शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

Lokmat Parliamentary Awards: भाजपमध्ये प्रवेश केला की नेते स्वच्छ कसे काय होतात? : सीताराम येचुरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2023 10:32 IST

वरिष्ठ पत्रकार राज चावला यांनी ‘लाेकमत नॅशनल काॅन्क्लेव्ह’मध्ये येचुरी यांची मुलाखत घेतली.

सरकार चुकीची धोरणे राबवीत असेल, चुकीचे निर्णय घेत असेल, सूडबुद्धीने वागत असेल किंवा अन्य कोणतीही लोकशाहीविरोधी कृती करीत असेल, तर त्याविरुद्ध बोलणे विरोधकांचे कर्तव्य आहे. सरकारने या टीकेकडे सकारात्मक दृष्टीने पाहून चुक सुधारली पाहिजे. परंतु, आज सरकारचा विरोध केला की, तोंड दाबण्याचा प्रयत्न होतो. हे दबावतंत्र लोकशाहीला मारक आहे. ज्यांच्यावर आधी ईडी, सीबीआय व इतर तपास यंत्रणा कारवाया करतात, ते भाजपमध्ये प्रवेश केला की स्वच्छ कसे होतात, त्यांचे अपराध कसे पोटात घेतले जातात, असा सवाल भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी उपस्थित केला. वरिष्ठ पत्रकार राज चावला यांनी ‘लाेकमत नॅशनल काॅन्क्लेव्ह’मध्ये येचुरी यांची मुलाखत घेतली. 

काळानुसार लोकशाही पुढे जायला पाहिजे. परंतु, भारतीय लोकशाहीची पीछेहाट होत आहे. सध्याच्या देशातल्या परिस्थितीत लोकशाही बळकट होऊ शकत नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. निवडणुकीतल्या हिंसाचारावर ते म्हणाले की, ही चिंताजनक बाब असून निवडणुका नेहमीच शांततेच्या वातावरणात पार पडल्या पाहिजे. निवडणुकीत केवळ भारतीय जनता पक्षच हिंसा करतो असे नाही. परंतु, हा पक्ष बरेचदा इतर पक्षांवर हिंसाचाराचे तथ्यहीन आरोप करतो. अनेकदा सोशल मीडियामुळे हिंसा होते. सोशल मीडियाचा गैरवापर गंभीर समस्या झाली आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. न्यायालये व चौकशी समित्यांना त्यांचे काम करू दिले पाहिजे. परंतु, वाईट हेतूने केलेल्या कारवाईचे समर्थन होऊ शकत नाही, असे मत येचुरी यांनी मांडले. सरकारच्याच आकडेवारीनुसार देशात दोन कोटी ५० लाख युवक बेरोजगार आहेत. पायाभूत सुविधांवरचा खर्च वाढवला म्हणता तर युवकांना नोकऱ्या का मिळत नाहीत? याचाच अर्थ, सरकार केवळ खोटा प्रचार करते, वास्तव वेगळेच असते, अशी टीकाही त्यांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड