शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

मलाही लाच द्यायला लागली होती - बिहारचे मुख्यमंत्री मांझी

By admin | Updated: August 15, 2014 00:06 IST

अवाच्या सवा आलेलं विजेचं बिल कमी करण्यासाठी याआधी मीपण वीजमंडळाच्या अधिका-यांना लाच दिली आहे, असे खुद्द बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनीच म्हटले आहे.

ऑनलाइन टीम
पाटणा, दि. १४ - अवाच्या सवा आलेलं विजेचं बिल कमी करण्यासाठी याआधी मीपण वीजमंडळाच्या अधिका-यांना लाच दिली आहे, असे खुद्द बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनीच म्हटले आहे. विशेष म्हणजे हा प्रकार नितीशकुमार मुख्यमंत्री असताना झाला असून त्यांच्या काळात भ्रष्टाचार कमी झाला हे काही खरं नाही असं ते म्हणाले आहेत. भ्रष्टाचाराला आपण आळा घातल्याचा दावा करणा-या बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांसाठी हा राजकीय सेल्फ गोल झाल्याचे मानण्यात येत आहे. नितीशकुमार आता भाजपाला थोपवण्यासाठी लालूप्रसाद यादवांची साथ घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर मांझी यांचे विधान अडचणीचे ठरेल अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.
नितीश कुमारांच्या काळात विकासाची खूप कामे झाली परंतु भ्रष्टाचार कमी झाला नाही असे त्यांनी सांगितले. मी एका अधिका-याच्या घरावर धाड घालण्यास सांगितले, त्यावेळी करोडो रुपये मिळाल्याचे सांगताना भ्रष्टाचार किती बोकाळलाय हे कळते असेही त्यांनी सांगितले. बिहारमध्ये २१ ऑगस्ट रोजी पोटनिवडणुका होत असून मांझी यांचे वक्तव्य जनता दलाला भोवण्याची भीती आहे.