शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

जयललिता असत्या तर धाड टाकायची हिंमत झाली असती का ? - पी रामा मोहन राव

By admin | Updated: December 27, 2016 15:50 IST

आयकर विभागाने घरावर धाड टाकल्यानंतर पदावरुन हटवण्यात आलेले तामिळनाडूचे सचिव पी रामा मोहन राव यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात भूमिका घेतली आहे

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 27 - आयकर विभागाने घरावर धाड टाकल्यानंतर पदावरुन हटवण्यात आलेले तामिळनाडूचे सचिव पी रामा मोहन राव यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. 'टाकण्यात आलेली धाड ही घटनेविरोधात जाऊन करण्यात आलेला अत्याचार असल्याचं', त्यांनी म्हटलं आहे. 'केंद्र सरकार राज्य प्रशासनाचा काही आदर करत नाही. राज्य सरकार आहे कुठे ?', असा सवालही त्यांनी विचारला आहे. 
 
आपल्या बदलीचा निषेध करत बोलताना 'या राज्य सरकारमध्ये मला बदलीची ऑर्डर देण्याची हिंमत नाही. मला अजूनपर्यंत अशी कोणतीच ऑर्डर मिळालेली नाही', असं म्हटलं आहे. 'मी अजूनही सचिव असून माझी नियुक्ती जयललितांनी केली होती', असं सांगत आपण कोणत्याही दबावाखाली झुकणार नसल्याचं सांगितलं आहे. माझ्यामुळे राज्यात भूकंप येऊ शकतो. माजी मुख्यमंत्री जयललिता जिवंत असत्या तर ही धाड टाकण्याची हिंमत झाली असती का ? असा सवाल पी रामा मोहन राव यांनी विचारला आहे.
 
'जयललितांच्या अनुपस्थितीत राज्यात काहीच सुरक्षित नाही आहे. जर माझ्यासोबत असं होऊ शकतं, तर मग अण्णाद्रुमूकच्या बाकीच्या शिलेदारांचं काय होणार ?', असंही ते बोलले आहेत. 'जर आयकर विभागाला मुख्य सचिवांच्या घरावर धाड टाकायची होती तर त्यांनी राज्य सरकारला प्रथम पदावरुन हटवण्य़ास सांगणं गरजेचं आहे. धाड टाकण्याआधी मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे. पण मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेण्यात आलं होतं की नव्हतं माहिती नाही', असं सांगितलं आहे. माझा अडथळा होत असल्याने माझ्यावर कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.