शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

हिंदू कैदी का फरार होत नाहीत ? दिग्विजय सिंह यांचा सवाल

By admin | Updated: November 1, 2016 12:24 IST

भोपाळ चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी नेहमी मुस्लिम कैदीच का फरार होत असतात, हिंदू का नाही ? असा सवाल विचारला आहे

ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 1 - सिमी (स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया) दहशतवाद्यांच्या चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी नेहमी मुस्लिम कैदीच का फरार होत असतात, हिंदू का नाही ? असा सवाल विचारला आहे. दिग्विजय सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास एनआयएकडे (राष्ट्रीय तपास यंत्रणा)  सोपवण्यात यावा अशी मागणीदेखील केली आहे. याअगोदर बोलताना आरएसएस आणि मुस्लिम कट्टरपंथी मिळून दंगली घडवून आणतात असा आरोप त्यांनी केला होता. 
 
'फक्त मुस्लिम कैदीच जेल तोडून फरार का होतात, हिंदू का नाही ? एनआयएने याचा तपास करायला हवा, आणि न्यायालयाने या तपासावर लक्ष ठेवायला हवं. तसंच फक्त मुस्लिमच फरार का होतात, काय समस्या आहे, याचाही तपास व्हावा', असं दिग्विजय सिंह बोलले आहेत. 
 
दुसरीकडे मध्यप्रदेशचे गृहमंत्री भुपेंद्र सिंह यांनी कोणत्याही तपासाची गरज नसून पोलिसांनी सर्व माहिती पुरवली असल्याचं सांगितलं आहे. एनआयए फक्त कारागृहातून फरार झालेल्या दहशतवाद्यांसंबंधी तपास करणार आहे. देशात जेव्हा चकमकीत एखादा दहशतवादी मारला जातो, तेव्हा काही लोक खासकरुन काँग्रेस लगेच संशय घेतात असं भुपेंद्र सिंह बोलले आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनीदेखील भोपाळ चकमकीवर बोलताना आपल्याला पोलीस आणि प्रशासनावर संशय घेण्याची प्रवृत्ती सोडली पाहिजे असं म्हटलं आहे. 
 
 
हेड कॉन्स्टेबलची हत्या केल्यानंतर सोमवारी पहाटे भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेले सिमीचे आठ अतिरेकी भोपाळलगत इटखेडी भागातील अचारपुरा येथे चकमकीत मारले गेले. दहशतवाद्यांनी कारागृहातून पलायन केल्याचे वृत्त धडकताच खळबळ उडाली होती. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या प्रकरणी मध्य प्रदेश सरकारला अहवाल मागितला आहे. राज्य सरकारने तडकाफडकी कारवाई करताना कारागृह अधीक्षक अखिलेश तोमर यांच्यासह पाच अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.