शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

दलितांना हत्यारे दिली असती तर देशावरील आक्रमण रोखता आलं असत - आरएसएस

By admin | Updated: April 13, 2016 09:47 IST

भारतीय समाजातील अनेक घटकांना आणि मुख्यत: दलितांना लढण्याची परवानगी न दिल्याने परकीय आणि मुस्लिम अतिक्रमण करण्यात यशस्वी झाले असं आंबेडकरांचं म्हणण होतं असा दावा आरएसएसने केला आहे

ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १३ - 'भारतीय समाजातील अनेक घटकांना आणि मुख्यत: दलितांना लढण्याची परवानगी न दिल्याने परकीय आणि मुस्लिम अतिक्रमण करण्यात यशस्वी झाले', असं आंबेडकरांचं म्हणण होतं असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) केला आहे. आरएसएसने मुखपत्र ऑर्गनायझर मधून हा दावा केला आहे. 'जर अस्पृश्यांना हत्यारांपासून वंचित ठेवलं नसत तर देशावर परकीय शक्तीने राज्य केलं नसत', असं आंबेडकरांनी म्हंटल्याच आरएसएसने सांगितलं आहे. 
 
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) आंबेडकरांबद्दलची आपली आस्था सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. मुस्लिमांच अतिक्रमण रोखण्यासाठी आंबेडकरांचा काय दृष्टीकोन होता हे सांगण्याचा प्रयत्न आरएसएसने केला आहे. 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशभरात साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने आरएसएसने आंबेडकरांच्या लढ्यापासून ते योगदानापर्यंतची माहिती मुखपत्रात छापली आहे.
 
आरएसएसने आंबेडकरांच्या आयुष्याची माहिती दोन भागांत विभागली आहे. पहिल्या भागात आंबेडकर समाज आणि देशासाठी कसे जगले याबद्दल सांगण्यात आलं आहे. तर दुस-या भागात देशाचा विकास, सुरक्षा, एकता याबद्दलचे त्यांचे विचार मांडण्यात आले आहेत.  
आरएसएसने डावे पक्ष आणि काही मुस्लिम संघटनांवर टीका करत आंबेडकरांच्या नावाचा फायदा घेत असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे हिंदूंना बळकट करण्यासाठी तसंच दलितांनी ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करु नये यासाठी आरएसएस हा प्रयत्न करत असल्याचं मत काही तज्ञांनी दिलं आहे.