शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
3
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
4
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
5
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
6
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
7
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
8
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
9
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

उरी हल्ल्यानंतर मला झोप लागत नव्हती - मनोहर पर्रीकर

By admin | Updated: October 6, 2016 15:08 IST

मी सरळ विचार करतो पण देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आला तर वाकडाही विचार करु शकतो असं केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर बोलले आहेत

ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. 6 - मी सरळ विचार करतो पण देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आला तर वाकडाही विचार करु शकतो असं केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर बोलले आहेत. भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिंकल स्ट्राईकनंतर पहिल्यांदाच मनोहर पर्रीकरांनी जाहीर भाषण केलं. यावेळी बोलताना पर्रीकरांनी सर्जिंकल स्ट्राईकमध्ये एकही जवान शहिद झाला नाही, हे असं फार कमी वेळा होतं असं सांगत लष्कराच्या जवानांचं कौतुक केलं. उत्तरप्रदेशमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मनोहर पर्रीकरांनी उपस्थिती लावली.
 
मोदींच्या नेतृत्तवात देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, तुम्ही चिंता करु नका असं मनोहर पर्रीकर बोलले आहेत. लष्कराच्या शौर्यावर आजपर्यंत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं नव्हतं, पण पहिल्यांदा काही लोक करत आहेत असं सांगत मनोहर पर्रीकरांनी विरोधकांवर टीका केली. उरी हल्ल्यानंतर मला झोप लागत नव्हती, सर्जिकल स्ट्राईक झाली त्यादिवशीही मला झोप लागली नाही असं पर्रीकरांनी सांगितलं आहे. 
 
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान वारंवार युद्धाची भाषा करत होता. त्यानंतर मला काही माजी सैनिकांचे ई-मेल्स आले. यामध्ये त्यांनी तुम्ही चिंता करुन करा गरज असल्यास युद्धासाठी सीमेवर येण्यास आम्ही तयार आहोत असं सांगितलं असल्याचं मनोहर पर्रीकर बोलले आहेत. 
 
संरक्षणमंत्री असल्याने आपल्या बोलण्याचा मर्यादा आहेत सांगत पर्रीकरांनी भाषण थांबवलं. मात्र त्याआधी संरक्षणमंत्री म्हणून मोदींच्या नेतृत्वात जे करावं लागेल ते सर्व करणार असल्याचं आश्वासनही मनोहर पर्रीकरांनी यावेळी दिलं.
 
उत्तरप्रदेशात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपाने तर मुख्यालयात नरेंद्र मोदी आणि मनोहर पर्रीकरांचा लष्कराच्या जवानांसोबत फोटो लावून अभिनंदनही केलं आहे. दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झडू लागले आहेत. मात्र या वादात केंद्रीय मंत्र्यांनी न पडता बोलताना काळजी घेण्याची गरज असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं होतं.