शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

हाय अॅलर्ट ! देशात घुसले 25 दहशतवादी, 26/11सारखा हल्ला करण्याचा कट

By admin | Updated: May 30, 2017 12:29 IST

लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून देशात 26/11 मुंबई हल्ल्याप्रमाणे घातपात करण्याचा मोठा कट रचला जात आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 30 - सीमा रेषेवर घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना 27 मे रोजी यमसदनी धाडले.  काश्मीर खोऱ्यात 24 तासांत तीन वेगवेगळ्या चकमकींमध्ये 10 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, त्यात गेल्या वर्षी चकमकीत ठार झालेल्या बुरहान वानीची साथीदार व हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर  सबजार अहमद भट्ट हाही ठार झाला होता.
 
यामुळे बिथरलेल्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून देशात 26/11 मुंबई हल्ल्याप्रमाणे घातपात करण्याचा मोठा कट रचला जात आहे. गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबाचे जवळपास 20 ते 25 दहशतवादी मोठा रक्तपात घडवण्यासाठी देशात घुसले आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून रेल्वे स्टेशन, विमानतळ, हॉटेल, पर्यटन स्थळं आणि मॉल्स यांसारख्या गजबजलेल्या ठिकाणांना टार्गेट केले जाण्याची शक्यता आहे. 
 
या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांकडून सर्व रेल्वे स्टेशन आणि विमानतळांवर हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तान सीमेशेजारी असणा-या राज्यांतही सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. 
 
गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या संदेशानुसार, सर्व सुरक्षा दलांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
पाकिस्तानमधील ""लष्कर ए तोयबा""चे दहशतवादी दिल्ली व मुंबईमध्ये किंवा पंजाब आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात हल्ला करू शकतात, असा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. तोयबाचे २० ते २१ हस्तक भारतात असावेत. दहशतवादी आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणण्याची भीतीही व्यक्त होत आहे.