शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

हैदराबाद मुक्ती दिन साजरा करणार नाही

By admin | Updated: September 8, 2016 05:10 IST

भाजपने १७ सप्टेंबर हा ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन’ म्हणून अधिकृतपणे साजरा करण्याची केलेली सूचना सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीने फेटाळून लावताना भाजप ‘फूट पाडणारे राजकारण’ करीत असल्याचा आरोप केला.

हैदराबाद : भाजपने १७ सप्टेंबर हा ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन’ म्हणून अधिकृतपणे साजरा करण्याची केलेली सूचना सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीने फेटाळून लावताना भाजप ‘फूट पाडणारे राजकारण’ करीत असल्याचा आरोप केला. नेमस्त स्वभावाच्या तेलंगणातील लोकांचा या मुक्तिदिनावर विश्वास नाही. भारतात ज्या दिवशी तेलंगण विलीन झाले तो दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, असे टीआरएसच्या खासदार कल्वकुंतला कविता म्हणाल्या. त्या तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत.केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते की, १५ आॅगस्ट १९४७ रोजी देश अत्यंत परिश्रमांनी मिळविलेल्या स्वातंत्र्याचा आनंद उपभोगत असताना तत्कालीन हैदराबाद संस्थानातील जनतेला त्या स्वातंत्र्यासाठी १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत वाट बघावी लागली.’’ त्यादिवशी (१७ सप्टेंबर) जुलमी निझामाच्या राजवटीतून हैदराबाद संस्थान मुक्त होऊन भारतात विलीन झाले. १७ सप्टेंबर हा दिवस अधिकृतपणे ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन’ म्हणून साजरा व्हावा अशी मागणी भाजप गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे परंतु काही राजकीय पक्ष देशाच्या एकात्मतेशी संबंधित प्रश्नांकडेही मतपेटीच्या नजरेतून बघतात, असेही नायडू म्हणाले होते.निजामाच्या जुलमी राजवटीमध्ये तेलगू भाषेला शैक्षणिक संस्थांमध्ये माध्यम म्हणून वापरण्यास नाउमेद करण्यात आले होते, असे नायडू यांनी सांगितले. त्यावर निजामबाद मतदारसंघातून निवडून आलेल्या खा. कविता म्हणाल्या की, ‘‘तेलंगणला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात यावा, ही मागणी होत असताना हा दिवस (१७ सप्टेंबर) टीआरएसने विलिनीकरण दिवस म्हणूनच साजरा केला व पक्षाच्या कार्यालयावर राष्ट्रध्वजही फडकावला. कारण आंध्र प्रदेश सरकार या दिवसाला मान्यता देत नाही.’’ (वृत्तसंस्था)