शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

बलशाली राष्ट्रासाठी हिंदूंनी एकजूट व्हावे-भागवत

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

खरगोन : बलशाली राष्ट्र घडविण्यासाठी हिंदूंनी आपसातील सर्व मतभेद विसरून एकजूट केली पाहिजे, असे आवाहन रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.

खरगोन : बलशाली राष्ट्र घडविण्यासाठी हिंदूंनी आपसातील सर्व मतभेद विसरून एकजूट केली पाहिजे, असे आवाहन रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
राष्ट्रहितासाठी सर्व हिंदू ज्यावेळी मतभेद विसरून एकत्र येतील तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने समर्थ बनेल, असे भागवत म्हणाले. ते मंगळवारी महेश्वर येथे नर्मदा हिंदू संगम कार्यक्रमात बोलत होते.
ते म्हणाले, भूतकाळात भारताला विश्वगुरू मानण्यात येत होते. भविष्यातही भारताची विश्वगुरू म्हणूनच ओळख निर्माण होईल. अमेरिकेकडे पैसा आणि व्यापार आहे. चीनकडे लष्करी शक्ती आहे. परंतु जगात भारतच असा एक देश आहे की ज्याच्याकडे सर्वकाही आहे.
हिंदू समाजातीलच एका घटकाला मंदिरात प्रवेश करणे आणि सार्वजनिक विहिरीचे पाणी भरण्यास प्रतिबंध घालण्यासारख्या प्रथा सुरू असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. आपली कामे वेगवेगळी असली तरी आपण एकाच देवावर विश्वास ठेवतो आणि जगाला वसुधैव कुटुंबकम् मानतो. आता आपल्याला देशासाठी जगावे लागेल, असे भागवत म्हणाले.
रविवारी स्वयंसेवकांना संबोधित करणार
रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांमध्ये ऊर्जेचा संचार करणे आणि त्यांच्याशी विचारमंथन करण्याच्या उद्देशाने मोहन भागवत हे येत्या १५ फेब्रुवारीला कानपूर येथे येणार आहेत. या दिवशी भागवत हे कानपूरच्या रेल्वे मैदानावर आयोजित विशेष शिबिरात २० हजारावर स्वयंसेवकांना संबोधित करतील. ते २० फेब्रुवारीपर्यंत कानपुरात मुक्काम करतील आणि या तीन दिवसांत विहिंप, बजरंग दल, मजदूर संघ व संघ परिवारातील अन्य संघटनांच्या नेत्यांसोबत विचारविमर्श करतील. (वृत्तसंस्था)