शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘सबका खिचडा साफ कर दूंगा’

By admin | Updated: March 27, 2017 04:15 IST

योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर रविवारी प्रथमच त्यांच्या गोरखपूर मठात आले

गोरखपूर : योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर  रविवारी प्रथमच त्यांच्या गोरखपूर मठात आले व ‘ मौका मिला है तो दो महिनोंमे सबका खिचडा साफ कर दूंगा’ असे सांगत त्यांनी सरकार कसे चालवायचे दे दाखवून देण्याची ग्वाही दिली.आपल्या राज्यात गुंडगिरीला अजिबात थारा दिला जाणार नाही व त्यासाठी लवकरच मोठी मोहीम हाती घेतली जाईल, असे संकेत देत आदित्यनाथ म्हणाले की, गुंडगिरी, माफिया यांना आश्रय देणाऱ्यांनी हवे तर उत्तर प्रदेश सोडून जावे. अन्यथा त्यांची रवानगी योग्य ठिकाणी (तुरुंगात) केली जाईल.ते म्हणाले की, ज्याच्या सीमांपासून अंधाराची सुरुवात होते, जेथे रस्त्यांच्या ऐवजी खड्डे सुरु होतात व जेथे महिलांना बाहेर फिरणे असुरक्षित वाटते असे राज्य अशी प्रतिमा गेल्या काही वर्षात उत्तर प्रदेशची तयार केली गेली आहे. मी हे सर्व बदलून टाकण्याचा निश्चय केला आहे.मौज-मस्ती करण्याचे दिवस आता संपले आहेत. आता दिवसाला १८-२० तास काम करण्याची गरज आहे. ज्यांची असे करण्याची तयारी आहे त्यांनीच माझ्यासोबत राहावे. इतरांना मार्ग मोकळे आहेत, असेही आदित्यनाथ म्हणाले.मंत्र्यांच्या घराचे आणि कार्यालयाचे दरवाजे लोकांसाठी सदैव उघडे असायला हवेत. त्यामुळे समाजातील शेवटच्या माणसापर्यंत सरकार पोहोचू शकेल. त्यामुळेच कोणावरही उपाशीपोटी झोपण्याची पाळी येणार नाही व कोणाही मुलीचा विवाह कोणत्याही अडचणीमुळे अडून राहणार नाही. (वृत्तसंस्था)मांस विक्रेत्यांचा संपअवैध आणि यात्रिक कत्तलखान्यांविरुद्ध राज्य सरकारने हाती घेतलेल्या मोहिमेच्या निषेधार्थ उत्तर प्रदेशातील सर्व मांस आणि मासळी विक्रेत्यांनी सोमवारपासून बेमुद संपावर जायचे ठरविले आहे. दरम्यान, लोकांच्या आरोग्याची काळजी म्हणून न्यायालयाच्या आदेशानुसारच कत्तलखान्यांविरुद्ध ही कारवाई केली जात असल्याचे भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा दिल्लीत म्हणाले.