शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
7
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
8
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
9
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
10
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
11
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
12
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
13
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
14
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
15
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
16
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
17
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
18
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
19
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
20
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!

ईशान्य भारतात आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सर्वाधिक

By admin | Updated: May 15, 2016 04:22 IST

भारतात आंतरजातीय विवाहांना सहजासहजी मान्यता मिळत नाही, तसा विवाह करणाऱ्यांना नातेवाईक स्वीकारायला तयार होत नाहीत, अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात.

नवी दिल्ली : भारतात आंतरजातीय विवाहांना सहजासहजी मान्यता मिळत नाही, तसा विवाह करणाऱ्यांना नातेवाईक स्वीकारायला तयार होत नाहीत, अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. जाती व धर्माच्या अभिमानापायी कित्येक पालकांनी आपल्या पोटच्या मुलाची वा मुलीचीच हत्या केल्याच्या आॅनर किलींगच्या घटनाही प्रसिद्ध होत असतात. पण आपल्याच देशात असे एक राज्य आहे जिथे सर्वात जास्त म्हणजे ५५ टक्के आंतराजातीय विवाह होतात. ते राज्य आहे मिझोरम.अलीकडेच प्रदिर्शत झालेला सैराट चित्रपट खूप गाजत असून, त्यातील आंतरजातीय विवाहाच्या मुद्द्यावरूनही घराघरांत आणि सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. ईशान्यकडील राज्यांमध्ये आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाहांचे प्रमाण अधिक आहे. अगदी जम्मू-काश्मीरमध्येही अशा विवाहांचे प्रमाण खूप मोठे आहे.इंडियन ह्युमन डेव्हलपमेंटने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील ३३ राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ४१ हजार ५५४ कुटुंबाचा समावेश होता. नॅशनल कौन्सिल आॅफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्चच्या (एनसीएईआर) सर्वेक्षणानुसार भारतात फक्त ५ टक्के आंतरजातीय विवाह होतात. भारतासारख्या बहुधर्मीय व हजारो जाती असलेल्या देशात ९५ टक्के लग्न ही स्वजातीतच केली जातात. (लोकमत न्यूज नेटवर्क)> मिझोरममील बहुसंख्य नागरिक ख्रिश्चनधर्मीय असून तिथे तब्बल ५५ टक्के तरुण-तरुणी आंतरजातीय विवाह करतात. या क्र मवारीत दुसऱ्या क्र मांकावर आहे मेघालय हे राज्य. तिथे आंतरजातीय विवाहांचे प्रमाण आहे ४६ टक्के आहे आणि सिक्कीम तिसऱ्या स्थानावर असून, तिथे आंतरजातीय विवाहांचे प्रमाण ३८ टक्के आहे. मुस्लिमबहुल जम्मू-काश्मीर राज्य चौथ्या क्रमांकावर असून, तिथे ३५ टक्के विवाह आंतरजातीय होतात. गुजरात पाचव्या स्थानावर आहे. तिथे आंतरजातीय लग्नाचे प्रमाण १३ टक्के आहे.