शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज न दिल्यास बँकेचे शेअर्स परत करणार गुलाबराव पाटील यांचा इशारा : पीक कर्जाचे पुनर्गठन तत्काळ करा; अन्यथा शेतकर्‍यांचा मोर्चा काढणार

By admin | Updated: April 19, 2016 00:48 IST

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे यंदा बांधावर जाऊन केळीची लागवड झाली आहे किंवा नाही याबाबत चौकशी करून पीककर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने शेतकर्‍यांना तत्काळ पीककर्ज न दिल्यास तसेच पीककर्जाचे पुनर्गठन न केल्यास सभासद शेतकर्‍यांसह शेअर्स परत करण्यात येतील व जिल्हा बँकेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आमदार गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे यंदा बांधावर जाऊन केळीची लागवड झाली आहे किंवा नाही याबाबत चौकशी करून पीककर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने शेतकर्‍यांना तत्काळ पीककर्ज न दिल्यास तसेच पीककर्जाचे पुनर्गठन न केल्यास सभासद शेतकर्‍यांसह शेअर्स परत करण्यात येतील व जिल्हा बँकेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आमदार गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
जिल्हा बँकेतर्फे धरणगाव तालुक्यात टिश्यू कल्चर केळीसाठी गतकाळात २०० कोटी रुपयांचे कर्जवाटप केल्याप्रकरणी ११ गटसचिवांना निलंबित केले आहे. तसेच शेतकर्‍यांना पीकपेरा पाहून पीककर्जाचे वाटप करण्याच्या बँकेच्या निर्णयाचा जाब विचारण्यासाठी आमदार गुलाबराव पाटील हे सोमवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख व जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांना जाब विचारला.

९० कोटींच्या शेअर्सच्या बळावर एक हजार कोटींचे कर्ज
गुलाबरावपाटीलम्हणाले,जिल्हा बँकेचे सभासद असलेल्या शेतकर्‍यांची ९० कोटींच्या जवळपास शेअर्सची रक्कम आहे. शेतकर्‍यांच्या या रकमेच्या बळावर जिल्हा बँक शिखर बँकेकडून एक हजार कोटी रुपये घेत आहे. शेतकर्‍याच्या उतार्‍यावर चार पट बोजा लावण्यात येत असतो. मात्र त्यानंतरही पुनर्गठन केले जात नाही. एक लाखांचे कर्ज देत असताना चार लाखांचा ई-करार बँकेकडून केला जात असतो. सध्या दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहे. कर्जाचेपुनर्गठन न केल्यास जिल्हा बँकेवर मोर्चा काढून शेअर परत करण्यातयेतील.
बोगस कर्जवाटप घोटाळ्यात संचालक सहभागी
धरणगाव तालुक्यात टिश्यू कल्चर केळीसाठी २०० कोटी रुपयांचे बोगस कर्ज वाटप करण्यात आले. त्यावेळी एकनाथराव खडसे हे जिल्हा बँकेत संचालक होते. त्यावेळी हा प्रकार त्यांच्या लक्षात आला नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बोगस कर्ज वाटपात तत्कालीन संचालक सहभागी असण्याची शक्यता गुलाबरावपाटीलयांनीव्यक्त केली.
तर शेतकरी सावकाराच्या दारात उभा राहिल
सध्या बँकेने शेतकर्‍याच्या बांधावर जाऊन तसेच पीकपेरा पाहून कर्जवाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत शेतकर्‍यांनी कर्ज फेड केल्यास १ एप्रिलपासून त्यांना नव्याने कर्ज देण्यात येईल असे जिल्हा बँकेतर्फे सांगण्यात आले. त्यानुसार अनेक शेतकर्‍यांनी कर्जाचीएकरी७५ हजारांपर्यंत रक्कम भरली आहे. कर्जफेड झाल्यानंतर जिल्हा बँक आता ४० हजार रुपये कर्ज देणार आहे. त्यामुळे उर्वरित ३५ हजारांकरीता शेतकर्‍यांना सावकाराच्या दारात उभे रहावे लागणार आहे. त्यानंतर शेतकर्‍याने आत्महत्या केल्यास जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकांना केला.