कमलाकर देसले : नाशिकरोड वसंत व्याख्यानमालानाशिकरोड : सर्वांच्या सुखसमृद्धीची भावना मांडणारे ज्ञानेश्वरांचे पसायदान ही विश्वातील सवार्ेच्च निर्मिती आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी कमलाकर देसले यांनी येथे केले.श्री योगीराज गजानन ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनेदत्तमंदिर रोडवरील लायन्स क्लब सभागृहात आजपासून सुरू झालेल्या वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते. आमदार उत्तमराव ढिकले यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. यावेळी स्थायी समितीचे सभापती रमेश धोंगडे, लायन्स क्लबच्या अंजली विसपुते, कवी रवींद्र मालुंजकर आदिंची उपस्थिती होती. यावेळी देसले म्हणाले, अध्यात्म हा जीवनाचा पाया आहे. विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालणारी साहित्यकृती म्हणजे ज्ञानेश्वरांचे साहित्य. श्रीमंती व शांती एका म्यानेत राहू शकत नाही. कुठलाच माणूस कोठेही सुखी नाही. नरक म्हणजे नखशिखांत दु:ख आणि स्वर्ग म्हणजे सर्व साधनांनी सुखी असणे होय. संतांकडे काहीही नसते तरी ते सुखी असतात. सुखाचे स्रोत हे बाहेर नसतात तर आत असतात. जग तीन प्रकारांचे असते असे नमूद करून ते म्हणाले, रक्तसंबंधाचे जग ज्यात आई-वडील, पत्नी, मुले असतात. सेवासंबंधांच्या जगात समाजाची सेवा येते. भावसंबंधांच्या जगात दुसर्यांसाठी प्रार्थनेशिवाय काहीच करता येत नाही. रक्तसंबंधांचे कर्तव्य केल्याशिवाय आशीर्वाद मिळत नाही. बाबा आमटे, विनोबा भावे यांच्यासारखे लोक जे करतात ते सेवासंबंध. बालक आणि वृद्धांची अवस्था ही भावसंबंधात असते. येथे फक्त प्रार्थनाच करावी लागते. कारण मनुष्य हतबल असतो. प्रार्थना ही उतारवयातच केली पाहिजे. देव निर्बलांच्याच प्रार्थना ऐकतो, सबलांच्या नाही. सुखाचे सूत्र हेच की, रक्तसंबंध आणि सेवासंबंधांची सेवा आणि भावसंबंधांसाठी प्रार्थना. हे केल्यावरच सुखाची बरसात होते. छोट्या छोट्या गोष्टींत सुख असते. सुखासाठी आपण धडपडतो, वणवण करतो. मात्र, खर्या सुखासाठी पसायदान, हरिपाठ, संतसाहित्याशी नाळ जोडली पाहिजे, असेही ते शेवटी म्हणाले. रमेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. एकनाथ डेरे यांनी आभार मानले.
पसायदान विश्वातील सवार्ेच्च निर्मिती
By admin | Updated: May 19, 2014 00:20 IST