शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
2
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
3
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
4
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
5
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
6
Crime News : संतापजनक! महिलेला घरी सोडतो सांगून जंगलात घेऊन गेले; तिघांकडून सामुहिक बलात्कार, जळगावातील घटना
7
आजपासून IPO गुंतवणुकीसाठी खुला, लॅपटॉप रिपेअरिंगमधून कोट्यवधी कमावते कंपनी; GMP ₹१०० पेक्षाही जास्त
8
पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळीची चाचणी यशस्वी; शरीरात गेल्यावर कसं करते काम?
9
टँक फुल अन् आंबा घाटापर्यंतचा प्रवास! स्कोडा कायलॅकने चकीत केले; परत पुण्यात येताना एवढे मायलेज दिले...
10
"मी म्हटलं गणपती स्वत: मला घ्यायला येईल आणि खरंच...", संकर्षणने सांगितला गणपतीपुळ्याचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग
11
कष्टाचं फळ! हात मोडला, दीड वर्ष शाळा सोडली, स्टेशनवर राहण्याची आली वेळ; होणार डॉक्टर
12
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
13
Wife Crime: तिने पतीला घरातच पुरलं, पण एका चुकीमुळे सगळं उघडं पडलं; नालासोपारातील हत्येची Inside Story
14
टाटा, LG, PhonePe सह अनेक कंपन्यांचे IPO येणार! 'या' वर्षातील सर्वात मोठा IPO हंगाम, बंपर कमाईची संधी!
15
हे आहेत ८८ वर्षांचे माजी IPS अधिकारी, रोज सकाळी स्वच्छतेसाठी उतरतात रस्त्यावर; Video पाहून तुम्हीही भावुक व्हाल...
16
जॉब सोडला अन् शेती केली, MBA पास तरुणीची कमाल; टोमॅटो विकून करतेय कोट्यवधींची कमाई
17
"मराठीसारखं काम करु नका यार", हिंदी दिग्दर्शकाचं बोलणं ऐकून छाया कदमने शूटिंगच थांबवलं
18
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला तुमच्यावरही होऊ शकते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतकथा आणि लाभ!
19
'वृत्तपत्रातून पती-सासऱ्याची माफी मागा', पदाचा गैरवापर करणाऱ्या IPS पत्नीला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
20
Crime News : पत्नी पतीसमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवायची; नाराज पतीने उचलले टोकाचे पाऊल

दहशतवादाशिवाय दुसरा मुद्दा आल्यास पाकशी चर्चा नाही- सुषमा स्वराज

By admin | Updated: August 22, 2015 18:38 IST

भारत व पाकदरम्यान एनएसए स्तरावर दहशतवाद या एका मुद्याशिवाय इतर कोणत्याही मुद्यावर (हुर्रियत नेते व जम्मू-काश्मीर) बोलायचे असल्यास पाकशी चर्चा होणार नाही, असे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ -  भारत व पाकिस्तानदरम्यान एनएसए स्तरावर दहशतवाद या एकाच मुद्यावर चर्चा होऊ शकते, इतर कोणत्याही मुद्यावर (हुर्रियत नेते व जम्मू-काश्मीर) चर्चा करायची असल्यास दोन्ही देशांदरम्यान ही चर्चा होणार नाही, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट शब्दांत पाकिस्तानला सुनावले आहे. भारताने पाकिस्तानसमोर कोणतीही अट ठेवली नसून दोन्ही देशांदरम्यान होणारी ही चर्चा शिमला व उफा करारानुसारच होईल असे स्पष्ट करत भारताला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडे केवळ आजची रात्र असल्याचे सांगितले असून आता पाकिस्तान यावर काय भूमिका घेते, सरताज अझिज भारतात येतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे.
२३ ऑगस्ट रोजी भारत पाकदरम्यान एनएसए स्तरावर चर्चा होणार असून काश्मीरचा मुद्दा वगळून दोन्ही देशांदरम्यान चर्चा होऊ शकत नाही असे पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आज दुपारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पत्रकार परिषद घेत आपण चर्चेसाठी पाकिस्तानचे स्वागत करतो, त्यांच्यासमोर कोणतीही अट ठेवली नसून सिमला व उफा करारांनुसारच चर्चा होईल असे सांगितले. 'उफा' येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार चर्चेतील अडथळा दूर करण्यासाठी दहशतावादाच्या मुद्यावर चर्चा होणे आवश्यक आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अझिज यांचे आम्ही स्वागत करतो, पण भारताशी चर्चेआधी त्यांनी हुर्रियतच्या नेत्यांची भेट घेणे हे 'सिमला' कराराचे उल्लंघन असल्याने आम्ही त्या भेटीला विरोध करतो. 'सिमला' करारानुसार भारत-पाकिस्तान चर्चेदरम्यान हुर्रियत किंवा इतर कोणालाही तिसरी पार्टी बनवू नका. ही चर्चा दोन देशांमध्येच झाली पाहिजे असे स्वराज म्हणाल्या. भारत-पाकदरम्यान होणारी चर्चा टाळण्यासाठी पाक प्रयत्न करत आहे, असा आरोपही स्वराज यांनी केला.
जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर चर्चा करण्यापासून भारत दूर पळत नाहीये, मात्र दहशतवाद व हिंसेतून मुक्तता मिळाल्याशिवाय, सीमेवर शांतता प्रस्थापित झाल्याशिवाय काश्मीरच्या मुद्यावर चर्चा होऊ शकत नाही, असे स्वराज यांनी स्पष्ट केले. 
दरम्यान दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर पाकिस्तानचा खोटेपणा उघड झालेला असताना भारताची या मुद्यावर काय भूमिका असेल असे विचारण्यात आले असता याप्रकरणीचे सर्व पुरावे केंद्र सरकार तपासून बघेल आणि त्यानंतर आवश्यकता वाटल्यास ही माहिती पुराव म्हणून पाकिस्तान सरकारला देऊ, असे स्वराज यांनी सांगितले.