शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या पोकळ आश्वासनांचे शतक!

By admin | Updated: August 31, 2014 03:16 IST

जेव्हा भारतीय जनता पार्टी लोकांना ‘अच्छे दिन आनेवाले हैं,’ असे सांगत होती तेव्हा प्रत्यक्षात तिला ‘अच्छे दिन जानेवाले हैं,’ असेच अभिप्रेत होते.

जेव्हा भारतीय जनता पार्टी लोकांना ‘अच्छे दिन आनेवाले हैं,’ असे सांगत होती तेव्हा प्रत्यक्षात तिला ‘अच्छे दिन जानेवाले हैं,’ असेच अभिप्रेत होते. ही बाब रालोआचा 100 दिवसांचा कारभार पाहिल्यानंतर आता मतदारांच्या पूर्ण लक्षात आली आहे. या 1क्क् दिवसांत लोकांच्या पदरात निव्वळ कृतिशून्य घोषणांखेरीज काहीही पडलेले नाही आणि जी काही थोडीफार कृती केली गेली, ती केवळ सत्तेसाठी भुकेलेल्या भाजपा आणि रा.स्व. संघाच्या लोकांसाठी!   मोदी सरकारच्या शंभर दिवसांच्या कारभारबद्दल काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी  यांची परखड प्रतिक्रिया..
 
गेल्या 100 दिवसांत अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू कमालीच्या महाग झाल्या आहेत. माध्यमांमधून याची चर्चा होत नाही, ही बाब अलाहिदा. सर्वसामान्य माणसाचे जीवन सुखकर तर राहोच, पण सुकर होईल असे काहीही झालेले नाही. ना  अन्नधान्याच्या किमती खाली आल्या, ना भाजीपाला स्वस्त झाला. 
सत्तेच्या पहिल्या 1क्क् दिवसांतच या सरकारने आपला अर्थसंकल्प देशाला सादर केला. पण त्याने जनतेची घोर निराशा केली. ज्याला आपण रालोआ सरकारची नीती वा उपलब्धी म्हणू शकू, असे काही अर्थमंत्र्यांनी देशाला सांगितले नाही. नाही म्हणायला या सरकारने एका आघाडीवर मात्र खरोखरीच काही कामगिरी करून दाखविली आहे आणि ती म्हणजे समाजाचे धर्माधारित आणि जातीधारित ध्रुवीकरण. 
या कार्यात भाजपा, रा. स्व. संघ, विहिंप आणि इतकेच कशाला सरकारमधील काही मंत्र्यांचाही पुढाकार आहे. वादग्रस्त प्रश्न पुन्हा पुन्हा उकरून काढून ही मंडळी समाजाचे विघटन करीत आहेत. याची सुरुवात पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्र्यांनी सत्ताग्रहणानंतर लगेच घटनेतील 37क्वे कलम रद्द करण्याचे सूचित करून केली. त्यानंतर खुद्द सरकारनेच समान नागरी कायदा आणण्याचे संकेत दिले. 
विश्व हिंदू परिषदेने लगोलग या देशात अल्पसंख्याकांना राहायचे असेल तर 
दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणूनच राहावे लागेल, असे जाहीर करून टाकले आणि शिवसेनेच्या खासदारांनी तर रमजानच्या महिन्यात एका मुस्लीम तरुणावर सक्ती करून त्याला त्याचा रोजा तोडण्यास भाग पाडले; आणि सरतेशेवटी रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे आणि सारे भारतीय 
हिंदूच आहेत,’ असे अत्यंत खळबळजनक विधान केले. 
या सर्व उदाहरणांवरून एक स्पष्ट होते की, सत्ताधारी पक्ष व त्यांचे सहप्रवासी या देशाला चमत्कारिक ध्रुवीकरणाच्या दिशेने नेऊ पाहात आहेत. साहजिकच समतोल विचार करणा:या आणि सर्वसमावेशकता जपू पाहणा:या सर्व लोकांनी या जातीयवादाचा आणि मूलतत्त्ववादाचा धोका वेळीच ओळखून त्याचा प्रतिकार करण्याच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत. गेल्या 1क्क् दिवसांच्या या सरकारच्या कामगिरीचा विचार करायचा झाला, तर या सरकारने बहुसंख्य तसेच अल्पसंख्य अशा दोहोंच्याही मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करून ठेवली आहे. 
 
गेल्या 1क्क् दिवसांच्या या सरकारच्या कामगिरीचा विचार करायचा झाला, तर या सरकारने बहुसंख्य तसेच अल्पसंख्य अशा दोहोंच्याही मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करून ठेवली आहे. केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी मोदी यांनी लोकांना ‘अच्छे दिन’ची खोटी स्वप्ने दाखविली.