शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्र्यांचा पाकवर ठपका

By admin | Updated: June 27, 2016 04:09 IST

पाम्पोरमधील हल्ला हा त्याचेच निदर्शक आहे, असा स्पष्ट आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी पाकिस्तानचे नाव न घेता केला.

फतेहगड साहिब (पंजाब) : आपला शेजारी देश भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. पाम्पोरमधील हल्ला हा त्याचेच निदर्शक आहे, असा स्पष्ट आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी पाकिस्तानचे नाव न घेता केला. सीआरपीएफच्या आठ जवानांचा बळी घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना काही चुका झाल्या किंवा काय, याचा तपास करण्यासाठी एक समिती पाम्पोर येथे पाठविण्यात येईल, असेही राजनाथ सिंह यांनी जाहीर केले.शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पाम्पोर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आल्याबद्दल राजनाथसिंग यांनी सुरक्षा दलांवर स्तुती सुमने उधळली. ते म्हणाले, काही चुका झाल्या काय याचा तपास करण्यासाठी दोन सदस्यांचे पथक पाम्पोर येथे पाठविण्यात यावे, असे निर्देश गृह सचिवांना दिले आहेत. भविष्यात अशा चुका होऊ नयेत आणि अशाप्रकारच्या हल्ल्यांमध्ये आमच्या जवानांवर शहीद होण्याची पाळी येऊ नये यासाठी हे पथक जाणार आहे. ‘आमच्या शूर जवानांचे मी कौतुक करतो. त्यांच्या शौर्याला माझा सलाम. दहशतवाद्यांनी धूर्तपणे जवानांवर हल्ला केला. परंतु आमच्या जवानांनी दोन्ही दहशतवाद्यांना यशस्वीपणे टिपले,’ असे राजनाथसिंग म्हणाले. पंजाबच्या फतेहगड साहिब येथे रविवारी शीख योद्धा बाबा बंदासिंग बहादूर यांच्या ३०० व्या हुतात्मा दिनानिमित्त्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (वृत्तसंस्था)>पाम्पोर हल्ला हा काश्मीरला बदनाम करण्यासाठीचपाम्पोरसारखे दहशतवादी हल्ले काश्मीरला बदनाम करण्यासाठीच घडविण्यात येतात. संभाव्य गुंतवणूकदार आणि पर्यटकांना येथे येण्यापासून रोखणे हा अशा हल्ल्यांमागचा हेतू आहे, असा आरोप जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. मुफ्ती यांनी पाम्पोर हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या आठ जवानांना श्रद्धांजली वाहिली.आपले कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा दलांच्या जवानांना लक्ष्य बनविणे निषेधार्ह आहे. हा रमजानचा पवित्र महिना आहे. या महिन्यात लोक क्षमाशील असतात आणि घडलेल्या पापाची क्षमा मागतात. आपल्याकडून कुणी दुखावला जाणार नाही, याची काळजी घेण्याचा हा महिना आहे. अशा हल्ल्यांमधून काहीही साध्य होणार नाही. केवळ काश्मीरची बदनामी होईल, असे त्या म्हणाल्या.