शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 06:14 IST

मुद्द्याची गोष्ट : कुत्र्याचे शेपूट हे वाकडे ते वाकडेच, या म्हणीप्रमाणे पाकिस्तानचे वर्तन आहे. यासाठी उपाय म्हणून पाकिस्तानी राज्यकर्ते म्हणजेच त्यांच्या सैन्याला धडा शिकविणे गरजेचे आहे. यासह पाकिस्तानचे तीन तुकडे होणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून पाकची युद्ध क्षमता कमी होईल आणि आपल्यावर होणारे हल्ले थांबतील.

ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त)हलगाम येथे जो अतिरेकी पहल्ला झाला त्यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे, याविषयी कुणाच्या मनात शंका नाहीये. प्रश्न असा आहे की, पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा? कारण एवढ्या वर्षांपासून दहशतवादी हल्ले सुरू आहेत. आपण दोन सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर काही काळ हे हल्ले थांबले होते. पण, आता परत अतिरेकी हल्ले सुरू झाले आहेत. कुत्र्याचे शेपूट हे वाकडे ते वाकडेच, या म्हणीप्रमाणे पाकिस्तानचे वर्तन आहे. यासाठी उपाय म्हणून, पाकिस्तानी राज्यकर्ते म्हणजेच त्यांच्या सैन्याला धडा शिकविणे गरजेचे आहे. यासह पाकिस्तानचे तीन तुकडे होणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. जेणेकरून पाकची युद्ध क्षमता कमी होईल आणि आपल्यावर होणारे हल्ले थांबतील.

पाकिस्तानी सैन्याचे अथवा तेथील राज्यकर्त्यांचे नुकसान होणे यासाठी गरजेचे आहे की, दरवेळी पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्य लढते. आपण त्यांचे २००-२५० दहशतवादी मारतो; पण, भारतीय सैन्यालादेखील रक्त सांडावे लागते, यात पाकिस्तानी सैन्याचे मात्र काहीच नुकसान होत नाही. पाकिस्तानात भाडोत्री दहशतवादी अगदी स्वस्त दरात (३ ते ४ हजारांत) मिळतात. पाकिस्तानचे नुकसान होण्यासाठी आपल्याकडे असलेल्या पर्यायांमध्ये, युनायटेड नेशन्स स्तरावर सिक्युरिटी काऊन्सिलकडे आपण प्रस्ताव सादर करून, पाकिस्तान म्हणजे दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश म्हणून नॉमिनेट करण्यास सांगू शकतो.जेणेकरून संपूर्ण जग पाकिस्तानवर आर्थिक बहिष्कार टाकेल. हा एक मोठा पर्याय ठरू शकतो. दुसरा पर्याय म्हणजे, भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत सिंधू नदी करार आहे, तो करार मोडून पाकिस्तानला जाणारे पाणी आपण थांबवू शकतो, यामुळे पाकिस्तानात पाण्याची मोठी समस्या निर्माण होईल.

तिसरा पर्याय म्हणजे, वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक बहिष्कार पाकिस्तानवर टाकले जाऊ शकतात. कोणताही व्यापार पाकिस्तानसोबत केला नाही, तरी त्यात त्या देशाचे मोठे नुकसान होईल.

आपल्याकडे सगळी क्षमता

मिलिटरी उपायांबाबत बोलायचे तर अनेक उपाय आहेत. जसे, पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, आपल्यासमोर जे पाकिस्तानी सैन्य उभे आहे त्यांच्यावर तोफखान्याच्या, क्षेपणास्त्रांच्या मदतीने हल्ला करणे अथवा लाँग रेंज हत्यारांच्या मदतीने हल्ला करणे, थेट एलओसी ओलांडून पाकिस्तानात जाऊन पारंपरिक युद्धासारखा हल्ला करणे अथवा एक मोठे युद्धच करणे अशी सगळी क्षमता आपल्याकडे आहे. यापैकी नेमके काय करता येईल याचे विश्लेषण करून कोणता उपाय करायचा हे ठरवावे लागेल. जेणेकरून पाकिस्तानची वागणूक सुधारेल.

पाकिस्तानच्या हस्तकांना कठोर शिक्षा मिळायला हवी

पाकला चीनची मदत आहे. भारतातही पाकचे हस्तक असल्याने, त्यांना शोधून कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. पहलगाम हल्ल्याचा विचार केला तर, दहशतवादी पाकिस्तानातून येऊन हल्ला करू शकत नाहीत. त्यांना कुणीतरी राहायला जागा दिली, जेवायला दिले, गाईड म्हणून मदत केली, दारूगोळा पुरवण्याचे काम केले.२ भारतीय सैन्याच्या पाठीशी संपूर्ण भारतीय उभे राहून पाकविरोधात कारवाई करण्यासाठी मॉरल, फिजिकल अथवा आर्थिक यापैकी जो सपोर्ट पाहिजे तो देतील. भारतीयांनीही आपापसातील वाद थांबवून एकत्र येणे गरजेचे आहे. जेणेकरून पुढील काही वर्षात पाकिस्तानला मोठा धडा शिकवता येईल.- शब्दांकन : नितीश गोवंडे

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान