शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

आत्मघाती हल्ल्याचा देशभरात हाय अ‍ॅलर्ट

By admin | Updated: October 1, 2016 03:59 IST

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्टाइक्सनंतर नवी दिल्ली, मुंबई आणि सर्व महानगरांसह देशभर हाय अ‍ॅलर्ट घोषित करण्यात आला असतानाच, पुढील तीन ते चार दिवस

- हरीश गुप्ता/ शीलेश शर्मा /सुरेश डुग्गर, नवी दिल्ली

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्टाइक्सनंतर नवी दिल्ली, मुंबई आणि सर्व महानगरांसह देशभर हाय अ‍ॅलर्ट घोषित करण्यात आला असतानाच, पुढील तीन ते चार दिवस निर्णायक असू शकतात, या शक्यतेमुळे संरक्षण खाते आणि केंद्रीय गृह खाते सक्रिय झाले असून, या काळात सर्व राज्यांना दक्षतेच्या व खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या सीमेवरील भागांत आणि गावांमध्ये विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला असून, भारतीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलांची जागा लष्कराने घेतली आहे.पाकिस्तानकडून थेट युद्धाची शक्यता नसली तरी काही कारवाया होण्याची शक्यता लक्षात घेत, पाकच्या कोणत्याही कारवायांना तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्या आहेत. त्यांनी शुक्रवारी सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेतला आणि सीमेवरील भागांत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहिती करून घेतली. सीमेवरील गावे रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी शेती, जनावरे यांना सोडून लोक अन्यत्र स्थलांतर करण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. महिला, मुली व लहान मुले यांना मात्र अन्यत्र स्थलांतर करण्यास भाग पाडण्यात आले असून, ठिकठिकाणी त्यांच्यासाठी (पान ११ वर) आता आम्ही भारतात घुसून हल्ला करूभारताने केलेली कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राइक असल्याचे सांगण्यात येत असले तरी खरे सर्जिकल स्ट्राइक आम्ही भारतात घुसून करून दाखवू, अशी धमकी सईद हफिज याने दिली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय, पाक लष्कर वा तेथील सरकार यांच्या सहकार्य व मदतीशिवाय तो काही करू शकत नाही. त्यामुळे तो जे बोलला, त्याला पाकिस्तानचीच फूस असावी, असा अंदाज आहे. आता सर्जिकल स्ट्राइक करण्याची संधी आम्हाला आहे आणि तुम्हाला अमेरिका वा कोणताही देश मदत करणार नाही, हे लक्षात ठेवा, अशी धमकीच त्याने दिली आहे.गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवादेशभर उद्या, शनिवारपासून नवरात्रौत्सव सुरू होत असल्याने रेल्वे स्टेशन्स, मार्केट्स, महत्त्वाची व संवेदनशील आस्थापने, कार्यालये, धार्मिक तसेच पर्यटन स्थळे अशा सर्व गर्दीच्या ठिकाणी कोणतीही गडबड होता कामा नये याची काळजी घेण्यास राज्य सरकारांना सांगण्यात आले आहे.मोदींची पंतप्रधानांसारखी पहिली कृती : सर्जिकल हल्ला केल्याबद्दल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा केली. मोदींनी अडीच वर्षांत पहिल्यांदाच पंतप्रधानपदाला साजेशी कृती केली. जेव्हा पंतप्रधान देशाचे पंतप्रधान म्हणून काम करतात तेव्हा मीदेखील त्यांचे समर्थन करतो, असे ते म्हणाले