शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

गृहमंत्र्यांचा काश्मिरी फुटीरवाद्यांवर हल्लाबोल

By admin | Updated: September 6, 2016 04:42 IST

काश्मीरचा प्रश्न सर्वांनी मिळून सोडवायचा असल्यानेच आम्ही इथे आलो.

श्रीनगर : काश्मीरचा प्रश्न सर्वांनी मिळून सोडवायचा असल्यानेच आम्ही इथे आलो. समाजातील वेगवेगळ्या गटांना आणि व्यक्तींना भेटलो. पण फुटीरवादी मंडळी भेटायला आली नाहीत, इतकेच नव्हे, तर आमच्या शिष्टमंडळातील जे सदस्य त्यांना भेटण्यासाठी गेले, त्यांच्याशीही चर्चा करण्याचे फुटीरवादी मंडळींनी टाळले. त्यांचा काश्मिरियत, इन्सानियत आणि जमुरियतवर (लोकशाही) विश्वास नाही, हेच यातून स्पष्ट झाले आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सोमवारी फुटीरवाद्यांवर जोरदार हल्ला चढवला.काश्मीरमधील सामान्य जनता या फुटीरवाद्यांना कंटाळली आहे. ती भीतीपोटी गप्प आहे. आम्ही काश्मीरमधील प्रत्येकाशी बोलायला तयार आहोत. पण या प्रश्नावर पाकिस्तानशी अजिबात चर्चा होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. माकपचे नेते सीताराम येचुरी, भाकपचे नेते डी. राजा, जद (यू) चे नेते शरद यादव , राष्ट्रीय जनता दलाचे जयप्रकाश यादव आणि एमआयएमचे असाउद्दिन ओवेसी स्वत:हून फुटीरवाद्यांचे म्हणणे ऐकायला गेले होते. त्यांना जा अथवा नका जाऊ, असे आपण काहीही सांगितले नव्हते. पण स्वत:हून चर्चेसाठी आलेल्या नेत्यांना न भेटणे याला माणुसकी वा लोकशाही म्हणत नाहीत. काश्मिरी पाहुणचाराच्या विरोधात हे फुटीरवादी वागले आहेत, असेही ते म्हणाले.फुटीरवाद्यांशी चर्चा करण्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या भूमिकेबद्दल भाजपाची भूमिका विचारता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून प्रत्येकाशी बोलायला आम्ही तयार आहोत, एवढेच उत्तर त्यांनी दिले. काश्मीर हा भारताचा भाग आहे व राहील, येथील जनतेलाही भारतातच राहायचे आहे, असे सांगतानाच, येथील परिस्थिती लवकरच सुधारेल, अशी खात्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली. हे शिष्टमंडळ आज श्रीनगरहून जम्मूला रवाना झाले. (वृत्तसंस्था)>काश्मीरमध्ये केवळ पीडीपीचे सरकार असावे असा एक प्रस्ताव आणि काश्मीरला भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून अधिक स्वायत्तता मिळावी, असा नॅशनल कॉन्फरन्सचा प्रस्ताव आला आहे. त्याबाबत विचार करण्याचे त्यांनी सूचित केले.>‘पावा’मुळे जीव जाणार नाहीपेलेट गन्सला खूप विरोध होत होता. त्यामुळे आम्ही त्याऐवजी पावा शेल्सचा वापर करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे जीवितहानी होणार नाही, असा दावा त्यांनी केला.>खोऱ्याचा भाग केंद्रशासित करा : हिंदू पंडितजम्मूमध्ये हॉटेल व्यावसायिक, पर्यटन संस्थांचे चालक, टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांचे प्रतिनिधी, जम्मू-काश्मीर बार असोसिएशनचे पदाधिकारी यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली आणि खोऱ्यातील अशांततेमुळे व्यवसायावर विपरित परिणाम होत असल्याची कैफियत मांडली. पनुन कश्मीर या काश्मिरी पंडितांच्या संघटनेने आम्ही काश्मीर खोऱ्यात जाण्यास तयार आहोत. मात्र तो भाग केंद्रशासित करावा, अशी मागणी केली आहे. मात्र त्यांचे प्रतिनिधी या शिष्टमंडळाला भेटायला गेले नाहीत.