शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
2
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
3
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
4
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
5
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
6
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
7
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
8
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
9
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
10
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
11
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
12
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
13
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
14
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
15
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
16
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
17
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
18
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
19
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!

पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 06:14 IST

मुद्द्याची गोष्ट : कुत्र्याचे शेपूट हे वाकडे ते वाकडेच, या म्हणीप्रमाणे पाकिस्तानचे वर्तन आहे. यासाठी उपाय म्हणून पाकिस्तानी राज्यकर्ते म्हणजेच त्यांच्या सैन्याला धडा शिकविणे गरजेचे आहे. यासह पाकिस्तानचे तीन तुकडे होणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून पाकची युद्ध क्षमता कमी होईल आणि आपल्यावर होणारे हल्ले थांबतील.

ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त)हलगाम येथे जो अतिरेकी पहल्ला झाला त्यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे, याविषयी कुणाच्या मनात शंका नाहीये. प्रश्न असा आहे की, पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा? कारण एवढ्या वर्षांपासून दहशतवादी हल्ले सुरू आहेत. आपण दोन सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर काही काळ हे हल्ले थांबले होते. पण, आता परत अतिरेकी हल्ले सुरू झाले आहेत. कुत्र्याचे शेपूट हे वाकडे ते वाकडेच, या म्हणीप्रमाणे पाकिस्तानचे वर्तन आहे. यासाठी उपाय म्हणून, पाकिस्तानी राज्यकर्ते म्हणजेच त्यांच्या सैन्याला धडा शिकविणे गरजेचे आहे. यासह पाकिस्तानचे तीन तुकडे होणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. जेणेकरून पाकची युद्ध क्षमता कमी होईल आणि आपल्यावर होणारे हल्ले थांबतील.

पाकिस्तानी सैन्याचे अथवा तेथील राज्यकर्त्यांचे नुकसान होणे यासाठी गरजेचे आहे की, दरवेळी पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्य लढते. आपण त्यांचे २००-२५० दहशतवादी मारतो; पण, भारतीय सैन्यालादेखील रक्त सांडावे लागते, यात पाकिस्तानी सैन्याचे मात्र काहीच नुकसान होत नाही. पाकिस्तानात भाडोत्री दहशतवादी अगदी स्वस्त दरात (३ ते ४ हजारांत) मिळतात. पाकिस्तानचे नुकसान होण्यासाठी आपल्याकडे असलेल्या पर्यायांमध्ये, युनायटेड नेशन्स स्तरावर सिक्युरिटी काऊन्सिलकडे आपण प्रस्ताव सादर करून, पाकिस्तान म्हणजे दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश म्हणून नॉमिनेट करण्यास सांगू शकतो.जेणेकरून संपूर्ण जग पाकिस्तानवर आर्थिक बहिष्कार टाकेल. हा एक मोठा पर्याय ठरू शकतो. दुसरा पर्याय म्हणजे, भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत सिंधू नदी करार आहे, तो करार मोडून पाकिस्तानला जाणारे पाणी आपण थांबवू शकतो, यामुळे पाकिस्तानात पाण्याची मोठी समस्या निर्माण होईल.

तिसरा पर्याय म्हणजे, वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक बहिष्कार पाकिस्तानवर टाकले जाऊ शकतात. कोणताही व्यापार पाकिस्तानसोबत केला नाही, तरी त्यात त्या देशाचे मोठे नुकसान होईल.

आपल्याकडे सगळी क्षमता

मिलिटरी उपायांबाबत बोलायचे तर अनेक उपाय आहेत. जसे, पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, आपल्यासमोर जे पाकिस्तानी सैन्य उभे आहे त्यांच्यावर तोफखान्याच्या, क्षेपणास्त्रांच्या मदतीने हल्ला करणे अथवा लाँग रेंज हत्यारांच्या मदतीने हल्ला करणे, थेट एलओसी ओलांडून पाकिस्तानात जाऊन पारंपरिक युद्धासारखा हल्ला करणे अथवा एक मोठे युद्धच करणे अशी सगळी क्षमता आपल्याकडे आहे. यापैकी नेमके काय करता येईल याचे विश्लेषण करून कोणता उपाय करायचा हे ठरवावे लागेल. जेणेकरून पाकिस्तानची वागणूक सुधारेल.

पाकिस्तानच्या हस्तकांना कठोर शिक्षा मिळायला हवी

पाकला चीनची मदत आहे. भारतातही पाकचे हस्तक असल्याने, त्यांना शोधून कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. पहलगाम हल्ल्याचा विचार केला तर, दहशतवादी पाकिस्तानातून येऊन हल्ला करू शकत नाहीत. त्यांना कुणीतरी राहायला जागा दिली, जेवायला दिले, गाईड म्हणून मदत केली, दारूगोळा पुरवण्याचे काम केले.२ भारतीय सैन्याच्या पाठीशी संपूर्ण भारतीय उभे राहून पाकविरोधात कारवाई करण्यासाठी मॉरल, फिजिकल अथवा आर्थिक यापैकी जो सपोर्ट पाहिजे तो देतील. भारतीयांनीही आपापसातील वाद थांबवून एकत्र येणे गरजेचे आहे. जेणेकरून पुढील काही वर्षात पाकिस्तानला मोठा धडा शिकवता येईल.- शब्दांकन : नितीश गोवंडे

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान