शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

...कशी होती मंत्री झालेल्या त्या 4 निवृत्त अधिका-यांची कारकीर्द. 

By सुमेध उघडे | Updated: September 4, 2017 20:02 IST

खूप दिवसांपासून उत्सुकता असलेला केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार काल पार पडला. या विस्तारावर ही नेहमी प्रमाणे मोदी-शहा यांच्या धक्का तंत्राचा प्रभाव जाणवला. सर्वात मोठा धक्का होता तो  शपथ घेतलेल्या 9 मंत्र्यांमध्ये 4 माजी अधिका-यांच्या समावेशाचा. यातील दोन जण खासदार आहेत तर दोन जणांना सहा महिन्यात लोकसभा किंवा राज्यसभेवर निवडून यावे लागेल. जाणून घेऊ या ४ अधिका-यांच्या बाबतच्या खास गोष्टी. 

खूप दिवसांपासून उत्सुकता असलेला केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार काल पार पडला. या विस्तारावर ही नेहमी प्रमाणे मोदी-शहा यांच्या धक्का तंत्राचा प्रभाव जाणवला. सर्वात मोठा धक्का होता तो  शपथ घेतलेल्या 9 राज्यमंत्र्यांमध्ये 4 माजी अधिका-यांच्या समावेशाचा. यातील दोन जण खासदार आहेत तर दोन जणांना सहा महिन्यात लोकसभा किंवा राज्यसभेवर निवडून यावे लागेल. जाणून घेऊ या ४ अधिका-यांच्या बाबतच्या खास गोष्टी. 

1. सत्यपाल सिंह ( निवृत्त आयपीएस )सत्यपाल सिंह यांना मानव संसाधन मंत्रालयाचे राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. लहानपणी  शास्त्रज्ञ बनण्याची इच्छा असणारे सत्यपाल 1980 मध्ये महाराष्ट्र केडर मधून आयपीएस बनले. त्यांनी  दिल्ली विद्यापीठातून रसायनशास्त्रात एमफिल केले असून ऑस्ट्रेलियामधून एमबीए  चे सुद्धा शिक्षण घेतले आहे. 

मुंबईमध्ये 90 च्या दशकात छोटा राजन, छोटा शकील व अरुण गवळी यांच्या गैंगची दहशत असताना सिंह क्राइम ब्रांचचे ज्वॉइंट कमिशनर होते.  याच काळात त्यांनी अंडरवर्ल्ड च्या विरोधात स्पेशल टास्क फोर्स बनवली.  दया नायक, प्रदीप शर्मा, विजय साळसकर सारखे एनकाउंटर स्पेशलिस्ट याच दरम्यान मुंबई पोलिसमध्ये निर्माण झाले. सिंह यांनी नक्षली भागात सुद्धा काम केले आहे. नक्षलवाद या विषयात त्यांचा हातखंडा असून त्यांनी नागपूर विद्यापीठातून यावर शोधनिबंध सुद्धा सादर केला आहे.  ते इशरत जहां केसवरील एसआईटीच्या तीन सदस्यातील एक होते.  

31 जानेवारी 2014 ला त्यांनी मुंबई पोलीस कमिशनर असताना पदाचा राजीनामा दिला. लागलीच 2 फेब्रुवारीस त्यांनी मेरठ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाजपमध्ये प्रवेश केला. बागपत मधून लोकसभा निवडणूक लढवत त्यांनी राष्ट्रीय लोकदल चे अध्यक्ष अजीत सिंह यांना 2 लाख पेक्षा जास्त मतांनी हरवले. या विस्तारात त्यांना मंत्री बनवण्यामागे उत्तर प्रदेश मधील पश्चिम भागातील जातीय समीकरण कारणीभूत असू शकतात. या भागात जाट अधिक असून सत्यपाल सुद्धा याच समुदायातून येतात. 

2. राजकुमार सिंह ( निवृत्त आयएएस ) स्वतंत्र प्रभार असलेल्या ऊर्जा खात्याचे मंत्री म्हणून राजकुमार सिंह या विस्तारात मंत्रिमंडळाचा भाग झाले आहेत. ते बिहार मधून 1975 च्या केडरचे आईएएस अधिकारी होते. यूपीएच्या सत्ताकाळात त्यांनी होम सेक्रेट्री पदी काम केले. यांच्या बाबत विशेष नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, 30 ऑक्टोंबर 1990 ला लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या रथयात्रेच्या दरम्यान त्यांनी समस्तीपुर येथे अटक केली होती. यासोबतच नितीशकुमार यांचे तत्कालीन सरकार सत्तेत असताना त्यांनी समस्तीपुर, चंपारण व पटना येथे केलेल्या कामाने सरकारची प्रतिमा चांगलीच उंचावली होती. 

आडवाणी गृहमंत्री असताना 1999 ते 2004 पर्यंत ते गृहमंत्रालयात ज्वॉइंट सेक्रेट्री होते.  यानंतर 30 जून 2011 ते 30 जून 2013 पर्यंत गृह सचिव राहिले. 13 डिसेंबर 2013 मध्ये त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. या प्रवेशासोबतच त्यांनी नितीश सरकारच्या विरोधात आघाडी उघडली व त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आरा येथून जनता दलाच्या मीना सिंह यांचा पराभव केला. नितीशकुमार यांच्या एनए ... प्रवेशानंतर राजकुमार यांच्या मंत्रिमंडळातील समावेश  अनेक  प्रश्नांना जन्म देणारा ठरत आहे. 

3. हरदीप सिंह पुरी (  निवृत्त आयएफएस ) शहर विकास मंत्रालय चे राज्यमंत्री बनलेले हरदीप सिंह यांचे शिक्षण दिल्ली विद्यापीठातून झाले आहे .यासोबतच स्टीफेंस कॉलेजमध्ये त्यांनी अध्यापनाचे काम सुद्धा केले आहे. परंतु, काही दिवसातच त्यांनी परराष्ट्र खात्यात प्रवेश केला. 28 फेब्रुवारी 2013 ला ते निवृत्त झाले. 

परराष्ट्र खात्यात काम अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी ब्राझील, जापान, श्रीलंका व ब्रिटेन सारख्या देशात सेवा प्रदान केली होती. यामुळेच त्यांना विदेश नीति व राष्ट्रीय सुरक्षा या विषयातील जाणकार म्हणून मान्यता आहे.  विशेष बाब म्हणजे शिक्षण घेत असताना ते जेपी यांच्या आंदोलनात सहभागी होते. यासोबतच अरुण जेटली यांच्यासोबत त्यांची खास मैत्री आहे. 2 जानेवारी 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  4. अल्फ़ोंस कन्ननथनम ( निवृत्त आयएएस )अल्फ़ोंस यांना पर्यटन मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे.  ते 1979 च्या केरल केडरचे आईएस अधिकारी होते.  1989 मध्ये केरल मधील ट्टयम जिल्ह्यास 100 टक्के साक्षर करण्याची कामगिरी केल्याने सर्वात प्रथम ते उजेडात आले. टाइम मासिकाने 5 डिसेंबर 1994 च्या त्यांच्या कव्हर स्टोरीमध्ये जागतिक स्तरावरील 100 तरुण नेतृत्वात त्यांचा समावेश केला होता. 

दिल्ली येथे डीडीए चे कमिशनर म्हणून काम करत असताना त्यांनी 14,310 अवैध इमारती तोडल्या होत्या. यामुळे साकारला जवळपास 10,000 करोड़चा फायदा झाला. 2006 मध्ये ते निवृत्त झाले व लागलीच केरळ मधून कंजिरापल्ली येथून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. अपक्ष असताना  मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ने त्यांना पाठिंबा दिला व ते त्यावेळी निवडून आले.  2011मध्ये लोकसभा कार्यकाळ पूर्ण होताच त्यांनी तत्कालीन भाजप अध्यक्ष नितिन गडकरी यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला.