शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्र्यांचा काश्मिरी फुटीरवाद्यांवर हल्लाबोल

By admin | Updated: September 6, 2016 04:42 IST

काश्मीरचा प्रश्न सर्वांनी मिळून सोडवायचा असल्यानेच आम्ही इथे आलो.

श्रीनगर : काश्मीरचा प्रश्न सर्वांनी मिळून सोडवायचा असल्यानेच आम्ही इथे आलो. समाजातील वेगवेगळ्या गटांना आणि व्यक्तींना भेटलो. पण फुटीरवादी मंडळी भेटायला आली नाहीत, इतकेच नव्हे, तर आमच्या शिष्टमंडळातील जे सदस्य त्यांना भेटण्यासाठी गेले, त्यांच्याशीही चर्चा करण्याचे फुटीरवादी मंडळींनी टाळले. त्यांचा काश्मिरियत, इन्सानियत आणि जमुरियतवर (लोकशाही) विश्वास नाही, हेच यातून स्पष्ट झाले आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सोमवारी फुटीरवाद्यांवर जोरदार हल्ला चढवला.काश्मीरमधील सामान्य जनता या फुटीरवाद्यांना कंटाळली आहे. ती भीतीपोटी गप्प आहे. आम्ही काश्मीरमधील प्रत्येकाशी बोलायला तयार आहोत. पण या प्रश्नावर पाकिस्तानशी अजिबात चर्चा होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. माकपचे नेते सीताराम येचुरी, भाकपचे नेते डी. राजा, जद (यू) चे नेते शरद यादव , राष्ट्रीय जनता दलाचे जयप्रकाश यादव आणि एमआयएमचे असाउद्दिन ओवेसी स्वत:हून फुटीरवाद्यांचे म्हणणे ऐकायला गेले होते. त्यांना जा अथवा नका जाऊ, असे आपण काहीही सांगितले नव्हते. पण स्वत:हून चर्चेसाठी आलेल्या नेत्यांना न भेटणे याला माणुसकी वा लोकशाही म्हणत नाहीत. काश्मिरी पाहुणचाराच्या विरोधात हे फुटीरवादी वागले आहेत, असेही ते म्हणाले.फुटीरवाद्यांशी चर्चा करण्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या भूमिकेबद्दल भाजपाची भूमिका विचारता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून प्रत्येकाशी बोलायला आम्ही तयार आहोत, एवढेच उत्तर त्यांनी दिले. काश्मीर हा भारताचा भाग आहे व राहील, येथील जनतेलाही भारतातच राहायचे आहे, असे सांगतानाच, येथील परिस्थिती लवकरच सुधारेल, अशी खात्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली. हे शिष्टमंडळ आज श्रीनगरहून जम्मूला रवाना झाले. (वृत्तसंस्था)>काश्मीरमध्ये केवळ पीडीपीचे सरकार असावे असा एक प्रस्ताव आणि काश्मीरला भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून अधिक स्वायत्तता मिळावी, असा नॅशनल कॉन्फरन्सचा प्रस्ताव आला आहे. त्याबाबत विचार करण्याचे त्यांनी सूचित केले.>‘पावा’मुळे जीव जाणार नाहीपेलेट गन्सला खूप विरोध होत होता. त्यामुळे आम्ही त्याऐवजी पावा शेल्सचा वापर करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे जीवितहानी होणार नाही, असा दावा त्यांनी केला.>खोऱ्याचा भाग केंद्रशासित करा : हिंदू पंडितजम्मूमध्ये हॉटेल व्यावसायिक, पर्यटन संस्थांचे चालक, टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांचे प्रतिनिधी, जम्मू-काश्मीर बार असोसिएशनचे पदाधिकारी यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली आणि खोऱ्यातील अशांततेमुळे व्यवसायावर विपरित परिणाम होत असल्याची कैफियत मांडली. पनुन कश्मीर या काश्मिरी पंडितांच्या संघटनेने आम्ही काश्मीर खोऱ्यात जाण्यास तयार आहोत. मात्र तो भाग केंद्रशासित करावा, अशी मागणी केली आहे. मात्र त्यांचे प्रतिनिधी या शिष्टमंडळाला भेटायला गेले नाहीत.