गृहराज्यमंत्र्यांनी मालमत्ता दडवली-
By admin | Updated: July 12, 2015 23:56 IST
गृह राज्यमंत्र्यांनी मालमत्ता दडविल्याचा आरोप
गृहराज्यमंत्र्यांनी मालमत्ता दडवली-
गृह राज्यमंत्र्यांनी मालमत्ता दडविल्याचा आरोप मुंबई- गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मालमत्ता दडवून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. आरोपाच्या पुष्टयर्थ सावंत यांनी काही कागदपत्रेही पत्रकार परिषदेत सादर केली. सावंत यांच्या आरोपानुसार,विधान परिषदेचे आमदार होण्यापूर्वी डॉ. पाटील यांनी 2000 मध्ये आपल्या मुलाच्या नावाने अकोला येथे भूखंड खरेदी करताना वडिल म्हणून अण्णासाहेब पवित्रकार हे नाव लिहिले. मात्र, उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मुलाच्या नावे कोणतीही मालमत्ता नसल्याचे सांगितले. 2013 मध्ये त्यांनी हा भूखंड विक्र ीस काढला. मुलगा अल्पवयीन असल्याने डॉ. रणजित पाटील आणि अण्णासाहेब पवित्रकार ही एकच व्यक्ती असल्याचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. शिवाय स्वत:च्या नावात इंग्रजी स्पेलिंगमध्ये किरकोळ बदल करून डॉ. पाटील यांनी अकोला पूर्व आणि मुर्तिजापूर अशा दोन मतदारसंघातील मतदार यादीत नावे लावली, असा आरोपही सावंत यांनी केला. (प्रतिनिधी)कोटती तर तांत्रिक चूक-डॉ. पाटीलकाँग्रेसने केलेले सर्व आरोप डॉ. पाटील यांनी फेटाळून लावले असून दोन मतदारसंघात नाव असणे, ही तर मतदार नाव नोंदणी कर्मचार्यांची तांत्रिक चूक असल्याचे म्हटले आहे. शिवाय, आपण मालमत्तेविषयी कोणतीही माहिती दडवलेली नाही. प्रिंटिंग मिस्टेक पुढे करून विरोधक पराचा कावळा करत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.