शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

संसदेतून बाहेर फेकलं तरी चालेल पण आता माघार नाहीच - राहुल गांधी

By admin | Updated: August 4, 2015 12:56 IST

सत्ताधा-यांनी आम्हाला संसेदतून बाहेर फेकले तरी चालेल पण आम्ही माघार नाही असे सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ४ - भूसंपादन व भ्रष्टाचारावरुन आम्ही सत्ताधा-यांविरोधात उभे राहिलो, सत्ताधा-यांनी आम्हाला संसेदतून बाहेर फेकले तरी चालेल पण आम्ही माघार घेणार नाही असे सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मन की बात करणा-या पंतप्रधानांनी एकदा देशवासीयांच्या मन की बात ऐकावी असेही त्यांनी म्हटले आहे.

सोमवारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसच्या २५ गोंधळी खासदारांना निलंबित केले होते. याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून मंगळवारी काँग्रेसने संसद परिसरात धरणे आंदोलन केले. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी आदी दिग्गज नेते या आंदोलनात उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष या पक्षांचे खासदारही आंदोलनात सहभागी झाले होते. केंद्र सरकारवर टीका करताना सोनिया गांधी म्हणाल्या, संसद चालवणे ही सरकारची जबाबदारी आहे, खासदारांना निलंबित करत सरकारने लोकशाहीची हत्या केली. तर राहुल गांधी यांनी आक्रमक शैलीत मोदी सरकारवर निशाणा साधला. 

काँग्रेस खासदारांसोबत जे झाले ते फक्त एक उदाहरण आहे, देशातील विद्यार्थी, शेतकरी वर्ग इतकेच नव्हे तर इंटरनेटवरही मुस्कटदाबी केली जात आहे असा आरोप राहुल गांधींनी केला. ललित मोदी प्रकरणात सुषमा स्वराज यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे, वसुंधरा राजे व ललित मोदींचे आर्थिक हितसंबंधही उघड झालेत. व्यापम घोटाळ्याने मध्य प्रदेशमधील लाखो तरुणांचे भविष्य उद्धवस्त केले असे राहुल गांधींनी सांगितले. तिन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहोत असे त्यांनी सांगितले. काँग्रेसला किंवा मला राजीनामा नको आहे, आता देशातील जनतेलाच राजीनामा हवा आहे असेही त्यांनी नमूद केले.