शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

हिराखंड एक्सप्रेसला अपघात की घातपात ?

By admin | Updated: January 22, 2017 10:31 IST

जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे सात डबे रुळावरुन घसरुन झालेल्या भीषण अपघातामागे घातपात असण्याची

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 22 -  जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे सात डबे रुळावरुन घसरुन झालेल्या भीषण अपघातामागे घातपात असण्याची शंका व्यक्त होत आहे. हिराखंड एक्सप्रेसला झालेल्य़ा अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र रुळांना नुकसान पोहोचवण्यात आल्याने किंवा तोडफोड केल्याने अपघात झाल्याची शक्यता रेल्वे मंत्रालयाने नाकारलेली नाही.  
 शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास  जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे सात डबे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात  आतापर्यंत 32 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 100 हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातामागे घातपात असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेला अपघात होण्यापूर्वी याच मार्गावरून एक मालगाडी व्यवस्थितपणे मार्गस्थ झाली होती, तसेच ट्रॅकमननेही रेल्वे रुळांची पाहणी केली होती. मात्र हा अपघात होण्यापूर्वी  एक्स्प्रेसच्या चालकाने रुळांवर फटाके फुटण्यासारखा आवाज ऐकला होता. 
दरम्यान, हिराखंड एक्स्प्रेसला जिथे अपघात झाला तो भाग नक्षलवादाने प्रभावित विभागात असून, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वाभूमीवर रेल्वे रुळांना नुकसान पोहोचवण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या अपघातामागे  घातपात असण्याच्या शक्यतेला बळ मिळत आहे. याआधी नोव्हेंबर महिन्यात कानपूरजवळ इंदुर-पटना एक्स्प्रेसला झालेल्या भीषण रेल्वे अपघातामागे पाकिस्तानी गुप्तहेर संघटना असल्याचे समोर आले होते.