शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मला व्यापमंची भीती वाटते- उमा भारती

By admin | Updated: July 7, 2015 12:44 IST

मध्य प्रदेशमधील 'व्यापमं' घोटाळ्यातील मृत्यूसत्रामुळे केंद्रीय मंत्री उमा भारतीही घाबरल्या असून या रहस्यमय घटनांची आपल्याला भीती वाटते असे त्या म्हणाल्या.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - मध्य प्रदेशमधील 'व्यापमं' घोटाळ्यातील या मृत्यूसत्रामुळे देशभरात संतापाचे वातावरण असतानाच या घटनांमुळे केंद्रीय मंत्री उमा भारतीही घाबरल्या आहेत. 'आपण मंत्री असूनही या रहस्यमय घटनांची आपल्याला भीती वाटू लागली आहे' असे उमा भारती यांनी म्हटले आहे.
आत्तापर्यत २८ हून अधिक बळी घेणा-या या व्यापमं घोटाळ्याप्रकरणी एका आरोपीने दिलेल्या जबाबानंतर एफआयआरमध्ये उमा भारतींच्या नावाचाही समावेश करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर उमा भारतींनी आपली भीती व्यक्त केली. ' मी एक मंत्री असूनही मला या प्रकरणाची भीती वाटत आहे. रोज होणा-या मृत्युंमुळे राज्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणात माझे नाव आल्याने मला मोठा धक्का बसला आहे. माझं या प्रकरणाशी काहीही घेणदेणं नसतानाही माझे नाव जोडले जात आहे. हे नक्कीच मोठं कारस्थान आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी माझी पूर्वीपासून मागणी आहे' असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान याप्रकरणातील मृत्यूसत्र अद्याप कायम असून आज एका पोलिस कॉन्स्टेबलने आत्मह्त्या केली आहे. या घोटाळा प्रकरणातील गेल्या चार दिवसातील हा चौथा बळी तरया  प्रकरणातील हा एकूण २९वा बळी आहे. देशभरात या मृत्यूसत्रामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. मध्य प्रदेशमधील तिकमगढ जिल्ह्यातील ओरछा गावातील पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत पांडे यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. विशेष पर्यटन पोलीस पथकात कार्यरत असलेल्या पांडे यांची काही दिवसांपूर्वीच व्यापमं गैरव्यवहाराप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. 
या प्रकरणात गेल्या चार दिवसात चार जणांचे बळी गेले आहेत. शनिवारी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा तर रविवारी जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन अरूण शर्मा यांचा मृतदेह दिल्लीतील हॉटेलमध्ये सापडला होता. त्या पाठोपाठ  सोमवारी एका प्रशिक्षणार्थी महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या मृत्यूमुळे खळबळ मजाली आणि आज एका पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याने या प्रकरणाला अतिशय गंभीर वळण मिळाले आहे. 
दरम्यान या घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ९ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.