शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Lokmat Parliamentary Awards: भाजपमध्ये प्रवेश केला की नेते स्वच्छ कसे काय होतात? : सीताराम येचुरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2023 10:32 IST

वरिष्ठ पत्रकार राज चावला यांनी ‘लाेकमत नॅशनल काॅन्क्लेव्ह’मध्ये येचुरी यांची मुलाखत घेतली.

सरकार चुकीची धोरणे राबवीत असेल, चुकीचे निर्णय घेत असेल, सूडबुद्धीने वागत असेल किंवा अन्य कोणतीही लोकशाहीविरोधी कृती करीत असेल, तर त्याविरुद्ध बोलणे विरोधकांचे कर्तव्य आहे. सरकारने या टीकेकडे सकारात्मक दृष्टीने पाहून चुक सुधारली पाहिजे. परंतु, आज सरकारचा विरोध केला की, तोंड दाबण्याचा प्रयत्न होतो. हे दबावतंत्र लोकशाहीला मारक आहे. ज्यांच्यावर आधी ईडी, सीबीआय व इतर तपास यंत्रणा कारवाया करतात, ते भाजपमध्ये प्रवेश केला की स्वच्छ कसे होतात, त्यांचे अपराध कसे पोटात घेतले जातात, असा सवाल भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी उपस्थित केला. वरिष्ठ पत्रकार राज चावला यांनी ‘लाेकमत नॅशनल काॅन्क्लेव्ह’मध्ये येचुरी यांची मुलाखत घेतली. 

काळानुसार लोकशाही पुढे जायला पाहिजे. परंतु, भारतीय लोकशाहीची पीछेहाट होत आहे. सध्याच्या देशातल्या परिस्थितीत लोकशाही बळकट होऊ शकत नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. निवडणुकीतल्या हिंसाचारावर ते म्हणाले की, ही चिंताजनक बाब असून निवडणुका नेहमीच शांततेच्या वातावरणात पार पडल्या पाहिजे. निवडणुकीत केवळ भारतीय जनता पक्षच हिंसा करतो असे नाही. परंतु, हा पक्ष बरेचदा इतर पक्षांवर हिंसाचाराचे तथ्यहीन आरोप करतो. अनेकदा सोशल मीडियामुळे हिंसा होते. सोशल मीडियाचा गैरवापर गंभीर समस्या झाली आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. न्यायालये व चौकशी समित्यांना त्यांचे काम करू दिले पाहिजे. परंतु, वाईट हेतूने केलेल्या कारवाईचे समर्थन होऊ शकत नाही, असे मत येचुरी यांनी मांडले. सरकारच्याच आकडेवारीनुसार देशात दोन कोटी ५० लाख युवक बेरोजगार आहेत. पायाभूत सुविधांवरचा खर्च वाढवला म्हणता तर युवकांना नोकऱ्या का मिळत नाहीत? याचाच अर्थ, सरकार केवळ खोटा प्रचार करते, वास्तव वेगळेच असते, अशी टीकाही त्यांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड