शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

भारतीय हुतात्मा सैनिकांचा बांगलादेश करणार सन्मान

By admin | Updated: March 27, 2017 01:37 IST

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद येत्या ७ ते १० एप्रिल दरम्यान भारत दौऱ्यावर येतील तेव्हा त्या बांगलादेश

नवी दिल्ली: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद येत्या ७ ते १० एप्रिल दरम्यान भारत दौऱ्यावर येतील तेव्हा त्या बांगलादेश मुक्ती युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या कुटुंबियांचा गौरव करतील, असे समजते.बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी भारतीय सैन्य दलांमधील एकूण १,६६१ जवानांनी प्राणांची आहुती दिली होती. त्यापैकी सात जवानांच्या कुटुंबांचा शेख हसिना दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ८ एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करतील, असे माहितगार सूत्रांनी सांगितले. यात लष्करातील चार व हवाई दल, नौदल आणि सीमा सुरक्षा दलातील एका हुतात्मा जवानाच्या कुटुंबाचा समावेश असेल. यावेळी या जवानांच्या कुटुंबियांना तीन भाषांमध्ये लिहिलेले सन्मानपत्र व पाच लाख रुपयांचा धनादेश शेख हसिना यांच्या हस्ते दिला जाईल. हुतात्मा झालेले इतर सैनिक कोणकोणत्या भागातील आहेत याचा आढावा घेऊन त्या त्या भागांत नंतर स्वतंत्र कार्यक्रम करून बांगलादेश सरकारमधील मंत्र्यांच्या हस्ते या सैनिकांच्या गौरवाचे कार्यक्रम टप्प्याटप्प्याने आयोजित केले जातील, असे बांगलादेश सरकारने ठरविले आहे. येत्या काही महिन्यांत असे पाच-सहा कार्यक्रम आयोजित केले जातील. याआधी बांगलादेशने त्यांच्या मुक्ती लढ्यात भारतातील ज्या विविध वर्गांतील लोकांचा मोलाचा सहभाग राहिला अशा अनेक मान्यवरांचा ‘बंगमित्र’ पुरस्कार देऊन सत्कार केला होता. त्यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व अटल बिहारी वाजपेयी, विद्यमान पंतप्रधान मोदी व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याखेरीज अनेक लष्करी अधिकारी, राजकीय नेते, कार्यकर्ते, पत्रकार, डॉक्टर व राजनैतिक मुत्सद्यांचा समावेश होता.त्यानंतर मुक्ती लढ्यात धारातीर्थी पडलेल्या भारतीय जवानांचाही यथोचित गौरव करण्याचा बांगला देश सरकारने विचार केला. मोदी यांच्या सन २०१५ मधील बांगलादेश दौऱ्यात त्यावर औपेचारिक निर्णय झाला व त्यानंतर बांगलादेश व भारताच्या संरक्षण मंत्रालयाने एकत्रितपणे याचा तपशिलवार कार्यक्रम तयार केला. यासाठी हसिना सरकारने १०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचेही समजते. (लोकमत न्यूज नेटवर्क)लाखो नागरिकांची निरंकुश कत्तलमार्च ते डिसेंबर १९७१ या काळात झालेल्या बांगलादेश मुक्ती लढ्यात ३ ते ३० लाख लोकांचा नरसंहार केला गेला, असा अंदाज आहे. यात हिंदू, मुस्लिम, बंगाली व बिगर बंगालींचा समावेश होता.पाकिस्तानी लष्कराने पूर्व पाकिस्तानातील नागरिकांविरुद्ध ‘आॅपरेशन सर्चलाइट’ नावाची दडपशाहीची क्रूर मोहीम हाती घेतली. त्यातून मुक्ती संग्राम उभा राहिला.दि. १६ डिसेंबर १९७१ रोजी पूर्व पाकिस्तान मुक्त होऊन स्वतंत्र बांगलादेश झाला. त्या विनाशकारी कालखंडाची आठवण म्हणून ज्या दिवशी ‘आॅपरेशन सर्चलाइट’ सुरु झाले तो २५ मार्चचा दिवस ‘बागलादेश नरसंहार दिन’ म्हणून तेथे पाळला जातो.