शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

व्यवसाय संकटात तरी ‘ईज आॅफ डुर्इंग बिझनेस’ कसे? शरद यादव यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 03:09 IST

जनता दलाचे (यु) बंडखोर नेते शरद यादव यांनी देशात उद्योगव्यवसाय संकटात सापडला असताना देशात व्यवसाय करणे सहज (ईज आॅफ डुर्इंग बिझनेस) बनले असल्याच्या सरकारच्या भूमिकेवर बुधवारी टीका केली आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : जनता दलाचे (यु) बंडखोर नेते शरद यादव यांनी देशात उद्योगव्यवसाय संकटात सापडला असताना देशात व्यवसाय करणे सहज (ईज आॅफ डुर्इंग बिझनेस) बनले असल्याच्या सरकारच्या भूमिकेवर बुधवारी टीका केली आहे. जागतिक बँकेने भारताला नुकतेच ‘ईज आॅफ डुर्इंग बिझनेस’चे रँकिंग दिले आहे.शरद यादव यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मोदी सरकार म्हणते की देशात व्यवसाय, व्यापार करणे सोपे झाले आहे परंतु वस्तुस्थिती ही आहे की सगळीकडे व्यापार, व्यवसाय विस्कळीत झाला आहे. सकल देशी उत्पादन (जीडीपी) दोन टक्के कमी झाले असतानाही सरकार जागतिक बँकेची रेटिंग दाखवून आपलीच पाठ थोपटून घेत आहे. नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) देशाच्या अर्थव्यवस्थेला घातक ठरले आहेत व त्यातून बाहेर पडण्यासाठी किमान दहा वर्षे लागतील, असे यादव म्हणाले.यादव यांनी सांगितले की, सरकार डिजिटल इंडियाबद्दल बोलते परंतु त्याचवेळी लोक अन्नावाचून मरत आहेत. अन्नधान्याने गोदामे भरलेली आहेत परंतु सरकारच्या धोरणांमुळे लोकांना अन्न मिळत नाही. जनतेला आश्वासने देऊन ती न पाळल्याचा आरोप यादव यांनी केला. आश्वासनांची पूर्तता करण्याऐवजी धर्माच्या आधारावर फूट पाडली जात आहे व त्यासाठी ताजमहल व टिपू सुलतानसारखे मुद्दे शोधले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.सगळ्यांनी एकत्र येऊन लढायला हवे..गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्याविरोधात आम्ही आमचे उमेदवार देणार आहोत, असे यादव म्हणाले. निवडणूक चिन्हाबद्दल बोलताना यादव यांनी निवडणूक आयोगाकडे त्यासाठी अपील केल्याचे सांगितले. त्यावर सहा नोव्हेंबर रोजी निर्णय होईल. त्यानंतरच राजकीय धोरण ठरवले जाईल. गुजरातेत भाजपच्याविरोधात सगळ््यांना एकत्र येऊन लढायला पाहिजे.

टॅग्स :GSTजीएसटी