शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

ईशान्य भारतात आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सर्वाधिक

By admin | Updated: May 15, 2016 04:22 IST

भारतात आंतरजातीय विवाहांना सहजासहजी मान्यता मिळत नाही, तसा विवाह करणाऱ्यांना नातेवाईक स्वीकारायला तयार होत नाहीत, अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात.

नवी दिल्ली : भारतात आंतरजातीय विवाहांना सहजासहजी मान्यता मिळत नाही, तसा विवाह करणाऱ्यांना नातेवाईक स्वीकारायला तयार होत नाहीत, अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. जाती व धर्माच्या अभिमानापायी कित्येक पालकांनी आपल्या पोटच्या मुलाची वा मुलीचीच हत्या केल्याच्या आॅनर किलींगच्या घटनाही प्रसिद्ध होत असतात. पण आपल्याच देशात असे एक राज्य आहे जिथे सर्वात जास्त म्हणजे ५५ टक्के आंतराजातीय विवाह होतात. ते राज्य आहे मिझोरम.अलीकडेच प्रदिर्शत झालेला सैराट चित्रपट खूप गाजत असून, त्यातील आंतरजातीय विवाहाच्या मुद्द्यावरूनही घराघरांत आणि सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. ईशान्यकडील राज्यांमध्ये आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाहांचे प्रमाण अधिक आहे. अगदी जम्मू-काश्मीरमध्येही अशा विवाहांचे प्रमाण खूप मोठे आहे.इंडियन ह्युमन डेव्हलपमेंटने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील ३३ राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ४१ हजार ५५४ कुटुंबाचा समावेश होता. नॅशनल कौन्सिल आॅफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्चच्या (एनसीएईआर) सर्वेक्षणानुसार भारतात फक्त ५ टक्के आंतरजातीय विवाह होतात. भारतासारख्या बहुधर्मीय व हजारो जाती असलेल्या देशात ९५ टक्के लग्न ही स्वजातीतच केली जातात. (लोकमत न्यूज नेटवर्क)> मिझोरममील बहुसंख्य नागरिक ख्रिश्चनधर्मीय असून तिथे तब्बल ५५ टक्के तरुण-तरुणी आंतरजातीय विवाह करतात. या क्र मवारीत दुसऱ्या क्र मांकावर आहे मेघालय हे राज्य. तिथे आंतरजातीय विवाहांचे प्रमाण आहे ४६ टक्के आहे आणि सिक्कीम तिसऱ्या स्थानावर असून, तिथे आंतरजातीय विवाहांचे प्रमाण ३८ टक्के आहे. मुस्लिमबहुल जम्मू-काश्मीर राज्य चौथ्या क्रमांकावर असून, तिथे ३५ टक्के विवाह आंतरजातीय होतात. गुजरात पाचव्या स्थानावर आहे. तिथे आंतरजातीय लग्नाचे प्रमाण १३ टक्के आहे.