शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला अस्थिर, तर मला बदनाम करण्याचा डाव

By admin | Updated: February 22, 2016 03:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंतुष्ट एनजीओ आणि काळाबाजार करणाऱ्यांवर टीका करीत आरोप केला की, सरकारला अस्थिर तर मला बदनाम करण्याचा कट केला जात आहे.

बारगढ (ओडिशा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंतुष्ट एनजीओ आणि काळाबाजार करणाऱ्यांवर टीका करीत आरोप केला की, सरकारला अस्थिर तर मला बदनाम करण्याचा कट केला जात आहे. मात्र, अशा कारस्थानांना न जुमानता मी माझे काम करीत राहणार आहे, असे ते म्हणाले. छत्तीसगढच्या दौऱ्यानंतर ओडिशात बारगढ येथे एका शेतकरी मेळाव्यात बोलताना मोदी म्हणाले की, काही लोक आणखीही हे वास्तव स्वीकारायला तयार नाहीत की, एक चहावाला इसम देशाचा पंतप्रधान झाला आहे. त्यामुळेच या इसमाला बाजूला करण्यासाठी हे लोक कारस्थान करीत आहेत. शेतकऱ्यांसाठी आपल्या सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

गरिबांसाठी पाच कोटी घरेरायपूर : गरिबांसाठी २०२२ पर्यंत पाच कोटी घरे बांधणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायपूर येथे रविवारी ‘प्रधानमंत्री आवास योजने’ची कोनशिला बसविताना केली. त्यांनी छत्तीसगडच्या डोंगरगड येथे देशभरातील ३०० गावांच्या विकासासाठी ‘रर्बन मिशन’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन केले. या गावांना विकास केंद्र मानून शहरांप्रमाणे नियोजन केले जाणार असल्याचे सांगतानाच त्यांनी माझे सरकार गरीब, दलित, आदिवासी आणि समाजातील अन्य दुर्बल घटकांसाठी कार्य करीत असल्याची ग्वाहीही दिली. सरकारने गरिबांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने स्वच्छ भारत, रर्बन मिशन यासारख्या विविध योजना आणल्या आहेत. या कार्यक्रमाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग आणि केंद्रीय नगरविकासमंत्री वीरेंद्रसिंग उपस्थित होते. पैशाचा तपशील मागताच एनजीओ दुखावले गेले मोदी म्हणाले की, एनजीओ विदेशातून पैसा मिळवीत आहेत आणि सरकार त्याबाबतचा हिशेब मागत आहे. तथापि, जेव्हापासून आम्ही या पैशांचा तपशील मागणे सुरू केले आहे तेव्हापासून सगळे एकजूट झाले आहेत आणि म्हणत आहेत की, ‘मोदींना मारा, ते आम्हाला हिशेब मागत आहेत.’ देशाला हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे की, जो पैसा आला तो खर्च कुठे झाला? अर्थात, हे कायद्यातच आहे. सर्व एनजीओ आता एकत्र आले आहेत आणि कारस्थान करीत आहेत की, मोदींना कसे संपविता येईल? सरकारला कसे हटविता येईल? आणि मोदींना बदनाम कसे करता येईल? या देशातील आजारावरच्या उपचारासाठी जनतेने मला निवडले आहे. त्यामुळे थांबणार नाही, थकणार नाही आणि झुकणारही नाही. मोदी म्हणाले की, मी जाणून आहे की, विरोधकांना नेमके काय खुपत आहे? मात्र, मी देशाला लुटण्याची आणि बरबाद करण्याची परवानगी देऊ शकत नाही. कशी असेल रर्बन मिशन योजनाचार लगतच्या गावांचा नगरसमूह म्हणून विकास करताना अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जातील. अशा ३०० ग्रामीण केंद्रांची उभारणी केली जाईल.दरवर्षी १०० केंद्रांचा विकास केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. गावांचा अशा पद्धतीने विकास केल्यास आयुष्याच्या स्तरात खूप मोठा बदल घडून येईल.