शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

‘सबका खिचडा साफ कर दूंगा’

By admin | Updated: March 27, 2017 04:15 IST

योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर रविवारी प्रथमच त्यांच्या गोरखपूर मठात आले

गोरखपूर : योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर  रविवारी प्रथमच त्यांच्या गोरखपूर मठात आले व ‘ मौका मिला है तो दो महिनोंमे सबका खिचडा साफ कर दूंगा’ असे सांगत त्यांनी सरकार कसे चालवायचे दे दाखवून देण्याची ग्वाही दिली.आपल्या राज्यात गुंडगिरीला अजिबात थारा दिला जाणार नाही व त्यासाठी लवकरच मोठी मोहीम हाती घेतली जाईल, असे संकेत देत आदित्यनाथ म्हणाले की, गुंडगिरी, माफिया यांना आश्रय देणाऱ्यांनी हवे तर उत्तर प्रदेश सोडून जावे. अन्यथा त्यांची रवानगी योग्य ठिकाणी (तुरुंगात) केली जाईल.ते म्हणाले की, ज्याच्या सीमांपासून अंधाराची सुरुवात होते, जेथे रस्त्यांच्या ऐवजी खड्डे सुरु होतात व जेथे महिलांना बाहेर फिरणे असुरक्षित वाटते असे राज्य अशी प्रतिमा गेल्या काही वर्षात उत्तर प्रदेशची तयार केली गेली आहे. मी हे सर्व बदलून टाकण्याचा निश्चय केला आहे.मौज-मस्ती करण्याचे दिवस आता संपले आहेत. आता दिवसाला १८-२० तास काम करण्याची गरज आहे. ज्यांची असे करण्याची तयारी आहे त्यांनीच माझ्यासोबत राहावे. इतरांना मार्ग मोकळे आहेत, असेही आदित्यनाथ म्हणाले.मंत्र्यांच्या घराचे आणि कार्यालयाचे दरवाजे लोकांसाठी सदैव उघडे असायला हवेत. त्यामुळे समाजातील शेवटच्या माणसापर्यंत सरकार पोहोचू शकेल. त्यामुळेच कोणावरही उपाशीपोटी झोपण्याची पाळी येणार नाही व कोणाही मुलीचा विवाह कोणत्याही अडचणीमुळे अडून राहणार नाही. (वृत्तसंस्था)मांस विक्रेत्यांचा संपअवैध आणि यात्रिक कत्तलखान्यांविरुद्ध राज्य सरकारने हाती घेतलेल्या मोहिमेच्या निषेधार्थ उत्तर प्रदेशातील सर्व मांस आणि मासळी विक्रेत्यांनी सोमवारपासून बेमुद संपावर जायचे ठरविले आहे. दरम्यान, लोकांच्या आरोग्याची काळजी म्हणून न्यायालयाच्या आदेशानुसारच कत्तलखान्यांविरुद्ध ही कारवाई केली जात असल्याचे भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा दिल्लीत म्हणाले.