शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

वडिलांनी वाहतुकीचे नियम पाळले असते तर मुलीचा जीव वाचला असता - हेमामालिनी

By admin | Updated: July 8, 2015 12:13 IST

त्या मुलीच्या वडिलांनी वाहतुकीचे नियम पाळले असते तर हा अपघात टळला असता व चिमुकलीचे प्राण वाचले असे सांगत हेमामालिनी यांनी अपघातासाठी त्याच कुटुंबाला जबाबदार ठरवले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ८ - राजस्थानमधील दौसा येथे झालेल्या कार अपघातात जखमी झालेल्या अभिनेत्री व खा. हेमामालिनी यांनी या अपघातासाठी त्या कुटुंबालाच जबाबदार ठरवले आहे. 'त्या मुलीच्या वडिलांनी जर वाहतुकीचे नियम पाळले असते तर एका चिमुरडीचा जीव वाचला असता' असे ट्विट करत हेमामालिनी यांनी अपघाताचे खापर त्या कुटुंबावरच फोडले आहे. 

गेल्या आठवड्यात हेमामालिनी आग्रा येथून जयपूरला जात असताना दौसा येथे त्यांच्या मर्सिडीजने अल्टो कारला उडवले. या धडकेत अल्टो कारमधील चार वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला तसेच हेमामालिनींसह पाच  जखमी झाले. हेमामालिनी यांच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार करण्यात आले.
प्रकृती सुधारल्यानंतर हेमामालिनी यांनी ट्विटरवरून त्या अपघाताचे खापर मृत मुलीच्या कुटुंबियांवरच फोडले. 'या अपघातात हकनाक जीव गमवावा लागलेल्या त्या चिमुरडीसाठी व अपघातातील जखमींसाठी मला  वाईट वाटते. जर त्या चिमुरडीच्या वडिलांवनी वाहतुकीचे नियम पाळले असते तर हा अपघाता टळला असता आणि त्या चिमुकल्या बालिकेचे प्राणही वाचले असते' असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच आपल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणा-या चाहत्यांचे आभार मानत आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणारी मीडिया व इतर काही लोकांवरही हेममालिनी यांनी जोरदार टीका केली. 
दरम्यान या अपघाताप्रकरणी हेमामालिनी यांच्या कारचालकाविरोधात अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.