शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी हॉस्पिटलच्या मनमानीमुळे १०४ क्रमांकाची योजना संकटात फोन कॉलवर वाजवी दरात रक्त उपलब्ध : हॉस्पिटलचा असहाकार

By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST

पुणे : तातडीने रक्त हवंय.. तर १०४ या टोल फ्रि क्रमांकावर फोन करा अन वाजवी दरात रक्त मिळवा ही महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली. मात्र खाजगी हॉस्पिटलचालक व रक्तपेढयांचे यामुळे नुकसान होत असल्याने त्याव्दारे रक्त घेण्यास हॉस्पिटलकडून रक्त घेण्यास मज्जाव करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

पुणे : तातडीने रक्त हवंय.. तर १०४ या टोल फ्रि क्रमांकावर फोन करा अन वाजवी दरात रक्त मिळवा ही महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली. मात्र खाजगी हॉस्पिटलचालक व रक्तपेढयांचे यामुळे नुकसान होत असल्याने त्याव्दारे रक्त घेण्यास हॉस्पिटलकडून रक्त घेण्यास मज्जाव करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
महराष्ट्र राज्य संक्रमण परिषदेतर्फे जीवन अमृत योजना (ब्लड ऑन कॉल) सुरू करण्यात आली. गरजू रूग्णास दर्जेदार, सुरक्षित रक्त वाजवी दरात तातडीने उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उदद्ेश आहे. राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये ७ जानेवारी २०१४ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
राज्याचे आरोग्य सेवा संचालक सतीश पवार एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शुक्रवारी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे ब्लड ऑन कॉल योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याबदद्ल विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, 'खाजगी हॉस्पिटलकडून या योजनेला सहकार्य मिळत नसल्याने त्याचा प्रतिसाद कमी आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यामध्ये २०७ ठिकाणी ब्लड स्टोरेज उभारले जात आहेत. त्यापैकी १२४ ठिकाणी ते कार्यान्वित झाले आहेत. उर्वरित ठिकाणांचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. यामुळे गर्भवती महिला, अपघातग्रस्त पेशंट यांना तातडीने रक्त उपलब्ध होणे सहज शक्य होणार आहे.'
१०४ क्रमांकावर दुरध्वनी केल्यानंतर संबंधित जिल्हयाच्या रक्तपेढीवर दूरध्वनी हस्तांतरीत करण्यात येतो. त्यानंतर ४० किमी किंवा एक तासाच्या अंतरावरील रूग्णालयांना शीतसाखळीतून रक्त व रक्त घटक उपलब्ध करून दिले जाते. मात्र पेशंट रक्त हवे असल्यास १०४ क्रमांकावरून रक्त मागण्यास हॉस्पिटलकडून मज्जाव केला जात आहे. हॉस्पिटलमधील रक्तपेढीतूनच रक्त घ्यावे याची जबरदस्ती पेशंवट केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत.

चौकट
शिशूवरील उपचारासाठी प्रगत सॉफ्टवेअर
बाळ जन्मल्यानंतर त्यामध्ये काही गंभीर आजार आढळून आले तर त्याला पुढील उपचारासाठी पाठविले जाते. मात्र बर्‍याचदा नातेवाईकांकडून उपचार केले जात नाहीत. बाळावर नातेवाईकांनी उपचार केले की नाही, त्या बाळाची स्थिती कशी आहे याबबातचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवण्यासाठी एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे बालमृत्यु रोखण्यात मोठी मदत होऊ शकेल अशी माहिती अतिरिक्त आरोग्य संचालक अर्चना पाटील यांनी दिली.