शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

विना शेती व मातीद्वारे चार्‍याची निर्मिती हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर : कुसुंबा गो-शाळेत ५०० गायींसाठी चार्‍याची व्यवस्था

By admin | Updated: March 21, 2016 00:21 IST

विलास बारी

विलास बारी
जळगाव - दुष्काळीस्थिती आणि अन्न धान्यांच्या उत्पादना दरम्यान चार्‍याच्या लागवडीसाठी न मिळणारे शेतीचे क्षेत्र यामुळे गुरांच्या चार्‍यांची टंचाई निर्माण होत आहे. त्यावर पर्याय शोधत कुसुंबा येथील अहिंसातिर्थ गो-शाळेत हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती व मातीचा वापर न करता मक्यापासून चार्‍याची निर्मिती केली जात आहे. प्रायोगिक तत्वावर १० गायींसाठी सध्या हा चारा तयार केला जात असून लवकरच ५०० गायींना पुरेल इतक्या चार्‍यांच्या निर्मितीचा प्रकल्प उभा राहणार आहे.
दुष्काळीस्थितीमुळे चार्‍याची टंचाई
गेल्यावर्षी वार्षिक सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी पाऊस झाला. ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत जिल्हाभरात सरासरी ६६३.३ मि.मी.च्या तुलनेत केवळ ४२६.९४ मि.मी.पाऊस झाला. अवघा ६४ टक्के पाऊस झाल्यामुळे शेतीच्या उत्पादनासोबतच पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली. शेतातील उत्पादन कमी आले. त्यातच पुरेसा चारा नसल्याने गायी व म्हशींच्या संगोपनाची चिंता शेतकर्‍यांना सतावत आहे.

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चार्‍याची उगवण
कुसुंबा येथील गो-शाळेत तीन हजारापेक्षा जास्त गायी, बैल, वासरे आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंशाचे संगोपन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चार्‍याची आवश्यकता भासत असल्याने गो-शाळेकडून जिल्हा व परजिल्ह्यातून ओला व सुका चारा मागवावा लागत आहे. त्यातच गो-शाळेचे व्यवस्थापक अभयसिंग व साहाय्यक व्यवस्थापक प्रवीण पाटील यांनी हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने चार्‍याच्या निर्मितीवर भर दिला.
कशी आहे चारा निर्मितीची प्रक्रिया
सध्या या गो-शाळेत १० गायींसाठी चारा तयार होईल अशी व्यवस्था तयार केली आहे. सुरुवातीला जितका चारा तयार करायचा आहे, त्या प्रमाणानुसार मका काढून तो साफ केला जातो. त्यानंतर रात्रभर या मक्याला पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या ट्रेमध्ये साठवून ठेवण्यात येते. सकाळी पाणी काढून मका विशिष्ट पद्धतीच्या ट्रेमध्ये ठेवण्यात येतो. हे सर्व ट्रे एका रॅकमध्ये ठेवण्यात येतात. त्यानंतर या ठिकाणी लावण्यात आलेल्या स्प्रिकलरच्या साहाय्याने एक तासाच्या अंतराने मका साठविलेल्या ट्रे वर फवारा मारण्यात येत असतो. या दरम्यान चारा तयार होण्याची प्रक्रिया सुरु होते.