शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्र्यांचा पाकवर ठपका

By admin | Updated: June 27, 2016 04:09 IST

पाम्पोरमधील हल्ला हा त्याचेच निदर्शक आहे, असा स्पष्ट आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी पाकिस्तानचे नाव न घेता केला.

फतेहगड साहिब (पंजाब) : आपला शेजारी देश भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. पाम्पोरमधील हल्ला हा त्याचेच निदर्शक आहे, असा स्पष्ट आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी पाकिस्तानचे नाव न घेता केला. सीआरपीएफच्या आठ जवानांचा बळी घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना काही चुका झाल्या किंवा काय, याचा तपास करण्यासाठी एक समिती पाम्पोर येथे पाठविण्यात येईल, असेही राजनाथ सिंह यांनी जाहीर केले.शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पाम्पोर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आल्याबद्दल राजनाथसिंग यांनी सुरक्षा दलांवर स्तुती सुमने उधळली. ते म्हणाले, काही चुका झाल्या काय याचा तपास करण्यासाठी दोन सदस्यांचे पथक पाम्पोर येथे पाठविण्यात यावे, असे निर्देश गृह सचिवांना दिले आहेत. भविष्यात अशा चुका होऊ नयेत आणि अशाप्रकारच्या हल्ल्यांमध्ये आमच्या जवानांवर शहीद होण्याची पाळी येऊ नये यासाठी हे पथक जाणार आहे. ‘आमच्या शूर जवानांचे मी कौतुक करतो. त्यांच्या शौर्याला माझा सलाम. दहशतवाद्यांनी धूर्तपणे जवानांवर हल्ला केला. परंतु आमच्या जवानांनी दोन्ही दहशतवाद्यांना यशस्वीपणे टिपले,’ असे राजनाथसिंग म्हणाले. पंजाबच्या फतेहगड साहिब येथे रविवारी शीख योद्धा बाबा बंदासिंग बहादूर यांच्या ३०० व्या हुतात्मा दिनानिमित्त्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (वृत्तसंस्था)>पाम्पोर हल्ला हा काश्मीरला बदनाम करण्यासाठीचपाम्पोरसारखे दहशतवादी हल्ले काश्मीरला बदनाम करण्यासाठीच घडविण्यात येतात. संभाव्य गुंतवणूकदार आणि पर्यटकांना येथे येण्यापासून रोखणे हा अशा हल्ल्यांमागचा हेतू आहे, असा आरोप जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. मुफ्ती यांनी पाम्पोर हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या आठ जवानांना श्रद्धांजली वाहिली.आपले कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा दलांच्या जवानांना लक्ष्य बनविणे निषेधार्ह आहे. हा रमजानचा पवित्र महिना आहे. या महिन्यात लोक क्षमाशील असतात आणि घडलेल्या पापाची क्षमा मागतात. आपल्याकडून कुणी दुखावला जाणार नाही, याची काळजी घेण्याचा हा महिना आहे. अशा हल्ल्यांमधून काहीही साध्य होणार नाही. केवळ काश्मीरची बदनामी होईल, असे त्या म्हणाल्या.