शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज न दिल्यास बँकेचे शेअर्स परत करणार गुलाबराव पाटील यांचा इशारा : पीक कर्जाचे पुनर्गठन तत्काळ करा; अन्यथा शेतकर्‍यांचा मोर्चा काढणार

By admin | Updated: April 19, 2016 00:48 IST

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे यंदा बांधावर जाऊन केळीची लागवड झाली आहे किंवा नाही याबाबत चौकशी करून पीककर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने शेतकर्‍यांना तत्काळ पीककर्ज न दिल्यास तसेच पीककर्जाचे पुनर्गठन न केल्यास सभासद शेतकर्‍यांसह शेअर्स परत करण्यात येतील व जिल्हा बँकेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आमदार गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे यंदा बांधावर जाऊन केळीची लागवड झाली आहे किंवा नाही याबाबत चौकशी करून पीककर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने शेतकर्‍यांना तत्काळ पीककर्ज न दिल्यास तसेच पीककर्जाचे पुनर्गठन न केल्यास सभासद शेतकर्‍यांसह शेअर्स परत करण्यात येतील व जिल्हा बँकेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आमदार गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
जिल्हा बँकेतर्फे धरणगाव तालुक्यात टिश्यू कल्चर केळीसाठी गतकाळात २०० कोटी रुपयांचे कर्जवाटप केल्याप्रकरणी ११ गटसचिवांना निलंबित केले आहे. तसेच शेतकर्‍यांना पीकपेरा पाहून पीककर्जाचे वाटप करण्याच्या बँकेच्या निर्णयाचा जाब विचारण्यासाठी आमदार गुलाबराव पाटील हे सोमवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख व जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांना जाब विचारला.

९० कोटींच्या शेअर्सच्या बळावर एक हजार कोटींचे कर्ज
गुलाबरावपाटीलम्हणाले,जिल्हा बँकेचे सभासद असलेल्या शेतकर्‍यांची ९० कोटींच्या जवळपास शेअर्सची रक्कम आहे. शेतकर्‍यांच्या या रकमेच्या बळावर जिल्हा बँक शिखर बँकेकडून एक हजार कोटी रुपये घेत आहे. शेतकर्‍याच्या उतार्‍यावर चार पट बोजा लावण्यात येत असतो. मात्र त्यानंतरही पुनर्गठन केले जात नाही. एक लाखांचे कर्ज देत असताना चार लाखांचा ई-करार बँकेकडून केला जात असतो. सध्या दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहे. कर्जाचेपुनर्गठन न केल्यास जिल्हा बँकेवर मोर्चा काढून शेअर परत करण्यातयेतील.
बोगस कर्जवाटप घोटाळ्यात संचालक सहभागी
धरणगाव तालुक्यात टिश्यू कल्चर केळीसाठी २०० कोटी रुपयांचे बोगस कर्ज वाटप करण्यात आले. त्यावेळी एकनाथराव खडसे हे जिल्हा बँकेत संचालक होते. त्यावेळी हा प्रकार त्यांच्या लक्षात आला नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बोगस कर्ज वाटपात तत्कालीन संचालक सहभागी असण्याची शक्यता गुलाबरावपाटीलयांनीव्यक्त केली.
तर शेतकरी सावकाराच्या दारात उभा राहिल
सध्या बँकेने शेतकर्‍याच्या बांधावर जाऊन तसेच पीकपेरा पाहून कर्जवाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत शेतकर्‍यांनी कर्ज फेड केल्यास १ एप्रिलपासून त्यांना नव्याने कर्ज देण्यात येईल असे जिल्हा बँकेतर्फे सांगण्यात आले. त्यानुसार अनेक शेतकर्‍यांनी कर्जाचीएकरी७५ हजारांपर्यंत रक्कम भरली आहे. कर्जफेड झाल्यानंतर जिल्हा बँक आता ४० हजार रुपये कर्ज देणार आहे. त्यामुळे उर्वरित ३५ हजारांकरीता शेतकर्‍यांना सावकाराच्या दारात उभे रहावे लागणार आहे. त्यानंतर शेतकर्‍याने आत्महत्या केल्यास जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकांना केला.