शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

मिशा नसताना मी भ्रष्टाचार कसा केला? तेजस्वी यादवांचा मोदी सरकारला प्रश्न

By admin | Updated: July 12, 2017 14:18 IST

बिहारमध्ये आरजेडी आणि जेडीयू यांचे गठबंधन अतूट असल्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली.

ऑनलाइन लोकमतपटना, दि. 12 - बिहारमध्ये आरजेडी आणि जेडीयू यांचे गठबंधन अतूट असल्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या परिवाराविरोधात कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून सीबीआयने कारवाई केल्यापासून बिहार राजकरणाला नवे वळण मिळाले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तेजस्वी यादव यांनी आज नितिश कुमार यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत आपल्यावरील आरोपाचं खंडण करत केंद्र सरकरवर निशाना साधला आहे. ते म्हणाले, माझ्यावर झालेले स्रव आरोप 2004 मधील आहेत. त्यावेली 12-13 वर्षांचा असेल. त्यावेळी मला मिशा देखील आल्या नव्हत्या. ज्या मुलाला मिशा फुटल्या नाहीत तो  भ्रष्टाचार कसा करेल. यावेळी त्यांनी केंद्र सरकर आपल्याला घाबरल्याचा दावाही केला. भाजपाने लालू प्रसाद यादव परिवाराला नाही तर संपूर्ण बिहारला बदनाम करण्याचा कट केला आहे. आम्ही गरिबाविषयी प्रश्न उपस्थित केले, शेतकऱ्यांविषयी बोललो. पंतप्रधानांनी केलेल्या आश्वासनावर आम्ही बोललो. आम्ही मागासवर्गीय कुटुंबतील असल्यामुळे आमच्यावर कारवाई केली जात असल्याचा आरोप केला आहे.

आणखी वाचा 
 
 
 (लालू प्रसाद यादव गोत्यात! सीबीआयने दाखल केला गुन्हा)
(लालू प्रसाद यादव कंसाचे वंशज - बाबा रामदेव)
(अर्णब गोस्वामींचा धमाकेदार कमबॅक, पहिल्याच शोमध्ये लालू प्रसाद यादव टार्गेट)

लालूप्रसाद यांच्यासह त्यांच्या सर्व कुटुंबीयांवर सीबीआयने छापे घेतल्यापासून तेजस्वीप्रसाद यांना मंत्रिमंडळातून काढावे, यासाठी नितीशकुमार यांच्यावर स्वपक्षीयांकडून दबाव वाढत आहे. दुसरीकडे तेजस्वीप्रसाद राजीनामा देणार नाहीत, असा निर्णय राजदच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तेजस्वीप्रसाद यांना मंत्रिमंडळात ठेवणे, याचा अर्थ भ्रष्टाचारास पाठिंबा देणे होईल, असे जनता दल (युनायटेड) च्या मंत्री व आमदारांचे म्हणणे आहे.सीबीआयने मागच्याच आठवडयात हॉटेलच्या गैरव्यवहार प्रकरणात तेजस्वी, लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेल्वेच्या दोन हॉटेल्सच्या देखभालीचे कंत्राट देण्याच्या मोबदल्यात पाटणा येथील मोक्याचा भूखंड पदरात पाडून घेतल्याचा या तिघांवर आरोप आहे. 2006 मध्ये लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना हा व्यवहार झाला होता.