शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

हा शंभर टक्के राजकीय सूडच!

By admin | Updated: December 9, 2015 23:24 IST

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण हा ‘पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) घेण्यात येत असलेला शंभर टक्के राजकीय सूड’च असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरण हा ‘पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) घेण्यात येत असलेला शंभर टक्के राजकीय सूड’च असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. तथापि न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे, असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. सरकारने मात्र राहुल गांधींचा हा आरोप फेटाळून लावला. सभागृहाचा वेळ वाया घालविण्यापेक्षा नॅशनल हेरॉल्ड मुद्यावर सरकार आणि पीएमओविरुद्धच्या आरोपाबाबतचे पुरावे सादर करा, असे आव्हान सरकारने दिले.न्यायपालिकेला धमकावण्यासाठी काँग्रेस संसदेचा वापर करीत असल्याचा आरोप फेटाळून लावताना राहुल गांधी म्हणाले, ‘हा शंभर टक्के राजकीय सूड आहे. पीएमओकडून घेण्यात येत असलेला शंभर टक्के सूड आहे. माझा न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे. शेवटी काय निर्णय लागतो हे आम्ही बघू. सत्य समोर येईल.’ काँग्रेस न्यायपालिकेला धमकावण्यासाठी संसदेचा वापर करीत असल्याचा आरोप सांसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी केला आहे. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता राहुल गांधी म्हणाले, न्यायपालिकेला कोण धमकावत आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे.रणकंदन सुरूच नॅशनल हेरॉल्डप्रकरणी न्यायालयाने काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पाठविलेल्या समन्सवरून संसदेत निर्माण झालेला संघर्ष दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. काँग्रेसशी तृणमूल काँग्रेसने लोकसभेत हातमिळविणी केल्याचे चित्र बुधवारी बघायला मिळाले.