शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

मला व्यापमंची भीती वाटते- उमा भारती

By admin | Updated: July 7, 2015 12:44 IST

मध्य प्रदेशमधील 'व्यापमं' घोटाळ्यातील मृत्यूसत्रामुळे केंद्रीय मंत्री उमा भारतीही घाबरल्या असून या रहस्यमय घटनांची आपल्याला भीती वाटते असे त्या म्हणाल्या.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - मध्य प्रदेशमधील 'व्यापमं' घोटाळ्यातील या मृत्यूसत्रामुळे देशभरात संतापाचे वातावरण असतानाच या घटनांमुळे केंद्रीय मंत्री उमा भारतीही घाबरल्या आहेत. 'आपण मंत्री असूनही या रहस्यमय घटनांची आपल्याला भीती वाटू लागली आहे' असे उमा भारती यांनी म्हटले आहे.
आत्तापर्यत २८ हून अधिक बळी घेणा-या या व्यापमं घोटाळ्याप्रकरणी एका आरोपीने दिलेल्या जबाबानंतर एफआयआरमध्ये उमा भारतींच्या नावाचाही समावेश करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर उमा भारतींनी आपली भीती व्यक्त केली. ' मी एक मंत्री असूनही मला या प्रकरणाची भीती वाटत आहे. रोज होणा-या मृत्युंमुळे राज्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणात माझे नाव आल्याने मला मोठा धक्का बसला आहे. माझं या प्रकरणाशी काहीही घेणदेणं नसतानाही माझे नाव जोडले जात आहे. हे नक्कीच मोठं कारस्थान आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी माझी पूर्वीपासून मागणी आहे' असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान याप्रकरणातील मृत्यूसत्र अद्याप कायम असून आज एका पोलिस कॉन्स्टेबलने आत्मह्त्या केली आहे. या घोटाळा प्रकरणातील गेल्या चार दिवसातील हा चौथा बळी तरया  प्रकरणातील हा एकूण २९वा बळी आहे. देशभरात या मृत्यूसत्रामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. मध्य प्रदेशमधील तिकमगढ जिल्ह्यातील ओरछा गावातील पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत पांडे यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. विशेष पर्यटन पोलीस पथकात कार्यरत असलेल्या पांडे यांची काही दिवसांपूर्वीच व्यापमं गैरव्यवहाराप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. 
या प्रकरणात गेल्या चार दिवसात चार जणांचे बळी गेले आहेत. शनिवारी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा तर रविवारी जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन अरूण शर्मा यांचा मृतदेह दिल्लीतील हॉटेलमध्ये सापडला होता. त्या पाठोपाठ  सोमवारी एका प्रशिक्षणार्थी महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या मृत्यूमुळे खळबळ मजाली आणि आज एका पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याने या प्रकरणाला अतिशय गंभीर वळण मिळाले आहे. 
दरम्यान या घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ९ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.