शहरं
Join us  
Trending Stories
1
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
2
भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख...
3
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
4
"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी
5
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
6
ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती
7
२०२६ मध्ये भारतीय बाजारात 'धमाका' करण्याच्या तयारीत किआ! घेऊन येतेय ३ ढासू मॉडेल, EV चाही समावेश
8
'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- "खूप वाईट..."
9
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
10
१० वर्षांची प्रतीक्षा संपली, नेपाळला जाणाऱ्यांसाठी खूशखबर; आता बिनधास्त घेऊन जा २००, ५०० ची नोट
11
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
12
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
13
Leopard Pune: 'बिबट्या दिसला तर पळू नका', पुण्यातील आयटी पार्कही दहशतीत! cognizant कंपनीने कर्मचाऱ्यांना काय सांगितलं?
14
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
15
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
16
Latur Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
17
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
18
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
19
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
20
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांचा जी.आर. अडकला

By admin | Updated: February 18, 2015 00:12 IST

नागपूर: २०१४ च्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या पीक हानीसाठी मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. पण त्यानंतर दोन आठवडे झाले तरी अद्याप मदत व पुनर्वसन खात्याने याचा अद्याप जी.आर. काढला नाही. त्यामळे मदत वाटप होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. नागपूर विभागातही गारपिटीचा फटका बसला होता हे येथे उल्लेखनीय.

नागपूर: २०१४ च्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या पीक हानीसाठी मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. पण त्यानंतर दोन आठवडे झाले तरी अद्याप मदत व पुनर्वसन खात्याने याचा अद्याप जी.आर. काढला नाही. त्यामळे मदत वाटप होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. नागपूर विभागातही गारपिटीचा फटका बसला होता हे येथे उल्लेखनीय.
नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात विदर्भासह राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात पीक हानी झाली होती. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी,अशी मागणी हिवाळी अधिवेशन काळात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली होती. अधिवेशन काळात दुष्काळाचा मुद्दा गाजला होता. त्यामुळे शासनाने अधिवेशन काळातच दुष्काळग्रस्तांसाठी मदत जाहीर केली व त्याचे सध्या वाटप सुरूआहे. त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यात कोरडवाहू पिकांसाठी प्रती हेक्टर १० हजार रुपये तर ओलिताखालील पिकांसाठी प्रती हेक्टर १५ हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गारपिटीमुळे मृत्यू झाला असेल तर अडीच लाख रुपये, मोठ्या जनावरांसाठी २५ हजार रुपये, लहान जनावरांसाठी ५ हजार रुपये, पडझड झालेल्या पक्क्या घरासाठी ७० हजार, कच्च्या घरासाठी २५ हजार रुपये व अंशत: पडलेल्या घरासाठी १५ हजार रुपये मदतीची तरतूद आहे. मात्र मदत व पुनर्वसन खात्याने अद्याप त्याचा जी.आर. काढला नाही. जी.आर. निघाल्याशिवाय मदत वाटप सुरू होत नाही. त्यामुळे ही मदत शेतकऱ्यांच्या हाती पडण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. दरम्यान टंचाईग्रस्त आणि गारपीटग्रस्त याबाबत खुलासा होण्याची गरज आहे. सध्या टंचाईग्रस्तांना मदत वाटप सुरू आहे. त्यानंतर गारपीटग्रस्तांसाठी मदत जाहीर झाली आहे. ही मदत सरसकट सर्वांनाच मिळणार की त्यातून टंचाईग्रस्त शेतकऱ्यांना वगळले जाणार याबाबत संभ्रम आहे. याचा खुलासा प्रशासकीय यंत्रणेकडून होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)