शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

ईडीने जप्त केली १२ हजार कोटींची संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:10 IST

सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गेल्या १५ महिन्यांत जवळपास १२ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. १0 वर्षात जितक्या रकमेची संपत्ती या विभागातर्फे जप्त केली गेली, त्यापेक्षाही हा आकडा मोठा आहे.

सुरेश भटेवरा ।नवी दिल्ली : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गेल्या १५ महिन्यांत जवळपास १२ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. १0 वर्षात जितक्या रकमेची संपत्ती या विभागातर्फे जप्त केली गेली, त्यापेक्षाही हा आकडा मोठा आहे.संसदेत शुक्रवारी एका प्रश्नाला उत्तर देतांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी नमूद केले की, गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या करदात्यांवर अस्थायी अथवा तात्पुरते जप्ती आदेश जारी केल्यानंतर ईडीने ११,0३२.२७ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. ईडीच्या अधिकृत वेबसाईटनुसार, आर्थिक वर्ष २00५ ते २0१५ च्या दरम्यान जप्त केलेली संपत्ती जवळपास ९ हजार कोटींची आहे. ईडीने चालू वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात ९६५.८४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली.सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, चुकीच्या मार्गाने पैसे कमवल्याची माहिती प्राप्त होताच धाडी घाला व आवश्यकता भासल्यास कठोर कारवाई करा, असे आदेश ईडीच्या उच्चपदस्थांनी आपल्या अधिकाºयांना दिले आहेत. आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत आयकर विभाग, सीबीआय व सक्तवसुली संचलनालयात पुरेपूर समन्वय राहिल, याची काळजी सर्व विभागांनी घेतली आहे.केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयानेही बनावट कंपन्या शोधून काढण्यासाठी याच काळात एक उच्चस्तरीय समिती नियुक्त केली. ही समिती तीनही यंत्रणांच्या संपर्कात आहे. ज्या बनावट कंपन्यांनी विविध मार्गाने परदेशात परस्पर पैसे पाठवले, त्यांच्या विरोधातही ईडीने कारवाई चालवली आहे. एप्रिल २0१७ मधे चेन्नईच्या एका ३६ वर्षीय तरुणाला ईडीने अटक केली. या तरूणाने आपल्या ६ बोगस कंपन्यांव्दारे ७८ कोटींची रक्कम परदेशात पाठवली होती.