शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

...तर 22 वर्षापूर्वीच पाक झाला असता अण्वस्त्रहीन

By admin | Updated: January 30, 2017 13:13 IST

भारतीय हवाई दल त्यावेळी मिग-29 लढाऊ विमान ताफ्यात दाखल होण्याच्या प्रतिक्षेत होते. अमेरिकेच्या एफ-16 पेक्षा मिग-29 अधिक अत्याधुनिक होते.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 30 - भारतीय हवाई दलाने 1984 साली पाकिस्तानच्या अणवस्त्र प्रकल्पांवर हल्ला करण्याची तयारी केली होती अशी माहिती सीआयएच्या गोपनीय कागदपत्रातून समोर आली आहे. सीआयए या अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने त्यावेळी मिळवलेल्या माहितीमधून तसा निष्कर्ष काढला होता. 
 
तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सीआयएने गुप्चर माहितीचे विश्लेषण करुन हा निष्कर्ष काढला होता.  भारताने असा हल्ला चढवला असता तर पाकिस्तानचे अणवस्त्र प्रकल्प पूर्णपणे नष्ट झाले असते किंवा मोठया प्रमाणावर हानी पोहोचवून अनेक वर्षापर्यंत पाकिस्तानला अणवस्त्र तंत्रज्ञानापासून वंचित ठेवता आले असते. 
 
भारतीय हवाई दल त्यावेळी मिग-29 लढाऊ विमान ताफ्यात दाखल होण्याच्या प्रतिक्षेत होते. अमेरिकेच्या एफ-16 पेक्षा मिग-29 अधिक अत्याधुनिक होते. पाकिस्तानकडे त्यावेळी एफ-16 लढाऊ विमाने होती. सीआयएनुसार काहुता आणि पीनस्टेच असे ते दोन प्रकल्प होते. 
 
विमानाने भारतापासून अर्ध्यातासाच्या अंतरावर हे दोन्ही प्रकल्प होते. त्यावेळी पाकिस्तानपेक्षा भारतीय हवाई दल अधिक सामर्थ्यवान आणि सशक्त होते. भारताने असा हल्ला केला असता तर पाकिस्तानला आपल्या प्रकल्पाचे रक्षण करता आले नसते असा सीआयएचा निष्कर्ष होता.