शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Lokmat Parliamentary Awards: भाजपमध्ये प्रवेश केला की नेते स्वच्छ कसे काय होतात? : सीताराम येचुरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2023 10:32 IST

वरिष्ठ पत्रकार राज चावला यांनी ‘लाेकमत नॅशनल काॅन्क्लेव्ह’मध्ये येचुरी यांची मुलाखत घेतली.

सरकार चुकीची धोरणे राबवीत असेल, चुकीचे निर्णय घेत असेल, सूडबुद्धीने वागत असेल किंवा अन्य कोणतीही लोकशाहीविरोधी कृती करीत असेल, तर त्याविरुद्ध बोलणे विरोधकांचे कर्तव्य आहे. सरकारने या टीकेकडे सकारात्मक दृष्टीने पाहून चुक सुधारली पाहिजे. परंतु, आज सरकारचा विरोध केला की, तोंड दाबण्याचा प्रयत्न होतो. हे दबावतंत्र लोकशाहीला मारक आहे. ज्यांच्यावर आधी ईडी, सीबीआय व इतर तपास यंत्रणा कारवाया करतात, ते भाजपमध्ये प्रवेश केला की स्वच्छ कसे होतात, त्यांचे अपराध कसे पोटात घेतले जातात, असा सवाल भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी उपस्थित केला. वरिष्ठ पत्रकार राज चावला यांनी ‘लाेकमत नॅशनल काॅन्क्लेव्ह’मध्ये येचुरी यांची मुलाखत घेतली. 

काळानुसार लोकशाही पुढे जायला पाहिजे. परंतु, भारतीय लोकशाहीची पीछेहाट होत आहे. सध्याच्या देशातल्या परिस्थितीत लोकशाही बळकट होऊ शकत नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. निवडणुकीतल्या हिंसाचारावर ते म्हणाले की, ही चिंताजनक बाब असून निवडणुका नेहमीच शांततेच्या वातावरणात पार पडल्या पाहिजे. निवडणुकीत केवळ भारतीय जनता पक्षच हिंसा करतो असे नाही. परंतु, हा पक्ष बरेचदा इतर पक्षांवर हिंसाचाराचे तथ्यहीन आरोप करतो. अनेकदा सोशल मीडियामुळे हिंसा होते. सोशल मीडियाचा गैरवापर गंभीर समस्या झाली आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. न्यायालये व चौकशी समित्यांना त्यांचे काम करू दिले पाहिजे. परंतु, वाईट हेतूने केलेल्या कारवाईचे समर्थन होऊ शकत नाही, असे मत येचुरी यांनी मांडले. सरकारच्याच आकडेवारीनुसार देशात दोन कोटी ५० लाख युवक बेरोजगार आहेत. पायाभूत सुविधांवरचा खर्च वाढवला म्हणता तर युवकांना नोकऱ्या का मिळत नाहीत? याचाच अर्थ, सरकार केवळ खोटा प्रचार करते, वास्तव वेगळेच असते, अशी टीकाही त्यांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड