शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

मनपाला हवे हॉटेल व खानावळीवर नियंत्रण

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

शासनाला प्रस्ताव पाठविणार : आरोग्य समितीच्या बैठकीत निर्णयनागपूर : अन्न सुरक्षा कायद्यानुसार शहरातील सर्व हॉटेल, रेस्टारेन्ट व खानावळी इत्यादीवर अन्न व औषधी प्रशासन विभागाचे नियंत्रण आहे. त्यामुळे कारवाई करताना कायदेशीर अडचणी येत असल्याने यावर महापालिकेचे नियंत्रण असावे. असा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्याचे निर्देश शुक्रवारी आरोग्य समितीच्या बैठक ीत ...


शासनाला प्रस्ताव पाठविणार : आरोग्य समितीच्या बैठकीत निर्णय
नागपूर : अन्न सुरक्षा कायद्यानुसार शहरातील सर्व हॉटेल, रेस्टारेन्ट व खानावळी इत्यादीवर अन्न व औषधी प्रशासन विभागाचे नियंत्रण आहे. त्यामुळे कारवाई करताना कायदेशीर अडचणी येत असल्याने यावर महापालिकेचे नियंत्रण असावे. असा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्याचे निर्देश शुक्रवारी आरोग्य समितीच्या बैठक ीत सभापती रमेश सिंगारे यांनी दिले.
सरकारच्या धोरणानुसार मनपा क्षेत्रात औषधी चिठ्ठी मुक्त योजना राबविण्यावर चर्चा करण्यात आली. हा विषय सभागृहात मांडण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील बाजारपेठेत रात्रीला साफसफाई सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात व्यापाऱ्यांत जागृती व्हावी, यासाठी झोन स्तरावर सभा आयोजित करण्याची सूचना सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांनी केली.
शासनाच्या आकृतीबंधानुसार आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील पदे कमी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. विभागाला आवश्यक असलेल्या पदाबाबतचा अहवाल पुढील सभेत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कृती आराखडा तयार करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या. जनजागृती करण्यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचना तिवारी यांनी केली.
उपसभापती साधना बरडे, समती सदस्य शीला मोहोड, विद्या कान्हेरे, श्रावण खापेकर, आरोग्य अधिकारी डॉ. सविता मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक उरकुडे, हिवताप व हत्तीरोग नियंत्रण अधिकारी जयश्री थोटे, डॉ. अनिल चिव्हाणे, डॉ. शिल्पा जिचकार, अन्न निरीक्षक सुधीर फटींग आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
चौकट....
सणासुदीला कत्तलखाने बंद
महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकानुसार प्रजासत्ताक दिन, रामनवमी, महावीर जयंती, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, साधू वासवानी जयंती आदी दिवसांना कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद असतात. या व्यतिरिक्त गोकु ळाष्टमी, आंबेडकर जयंती, बली प्रतिपदा, बौद्ध पौर्णिमा, लक्ष्मीपूजन, गणेश स्थापना दिवस व गुढीपाडवा आदी सणासुदीच्या दिवसांना शहरातील कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. हा प्रस्ताव सभागृहाच्या मंजुरीनंतर सरकारकडे पाठविण्याचे निर्देश सभापतींनी दिले.