शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

ईशान्य भारतात आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सर्वाधिक

By admin | Updated: May 15, 2016 04:22 IST

भारतात आंतरजातीय विवाहांना सहजासहजी मान्यता मिळत नाही, तसा विवाह करणाऱ्यांना नातेवाईक स्वीकारायला तयार होत नाहीत, अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात.

नवी दिल्ली : भारतात आंतरजातीय विवाहांना सहजासहजी मान्यता मिळत नाही, तसा विवाह करणाऱ्यांना नातेवाईक स्वीकारायला तयार होत नाहीत, अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. जाती व धर्माच्या अभिमानापायी कित्येक पालकांनी आपल्या पोटच्या मुलाची वा मुलीचीच हत्या केल्याच्या आॅनर किलींगच्या घटनाही प्रसिद्ध होत असतात. पण आपल्याच देशात असे एक राज्य आहे जिथे सर्वात जास्त म्हणजे ५५ टक्के आंतराजातीय विवाह होतात. ते राज्य आहे मिझोरम.अलीकडेच प्रदिर्शत झालेला सैराट चित्रपट खूप गाजत असून, त्यातील आंतरजातीय विवाहाच्या मुद्द्यावरूनही घराघरांत आणि सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. ईशान्यकडील राज्यांमध्ये आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाहांचे प्रमाण अधिक आहे. अगदी जम्मू-काश्मीरमध्येही अशा विवाहांचे प्रमाण खूप मोठे आहे.इंडियन ह्युमन डेव्हलपमेंटने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील ३३ राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ४१ हजार ५५४ कुटुंबाचा समावेश होता. नॅशनल कौन्सिल आॅफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्चच्या (एनसीएईआर) सर्वेक्षणानुसार भारतात फक्त ५ टक्के आंतरजातीय विवाह होतात. भारतासारख्या बहुधर्मीय व हजारो जाती असलेल्या देशात ९५ टक्के लग्न ही स्वजातीतच केली जातात. (लोकमत न्यूज नेटवर्क)> मिझोरममील बहुसंख्य नागरिक ख्रिश्चनधर्मीय असून तिथे तब्बल ५५ टक्के तरुण-तरुणी आंतरजातीय विवाह करतात. या क्र मवारीत दुसऱ्या क्र मांकावर आहे मेघालय हे राज्य. तिथे आंतरजातीय विवाहांचे प्रमाण आहे ४६ टक्के आहे आणि सिक्कीम तिसऱ्या स्थानावर असून, तिथे आंतरजातीय विवाहांचे प्रमाण ३८ टक्के आहे. मुस्लिमबहुल जम्मू-काश्मीर राज्य चौथ्या क्रमांकावर असून, तिथे ३५ टक्के विवाह आंतरजातीय होतात. गुजरात पाचव्या स्थानावर आहे. तिथे आंतरजातीय लग्नाचे प्रमाण १३ टक्के आहे.