शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भाजपची सत्ता आल्यास बिहारी मुलींशी लग्न लावून देऊ

By admin | Updated: July 6, 2014 11:58 IST

हरियाणामध्ये भाजपची सत्ता आल्यास बिहारमधील तरुणींशी लग्न लावून देऊ असे वादग्रस्त विधान भाजप नेते ओमप्रकाश धनखड यांनी केले आहे.

 

ऑनलाइन टीम
गुडगाव, दि. ६ - केंद्रात सत्ता आल्यावर भाजप नेत्यांच्या जिभेवरचा ताबा सुटू लागला असून भाजपचे गुडगाव येथील नेते ओमप्रकाश धनखड यांच्या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. हरियाणामध्ये भाजपची सत्ता आल्यास बिहारमधील तरुणींशी लग्न लावून देऊ असे वादग्रस्त विधान धनखड यांनी केले आहे.
भाजपच्या शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ओम प्रकाश धनखड हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात असून मोदींच्या गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या कामात धनखड यांच्याकडे मोलाची जबाबदारी देण्यात आली होती. धनखड यांनी हरियाणा येथे एका कार्यक्रमात महिलांविषयी वादग्रस्त विधान केले आहे. हरियाणात स्त्री - पुरुष यांचे सरासरी प्रमाण कमी असल्याने अनेक तरुण अविवाहीत राहतात. यावर तोडगा सुचवताना धनखड म्हणाले, हरियाणात भाजपची सत्ता आल्यास हरियाणातील अविवाहित तरुणांचे बिहारमधील तरुणींशी लग्न लावून दिले जातील. त्यामुळे हरियाणातील एकही तरुण अविवाहित राहणार नाही. 
धनखड यांच्या विधानावर अनेक सामाजिक संघटनांनी तीव्र निषेध दर्शवला आहे. धनखड यांनी २४ तासांत माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन सुरु करु असा इशारा संघटनांनी दिला आहे. भाजपचे मुंबईतील नेते आशिष शेलार यांनीदेखील वादग्रस्त विधान करुन पक्षाची कोंडी केली होती. मुंबईत ५ रुपयांत जेवण मिळू शकते असे विधान शेलार यांनी केले होते.