थ सेंटिनल आयलंड’विषयी...

अंदमान-निकोबारच्या कुशीतलं एक बेट... जिथं हजारो वर्षांपासून कोणतीच बाहेरची व्यक्ती जाऊ शकली नाही... प्रयत्न करणाऱ्यांवर झाला बाणांचा वर्षाव... त्या... ‘नॉर्थ सेंटिनल आयलंड’विषयी...एक असं बेट जिथलं निसर्गसौंदर्य अजूनही आधुनिक जगाच्या प्रदूषणापासून वाचलेलं आहे... जिथला समुद्रकिनारा सगळ्या प्रदूषणापासून दूर आहे आणि जिथलं अलौकिक सौंदर्य पाहून डोळ्यांचं पारणं फिटेल... पण तिथं जाण्याचा तुम्ही प्रयत्न जरी केला तरी जीव गमावून बसाल... हजारो वर्षांपासून बाहेरची कोणतीच व्यक्ती या बेटावर जाऊ शकलेली नाही. ज्यांनी ज्यांनी इथं जाण्याचा प्रयत्न केला त्यांचा एकतर मृत्यू झाला किंवा त्यांच्यावर धनुष्यबाणांचा वर्षाव करून त्यांना हाकलण्यात आलं. जणू ही भूमी फक्त आणि फक्त आमची आहे आणि भूमीवर कोणतीही बाहेरील व्यक्ती आलेली आम्हाला आवडणार नाही, अशी इथल्या आदिवासींची इच्छा एकूणच त्यांच्या वर्तनातून दिसून आलेली आहे. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाच्या पश्चिमेला असलेल्या या ‘नॉर्थ सेंटिनल आयलंड’वर जवळपास ४०० आदिवासी असतील, अशी शक्यता आहे. क्षेत्रफळ ७० चौरस किलोमीटर. सर्वच बाजूंनी निळ्याशार लाटांचा समुद्रकिनारा. पण या चारशे शूरांनी आतापर्यंत एकाही बाहेरच्या व्यक्तीला बेटावर प्रवेश करू दिलेला नाही. एकोणिसाव्या शतकात अनेक बोटी या बेटावरच्या खडकांना आदळल्या; पण कोणीच या बेटावर शिरू शकलं नाही. अनेक खलाशांनी या बेटाच्या किनाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना आदिवासींनी केलेल्या बाणांच्या माऱ्याचाच सामना करावा लागला. एकदा १८९७मध्ये काही पोलीस गुन्हेगाराला शोधायला म्हणून या बेटावर गेले. त्यांनी कसाबसा बेटावर प्रवेशही मिळवला; पण त्या गुन्हेगाराचा मृतदेह त्यांना बाणांनी छिन्नविछिन्न झालेला आणि गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला. गुन्हेगाराची ही अवस्था पाहून पोलिसांनीच तिथून पळ काढला. आॅगस्ट १९८१मध्ये ‘द प्रिमरोज’ नावाची एक बोट या बेटाच्या किनाऱ्याला लागली. आदिवासींनी भाले बाणांचा वर्षाव केला. सुदैवानं कोणालाही गंभीर इजा झाली नाही आणि त्या साऱ्यांची हेलिकॉप्टरद्वारे सुखरूप सुटका करण्यात आली. शास्त्रज्ञांनी अनेक वेळा या बेटावरील आदिवासींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अनेक भेटवस्तू त्यांच्यासाठी पाठवल्या. पण फरक पडला नाही. आदिवासी अशा कोणत्याच आमिषाला भूलले नाहीत आणि त्यांनी पुन्हा आपले भाले उगारले. एका भारतीय शास्त्रज्ञाने १९९१ साली या आदिवाशींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी त्याला संवाद साधायचा होता. त्यानं शक्कल लढवली. त्यानं लाल रंगाच्या काही प्लॅस्टिक बकेट बेटाच्या किनाऱ्यावर सोडल्या. आदिवासींनी त्या जमाही केल्या; पण संवाद साधण्यासाठी ते पुढे आले नाहीत. असं म्हणतात की, या आदिवाशींच्या रडण्याचा आवाज आणि बोलण्याची पद्धत काहींनी ऐकली आहे. पण ती भाषा आणि अंदमान-निकोबार द्वीपसमूहावरील इतर आदिवाशींची भाषा यात कोणतेही साम्य नव्हते. त्यावरून असा निष्कर्षही काढण्यात आला की, या आदिवासींनी त्यांच्या बेटाजवळ असलेल्या द्वीपसमूहाशीही हजारो वर्षांपासून संबंध ठेवला नसेल. हे बेट अधिकृतरीत्या भारताचा भाग आहे. पण या बेटावरील आदिवासींच्या आयुष्यात फेरफार न करण्याची भारत सरकारची इच्छा आहे. ते जसे आहेत, तसेच त्यांनी जगावे... अशी भारताची भूमिका आहे. आता तर भारत सरकारही तेथे कोणता पर्यटक जाणार नाही, याची काळजी घेत असते. कारण हेच... तिथं जाणं एकतर पर्यटकासाठी धोक्याचं आहे; आणि बाहेरून जाणाऱ्यांची तेथील आदिवासींना बाधाही होऊ नये. जग कितीही आधुनिक झालं असेल किंवा पुढारलं असेल तरी इथं अजूनही अश्मयुग आहे. इथल्या आदिवासींनी त्यांची संस्कृती गेल्या अनेक युगांपासून जपली आहे. पण... जगाच्या वेगवान विकासापासून दूर राहून या बेटावरील आदिवासींनी तग धरला तरीही अजून किती काळ?हा प्रश्न आहेच....

(संकलन : प्रतिनिधी)