शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

अर्थमंत्री असतो, तर राजीनामा दिला असता

By admin | Updated: February 3, 2017 00:46 IST

अर्थसंकल्पातील काही पावलांचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मनमोकळे कौतुक केले. मात्र नोटाबंदीचा निर्णय झाला, त्या वेळी मी अर्थमंत्री असतो तर राजीनामा

- शीलेश शर्मा, नवी दिल्लीअर्थसंकल्पातील काही पावलांचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मनमोकळे कौतुक केले. मात्र नोटाबंदीचा निर्णय झाला, त्या वेळी मी अर्थमंत्री असतो तर राजीनामा दिला असता, असेही ते म्हणाले. चिदंबरम म्हणाले की, काही पावले चांगली आहेत. उदा. ३ लाख रुपयांच्या वर रोख रक्कम घेण्यावरील बंदी, पीक विमा योजना, १ कोटी घरांची निर्मिती, रेल्वे आणि रस्ते निर्मितीवर अधिक खर्चाची तरतूद. त्याचवेळी काही तरतुदींवर टीका करताना ते म्हणाले की, तरुण आणि शेतकरी यांच्याशी संबंधित मुद्देच त्यातून अदृश्य झाले आहेत. मोदी यांचे सरकार नोटाबंदीच्या निर्णयाच्या अपयशामुळे धडा शिकले आहे, असे दिसते. यामुळे अर्थसंकल्पात घाईने असे कोणतेच पाऊल उचलण्यात आलेले नाही. पण सुधारणांच्या रस्त्यावरून सरकारने आपले पाऊल मागे घेतले आहे हेदेखील खरे आहे. सरकारसमोर अर्थव्यवस्थेने गंभीर स्वरूपाची आव्हाने उभी केली आहेत.चिदंबरम यांनी १० मुद्दे समोर मांडले व सरकार यावर खूपच वाईट पद्धतीने पराभूत झाले आहे, असे सांगितले. नोटाबंदीमुळे शेती, शेतमजूर, स्वयंरोजगार, छोट्या व मध्यम उद्योगांवर परिणाम झाला आहे; परंतु या अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी काहीही उपाययोजना नाही. शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आली आहे. किमान आधारभूत किमतीचा उल्लेखदेखील जेटली यांनी केला नाही. दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ, असे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. परंतु २०१५-२०१६ वर्षात केवळ १.५ लाखच नोकऱ्या सरकार देऊ शकले.- जीडीपीचे जे आकडे अर्थसंकल्पात दिले आहेत, त्याची चेष्टा करताना चिदंबरम म्हणाले की, वेगवेगळ्या दस्तावेजांत वेगवेगळी आकडेवारी आहे. नेमका कोणता आकडा खरा आहे हे आकलनशक्तीच्या बाहेरचे काम आहे.चिदंबरम यांनी जोरदार थट्टा उडवताना मोदी सरकार संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर आधी टीका करायचे व त्याच आकडेवारीला आपले यश मानायचे. उदा. मनरेगा, आधार, इंदिरा आवास योजना (आता या योजनेचे नाव प्रधानमंत्री आवास योजना आहे). यू टर्न घेण्याची ही कला मोदी सरकारकडे फारच छान आहे, असे ते म्हणाले.