शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

भाजपची सत्ता आल्यास बिहारी मुलींशी लग्न लावून देऊ

By admin | Updated: July 6, 2014 11:58 IST

हरियाणामध्ये भाजपची सत्ता आल्यास बिहारमधील तरुणींशी लग्न लावून देऊ असे वादग्रस्त विधान भाजप नेते ओमप्रकाश धनखड यांनी केले आहे.

 

ऑनलाइन टीम
गुडगाव, दि. ६ - केंद्रात सत्ता आल्यावर भाजप नेत्यांच्या जिभेवरचा ताबा सुटू लागला असून भाजपचे गुडगाव येथील नेते ओमप्रकाश धनखड यांच्या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. हरियाणामध्ये भाजपची सत्ता आल्यास बिहारमधील तरुणींशी लग्न लावून देऊ असे वादग्रस्त विधान धनखड यांनी केले आहे.
भाजपच्या शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ओम प्रकाश धनखड हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात असून मोदींच्या गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या कामात धनखड यांच्याकडे मोलाची जबाबदारी देण्यात आली होती. धनखड यांनी हरियाणा येथे एका कार्यक्रमात महिलांविषयी वादग्रस्त विधान केले आहे. हरियाणात स्त्री - पुरुष यांचे सरासरी प्रमाण कमी असल्याने अनेक तरुण अविवाहीत राहतात. यावर तोडगा सुचवताना धनखड म्हणाले, हरियाणात भाजपची सत्ता आल्यास हरियाणातील अविवाहित तरुणांचे बिहारमधील तरुणींशी लग्न लावून दिले जातील. त्यामुळे हरियाणातील एकही तरुण अविवाहित राहणार नाही. 
धनखड यांच्या विधानावर अनेक सामाजिक संघटनांनी तीव्र निषेध दर्शवला आहे. धनखड यांनी २४ तासांत माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन सुरु करु असा इशारा संघटनांनी दिला आहे. भाजपचे मुंबईतील नेते आशिष शेलार यांनीदेखील वादग्रस्त विधान करुन पक्षाची कोंडी केली होती. मुंबईत ५ रुपयांत जेवण मिळू शकते असे विधान शेलार यांनी केले होते.