शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

बलशाली राष्ट्रासाठी हिंदूंनी एकजूट व्हावे-भागवत

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

खरगोन : बलशाली राष्ट्र घडविण्यासाठी हिंदूंनी आपसातील सर्व मतभेद विसरून एकजूट केली पाहिजे, असे आवाहन रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.

खरगोन : बलशाली राष्ट्र घडविण्यासाठी हिंदूंनी आपसातील सर्व मतभेद विसरून एकजूट केली पाहिजे, असे आवाहन रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
राष्ट्रहितासाठी सर्व हिंदू ज्यावेळी मतभेद विसरून एकत्र येतील तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने समर्थ बनेल, असे भागवत म्हणाले. ते मंगळवारी महेश्वर येथे नर्मदा हिंदू संगम कार्यक्रमात बोलत होते.
ते म्हणाले, भूतकाळात भारताला विश्वगुरू मानण्यात येत होते. भविष्यातही भारताची विश्वगुरू म्हणूनच ओळख निर्माण होईल. अमेरिकेकडे पैसा आणि व्यापार आहे. चीनकडे लष्करी शक्ती आहे. परंतु जगात भारतच असा एक देश आहे की ज्याच्याकडे सर्वकाही आहे.
हिंदू समाजातीलच एका घटकाला मंदिरात प्रवेश करणे आणि सार्वजनिक विहिरीचे पाणी भरण्यास प्रतिबंध घालण्यासारख्या प्रथा सुरू असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. आपली कामे वेगवेगळी असली तरी आपण एकाच देवावर विश्वास ठेवतो आणि जगाला वसुधैव कुटुंबकम् मानतो. आता आपल्याला देशासाठी जगावे लागेल, असे भागवत म्हणाले.
रविवारी स्वयंसेवकांना संबोधित करणार
रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांमध्ये ऊर्जेचा संचार करणे आणि त्यांच्याशी विचारमंथन करण्याच्या उद्देशाने मोहन भागवत हे येत्या १५ फेब्रुवारीला कानपूर येथे येणार आहेत. या दिवशी भागवत हे कानपूरच्या रेल्वे मैदानावर आयोजित विशेष शिबिरात २० हजारावर स्वयंसेवकांना संबोधित करतील. ते २० फेब्रुवारीपर्यंत कानपुरात मुक्काम करतील आणि या तीन दिवसांत विहिंप, बजरंग दल, मजदूर संघ व संघ परिवारातील अन्य संघटनांच्या नेत्यांसोबत विचारविमर्श करतील. (वृत्तसंस्था)