शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

गृहमंत्र्यांचा काश्मिरी फुटीरवाद्यांवर हल्लाबोल

By admin | Updated: September 6, 2016 04:42 IST

काश्मीरचा प्रश्न सर्वांनी मिळून सोडवायचा असल्यानेच आम्ही इथे आलो.

श्रीनगर : काश्मीरचा प्रश्न सर्वांनी मिळून सोडवायचा असल्यानेच आम्ही इथे आलो. समाजातील वेगवेगळ्या गटांना आणि व्यक्तींना भेटलो. पण फुटीरवादी मंडळी भेटायला आली नाहीत, इतकेच नव्हे, तर आमच्या शिष्टमंडळातील जे सदस्य त्यांना भेटण्यासाठी गेले, त्यांच्याशीही चर्चा करण्याचे फुटीरवादी मंडळींनी टाळले. त्यांचा काश्मिरियत, इन्सानियत आणि जमुरियतवर (लोकशाही) विश्वास नाही, हेच यातून स्पष्ट झाले आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सोमवारी फुटीरवाद्यांवर जोरदार हल्ला चढवला.काश्मीरमधील सामान्य जनता या फुटीरवाद्यांना कंटाळली आहे. ती भीतीपोटी गप्प आहे. आम्ही काश्मीरमधील प्रत्येकाशी बोलायला तयार आहोत. पण या प्रश्नावर पाकिस्तानशी अजिबात चर्चा होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. माकपचे नेते सीताराम येचुरी, भाकपचे नेते डी. राजा, जद (यू) चे नेते शरद यादव , राष्ट्रीय जनता दलाचे जयप्रकाश यादव आणि एमआयएमचे असाउद्दिन ओवेसी स्वत:हून फुटीरवाद्यांचे म्हणणे ऐकायला गेले होते. त्यांना जा अथवा नका जाऊ, असे आपण काहीही सांगितले नव्हते. पण स्वत:हून चर्चेसाठी आलेल्या नेत्यांना न भेटणे याला माणुसकी वा लोकशाही म्हणत नाहीत. काश्मिरी पाहुणचाराच्या विरोधात हे फुटीरवादी वागले आहेत, असेही ते म्हणाले.फुटीरवाद्यांशी चर्चा करण्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या भूमिकेबद्दल भाजपाची भूमिका विचारता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून प्रत्येकाशी बोलायला आम्ही तयार आहोत, एवढेच उत्तर त्यांनी दिले. काश्मीर हा भारताचा भाग आहे व राहील, येथील जनतेलाही भारतातच राहायचे आहे, असे सांगतानाच, येथील परिस्थिती लवकरच सुधारेल, अशी खात्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली. हे शिष्टमंडळ आज श्रीनगरहून जम्मूला रवाना झाले. (वृत्तसंस्था)>काश्मीरमध्ये केवळ पीडीपीचे सरकार असावे असा एक प्रस्ताव आणि काश्मीरला भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून अधिक स्वायत्तता मिळावी, असा नॅशनल कॉन्फरन्सचा प्रस्ताव आला आहे. त्याबाबत विचार करण्याचे त्यांनी सूचित केले.>‘पावा’मुळे जीव जाणार नाहीपेलेट गन्सला खूप विरोध होत होता. त्यामुळे आम्ही त्याऐवजी पावा शेल्सचा वापर करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे जीवितहानी होणार नाही, असा दावा त्यांनी केला.>खोऱ्याचा भाग केंद्रशासित करा : हिंदू पंडितजम्मूमध्ये हॉटेल व्यावसायिक, पर्यटन संस्थांचे चालक, टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांचे प्रतिनिधी, जम्मू-काश्मीर बार असोसिएशनचे पदाधिकारी यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली आणि खोऱ्यातील अशांततेमुळे व्यवसायावर विपरित परिणाम होत असल्याची कैफियत मांडली. पनुन कश्मीर या काश्मिरी पंडितांच्या संघटनेने आम्ही काश्मीर खोऱ्यात जाण्यास तयार आहोत. मात्र तो भाग केंद्रशासित करावा, अशी मागणी केली आहे. मात्र त्यांचे प्रतिनिधी या शिष्टमंडळाला भेटायला गेले नाहीत.