शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

संसदेतून बाहेर फेकलं तरी चालेल पण आता माघार नाहीच - राहुल गांधी

By admin | Updated: August 4, 2015 12:56 IST

सत्ताधा-यांनी आम्हाला संसेदतून बाहेर फेकले तरी चालेल पण आम्ही माघार नाही असे सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ४ - भूसंपादन व भ्रष्टाचारावरुन आम्ही सत्ताधा-यांविरोधात उभे राहिलो, सत्ताधा-यांनी आम्हाला संसेदतून बाहेर फेकले तरी चालेल पण आम्ही माघार घेणार नाही असे सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मन की बात करणा-या पंतप्रधानांनी एकदा देशवासीयांच्या मन की बात ऐकावी असेही त्यांनी म्हटले आहे.

सोमवारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसच्या २५ गोंधळी खासदारांना निलंबित केले होते. याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून मंगळवारी काँग्रेसने संसद परिसरात धरणे आंदोलन केले. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी आदी दिग्गज नेते या आंदोलनात उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष या पक्षांचे खासदारही आंदोलनात सहभागी झाले होते. केंद्र सरकारवर टीका करताना सोनिया गांधी म्हणाल्या, संसद चालवणे ही सरकारची जबाबदारी आहे, खासदारांना निलंबित करत सरकारने लोकशाहीची हत्या केली. तर राहुल गांधी यांनी आक्रमक शैलीत मोदी सरकारवर निशाणा साधला. 

काँग्रेस खासदारांसोबत जे झाले ते फक्त एक उदाहरण आहे, देशातील विद्यार्थी, शेतकरी वर्ग इतकेच नव्हे तर इंटरनेटवरही मुस्कटदाबी केली जात आहे असा आरोप राहुल गांधींनी केला. ललित मोदी प्रकरणात सुषमा स्वराज यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे, वसुंधरा राजे व ललित मोदींचे आर्थिक हितसंबंधही उघड झालेत. व्यापम घोटाळ्याने मध्य प्रदेशमधील लाखो तरुणांचे भविष्य उद्धवस्त केले असे राहुल गांधींनी सांगितले. तिन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहोत असे त्यांनी सांगितले. काँग्रेसला किंवा मला राजीनामा नको आहे, आता देशातील जनतेलाच राजीनामा हवा आहे असेही त्यांनी नमूद केले.