शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

हिंदोळे नात्यांचे

By admin | Updated: March 8, 2015 00:30 IST

हिंदोळे नात्यांचे - ॲड निलिमा कानेटकर

हिंदोळे नात्यांचे - ॲड निलिमा कानेटकर

दु:स्वप्न
आइरवना नेहाला आत्याने वाढवले होते. नेहाचे वडील फिरतीच्या नोकरीवर असल्याने त्यांना नेहाला स्वत:सोबत ठेवता येत नव्हते. आत्या प्रेमळ होती ती नेहाला व्यविस्थत सांभाळत होती. कोठेच काही तक्र ार नव्हती. यथावकाश नेहा १२ वी पास झाली. तिला जास्त शिकवण्याची घरच्यांची ऐपत नव्हती तसेच ती लग्नायोग्य झाली होती. तरूण मुलगी जास्त दिवस घरी नको म्हणून आत्याने तिच्या लग्नाचा घोषा लावला. नेहाला त्या बद्दल विचारलेच नाही. तसेही नेहा अबोलच होती. तिला परिस्थितीची जाणीव असल्याने ती संकोचत असे.तिने पुढे काही प्रशिक्षण घेण्याकडे ही लक्ष दिले नाही. वडीलांना नेहाबद्दल खूप जवळीक अथवा काळजी ही नव्हती. त्यातच आत्याच्या मुलीचे कंगनाचे लग्न झाले.आता आत्याला नेहाच्या भविष्याची काळजी लागली. ती सर्वांना नेहाला स्थळे बघण्यासाठी आग्रह धरू लागली.
कंगनाच्या पतीने संतोषने व सासूने नेहासाठी करणचे स्थळ सुचवले. करणची आई कंगनाच्या सासूच्या दूरच्या नात्यात होती. घर सधन होते. करणला व्यवस्थित नोकरी होती. लग्न ठरले. साखरपुडा घाईनेच झाला. नेहा करण २ वेळा फिरायला बाहेर गेले होते. सर्वांसमोर अदबीने वागणारा करण बाहेर विचित्र वागत असे. दोघाची विशेष ओळख झाली नव्हती तरी तिच्याशी अती जवळीक साधण्याचे प्रयत्न असत. त्यातही त्याचा धसमुसेपणा असे. नेहा अस्वस्थ होत असे पण कोणाकडे सांगावे असे तिला वाटे. तिने आत्याशी बोलायचा प्रयत्न केला पण आत्याने हसण्यावारी नेले. नेहा या लग्नाच्या कल्पनेने घाबरून गेली. तिचे चांगल्या घरी लग्न ठरल्याच्या आनंदात तिची अस्वस्थता कोणाच्याच ध्यानी आली नाही. तिचे करणशी दुपारी लग्न झाले. त्याच रात्री नेहा आणि करण मधुचंद्रासाठी रवाना झाले.
आता नेहाचे दु:स्वप्न सुरू झाले. सुखी संसाराची तिची स्वप्ने पार धुुळीला मिळाली. दिवसा करण नीट वागायचा. रात्री त्याचे वागणे बदलून जायचे. प्रणयाच्या नावावर तो नेहाला शारीरीक इजा करत असे . तो नेहाच्या शरीरावर ब्लेडने जखमा करे. ती घाबरलेली बघून, तिच्या वेदना बघुन हसत असे. त्यातच त्याला विकृत आनंद वाटत होता. दिवसा आणि रात्रीच्या करणमध्ये खूप फरक होता. जसा कांही त्याच्यात एकाच वेळी दोन व्यक्ती सामावलेल्या होत्या. करण प्रत्यक्षात एक मानसिक रुग्ण होता. नेहा त्याच्या भितीने मधुचंद्राच्या काळातच आजारी पडली. तिला ताप भरला.अशा परिस्थितीत ते वेळेआधी घरी परतले.
त्या नंतर रितीप्रमाणे नेहा माहेरी आली. ती फारच भेदरलेली दिसत होती.अजूनच अबोल झाली. तापात पडून राहिली होती. नेहा खूप अशक्त झाली होती. डोळ्यातून सतत पाणी गळत होते. या काळात तिला भेटायला येण्याचे करणने टाळले. आत्याला आता काळजी वाटू लागली. अशातच एकदा आंघोळ झाल्यानंतर आत्या नेहाला कपडे घालण्यासाठी मदत करत होती. तिला नेहाच्या पाठीवर कापल्याच्या खुणा दिसल्या. तिने नीट बघितल्यावर तिच्या इतर भागंावरही तिला जखमा आढळल्या. नेहाला तिने खोदून खोदून विचारले तर नेहाचा बांधच फुटला. हळुहळू नेहाने तिचा करणच्या सहवासातील सर्व अनुभव सांगितला. आत्या घाबरून हताश झाली. दोघींनी स्वत:ला घरात कोडून घेतले. त्यातच नेहाला भेटायला कंगना आली. ती तिच्या वैवाहिक जीवनात आनंदात होती. घरातले वातावरण बघून तिला काळजी वाटली. तिने संतोषला बोलावून घेतले. संतोषने सर्व एकून घेतले पण त्याने करण विरुध्द पोलिसात तक्र ार करण्यास विरोध केला. काही तरी मार्ग काढू असा मोघम इशारा देऊन तो कंगनाला घेऊन निघून गेला. नेहाचे वडील बाहेर गावी गेले होते. त्यांचा मामा पोलिसात होता पण तोही यात्रेला गेला होता. आत्या हतबल होऊन बसून राहिली. दोघींना कसलेच भान नव्हते.
तिसर्‍या दिवशी संतोषची आई या घरी आली व तिने नेहाला सासरी पाठवण्यास सांगितले. आत्याने नकार दिला. यावर त्या बाईंनी भांडणच काढले. 'रोगी मुलगी करणच्या गळ्यात बांधली असा तिचा आरोप होता'. नेहाने जर पोलिसात तक्र ार केली तर कंगनाला कायमचे सासर सोडावे लागेल असा तिने पवित्रा घेतला. आत्याला काहीच सुचेना. तिने नेहाच्या वडीलांना बोलावून घेतले. सर्वच मंडळी काळजीत पडली. त्यांनी काही कायदेशीर कारवाई केली असती तर कंगनाचे भविष्य धोक्यात होते. त्यासाठी आत्याची तयारी नव्हती. संतोषला व त्याच्या आईला पोलिसांचा ससेमिरा नको होता. कारण हे लग्न जमवण्यात त्यांचा पुढाकार होता. शिवाय घराण्याची अब्रू जाईल असेही वाटत होते. नेहाच्या सासरच्यांना पैशाची घमेंड होतीच. कायद्याचा धाक ही नव्हता. 'नेहा लग्ना आधीपासूनच रोगी होती पण तिला मानसिक आजार ही होता व ती स्वत:ला जखमा करून घेत होती असाही तिच्या सासरच्यां नी आरोप केला'. यात्रेला गेलेला मामा लगेच परत आला. त्याने हे प्रकरण हाती घेतले. हे लग्नच फसवून झाले असल्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने नेहाची या लग्नातून सुटका झाली. मामाच्या प्रोत्साहनाने नेहाने शिक्षण सुरु केले. मात्र या अनुभवातून बाहेर पडण्यास नेहाला अनेक वर्षे लागली.
सहजीवन सुखाचे व्हावे, जोडीदाराच्या सहवासात पुढील आयुष्य आनंदात जावे. एक नवे कुटुंब तयार व्हावे यासाठी लग्नाचा घाट घातला जातो खरा पण त्यासाठी सर्व बाजूने आधीच चौकशी करणे काळजी घेणे हे होत नाही. विवाह पूर्व मार्गदर्शनाचा मार्ग माहित नसतो किंवा तो अवलंबला जात नाही. समस्या निर्माण झाल्यावर मात्र त्यातून बाहेर पडतांना नाकी नऊ येतात. खर्च होतोच पण संबंधितांवर आयुष्यभरासाठी कांही कटु अनुभवांचे व्रण खोलवर रहातात यावर कांही प्रतिबंधात्मक उपाय असतील का? निदान त्याचा विचार तरी योग्य वेळी करता येईल का? बघू या !!!!