शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

माझा फायदा हवा असेल तर भाजपाचे सरकार आणा - हरयाणात नरेंद्र मोदी

By admin | Updated: October 4, 2014 13:13 IST

हरयाणापासून मी अत्यंत जवळ आहे, परंतु मला तुमच्यापर्यंत पोचायचं असेल तर मध्ये अडथळा नको असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना भारतीय जनता पक्षाचं सरकार आणण्याचं आवाहन केलं आहे

ऑनलाइन टीम
करनाल (हरयाणा), दि. ४ - हरयाणापासून मी अत्यंत जवळ आहे, परंतु मला तुमच्यापर्यंत पोचायचं असेल तर मध्ये अडथळा नको असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना भारतीय जनता पक्षाचं सरकार आणण्याचं आवाहन केलं आहे. हरयाणामध्ये निवडणूक प्रचाराची सुरुवात मोदींनी केली असून नंतर ते महाराष्ट्रातही तीन सभा घेणार आहेत. केंद्रातल्या सत्तेचा लाभ राज्यात पोचायला हवा असेल तर राज्यांतही भाजपाचेच सरकार हवे अशी अप्रत्यक्ष भूमिका मोदींनी आपल्या भाषणातून व्यक्त केली आहे.
भारत सरकारने बासमतीच्या निर्यातीवर बंदी घातल्याची खोटी माहिती विरोधक पसरवत असल्याचे सांगत अशी कोणतीही गोष्ट केली नसल्याचे मोदी म्हणाले. हरयाणामध्ये सध्या काँग्रेसचे सरकार असून इथे आपले कुठलेही नियंत्रण नाहीये, त्यामुळे तुम्हाला बदल हवा असेल तर भाजपाचंच सरकार यायला हवं अशी साद मोदी यांनी घातली. जगभरातून आज भारताला महत्त्व दिलं जातंय, त्याचं कारण मोदी नाहीयेत तर केंद्रातलं स्थिर सरकार आहे. त्यामुळे भारतीय जनतेला जगभरातून मिळणारं महत्त्व अमेरिका, जपान व चीनच्या सहकार्यातून दिसत असल्याचं मोदी म्हणाले.
त्यामुळे हरयाणाला जर वैभव बघायचं असेल, केंद्रातल्या सरकारचा फायदा व्हावा हवा असेल तर इथेही संपूर्ण भाजपाचं सरकार यायला हवं असं मोदी म्हणाले.
हरयणामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात काम होत असून, अमेरिकेसोबत मी नुकताच एक करार केला असून हरयाणामध्ये कर्करोगावर प्रचंड संशोधन करण्यात येत असल्याचं मोदी यांनी सांगितले.
बेरोजगारी, कमी उत्पन्न, शिक्षणाचा अभाव, पायाभूत सुविधांचा अभाव आणि शेतक-यांचे हाल या सगळ्यासाठी गेली १० वर्षे सत्तेत असलेली काँग्रेस जबाबदार असल्याची टीका करत मोदींनी काँग्रेसला हरवत भाजपाला संपूर्ण बहुमत देण्याची मागणी हरयाणाच्या जनतेकडे केली आहे.