शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

वडिलांनी वाहतुकीचे नियम पाळले असते तर मुलीचा जीव वाचला असता - हेमामालिनी

By admin | Updated: July 8, 2015 12:13 IST

त्या मुलीच्या वडिलांनी वाहतुकीचे नियम पाळले असते तर हा अपघात टळला असता व चिमुकलीचे प्राण वाचले असे सांगत हेमामालिनी यांनी अपघातासाठी त्याच कुटुंबाला जबाबदार ठरवले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ८ - राजस्थानमधील दौसा येथे झालेल्या कार अपघातात जखमी झालेल्या अभिनेत्री व खा. हेमामालिनी यांनी या अपघातासाठी त्या कुटुंबालाच जबाबदार ठरवले आहे. 'त्या मुलीच्या वडिलांनी जर वाहतुकीचे नियम पाळले असते तर एका चिमुरडीचा जीव वाचला असता' असे ट्विट करत हेमामालिनी यांनी अपघाताचे खापर त्या कुटुंबावरच फोडले आहे. 

गेल्या आठवड्यात हेमामालिनी आग्रा येथून जयपूरला जात असताना दौसा येथे त्यांच्या मर्सिडीजने अल्टो कारला उडवले. या धडकेत अल्टो कारमधील चार वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला तसेच हेमामालिनींसह पाच  जखमी झाले. हेमामालिनी यांच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार करण्यात आले.
प्रकृती सुधारल्यानंतर हेमामालिनी यांनी ट्विटरवरून त्या अपघाताचे खापर मृत मुलीच्या कुटुंबियांवरच फोडले. 'या अपघातात हकनाक जीव गमवावा लागलेल्या त्या चिमुरडीसाठी व अपघातातील जखमींसाठी मला  वाईट वाटते. जर त्या चिमुरडीच्या वडिलांवनी वाहतुकीचे नियम पाळले असते तर हा अपघाता टळला असता आणि त्या चिमुकल्या बालिकेचे प्राणही वाचले असते' असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच आपल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणा-या चाहत्यांचे आभार मानत आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणारी मीडिया व इतर काही लोकांवरही हेममालिनी यांनी जोरदार टीका केली. 
दरम्यान या अपघाताप्रकरणी हेमामालिनी यांच्या कारचालकाविरोधात अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.