शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
4
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
5
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
6
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
7
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
8
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
9
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
10
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
11
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
12
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
13
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
14
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
15
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
16
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
17
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
18
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
20
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...

मला व्यापमंची भीती वाटते- उमा भारती

By admin | Updated: July 7, 2015 12:44 IST

मध्य प्रदेशमधील 'व्यापमं' घोटाळ्यातील मृत्यूसत्रामुळे केंद्रीय मंत्री उमा भारतीही घाबरल्या असून या रहस्यमय घटनांची आपल्याला भीती वाटते असे त्या म्हणाल्या.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - मध्य प्रदेशमधील 'व्यापमं' घोटाळ्यातील या मृत्यूसत्रामुळे देशभरात संतापाचे वातावरण असतानाच या घटनांमुळे केंद्रीय मंत्री उमा भारतीही घाबरल्या आहेत. 'आपण मंत्री असूनही या रहस्यमय घटनांची आपल्याला भीती वाटू लागली आहे' असे उमा भारती यांनी म्हटले आहे.
आत्तापर्यत २८ हून अधिक बळी घेणा-या या व्यापमं घोटाळ्याप्रकरणी एका आरोपीने दिलेल्या जबाबानंतर एफआयआरमध्ये उमा भारतींच्या नावाचाही समावेश करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर उमा भारतींनी आपली भीती व्यक्त केली. ' मी एक मंत्री असूनही मला या प्रकरणाची भीती वाटत आहे. रोज होणा-या मृत्युंमुळे राज्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणात माझे नाव आल्याने मला मोठा धक्का बसला आहे. माझं या प्रकरणाशी काहीही घेणदेणं नसतानाही माझे नाव जोडले जात आहे. हे नक्कीच मोठं कारस्थान आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी माझी पूर्वीपासून मागणी आहे' असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान याप्रकरणातील मृत्यूसत्र अद्याप कायम असून आज एका पोलिस कॉन्स्टेबलने आत्मह्त्या केली आहे. या घोटाळा प्रकरणातील गेल्या चार दिवसातील हा चौथा बळी तरया  प्रकरणातील हा एकूण २९वा बळी आहे. देशभरात या मृत्यूसत्रामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. मध्य प्रदेशमधील तिकमगढ जिल्ह्यातील ओरछा गावातील पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत पांडे यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. विशेष पर्यटन पोलीस पथकात कार्यरत असलेल्या पांडे यांची काही दिवसांपूर्वीच व्यापमं गैरव्यवहाराप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. 
या प्रकरणात गेल्या चार दिवसात चार जणांचे बळी गेले आहेत. शनिवारी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा तर रविवारी जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन अरूण शर्मा यांचा मृतदेह दिल्लीतील हॉटेलमध्ये सापडला होता. त्या पाठोपाठ  सोमवारी एका प्रशिक्षणार्थी महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या मृत्यूमुळे खळबळ मजाली आणि आज एका पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याने या प्रकरणाला अतिशय गंभीर वळण मिळाले आहे. 
दरम्यान या घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ९ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.