शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

हाय अॅलर्ट ! देशात घुसले 25 दहशतवादी, 26/11सारखा हल्ला करण्याचा कट

By admin | Updated: May 30, 2017 12:29 IST

लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून देशात 26/11 मुंबई हल्ल्याप्रमाणे घातपात करण्याचा मोठा कट रचला जात आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 30 - सीमा रेषेवर घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना 27 मे रोजी यमसदनी धाडले.  काश्मीर खोऱ्यात 24 तासांत तीन वेगवेगळ्या चकमकींमध्ये 10 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, त्यात गेल्या वर्षी चकमकीत ठार झालेल्या बुरहान वानीची साथीदार व हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर  सबजार अहमद भट्ट हाही ठार झाला होता.
 
यामुळे बिथरलेल्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून देशात 26/11 मुंबई हल्ल्याप्रमाणे घातपात करण्याचा मोठा कट रचला जात आहे. गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबाचे जवळपास 20 ते 25 दहशतवादी मोठा रक्तपात घडवण्यासाठी देशात घुसले आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून रेल्वे स्टेशन, विमानतळ, हॉटेल, पर्यटन स्थळं आणि मॉल्स यांसारख्या गजबजलेल्या ठिकाणांना टार्गेट केले जाण्याची शक्यता आहे. 
 
या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांकडून सर्व रेल्वे स्टेशन आणि विमानतळांवर हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तान सीमेशेजारी असणा-या राज्यांतही सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. 
 
गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या संदेशानुसार, सर्व सुरक्षा दलांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
पाकिस्तानमधील ""लष्कर ए तोयबा""चे दहशतवादी दिल्ली व मुंबईमध्ये किंवा पंजाब आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात हल्ला करू शकतात, असा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. तोयबाचे २० ते २१ हस्तक भारतात असावेत. दहशतवादी आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणण्याची भीतीही व्यक्त होत आहे.